शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

यवतमाळला तीन दिवसाआड पाणी

By admin | Updated: June 14, 2014 02:27 IST

यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात असलेला अत्यल्प जलसाठा...

यवतमाळ : यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात असलेला अत्यल्प जलसाठा आणि लांबलेल्या पावसामुळे यवतमाळ शहराला आता तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. २१ जूनपासून याची अंमलबजावणी होणार असून तसा प्रस्ताव नागपूरच्या आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.यवतमाळ शहरासाठी निळोणा आणि चापडोह प्रकल्प जीवनदायी आहे. या दोन प्रकल्पावरून शहर आणि शहरालगतच्या भागाला पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यात ओव्हरफ्लो झालेला निळोणा प्रकल्प आता तळाला लागला आहे. या प्रकल्पाची १२६३ फूट ११ इंच साठवण क्षमता आहे.मात्र आता या प्रकल्पात केवळ ११ इंच पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे यवतमाळकरांवर पाणीटंचाईचे भीषण संकट घोंगावत आहे. पावसाळा लांबल्याने त्यात आणखी भर पडली आहे. यवतमाळकरांना आवश्यक पाणी मिळावे म्हणून पाणीपुरवठ्याच्या वेळात बदल करण्यात येत आहे. पूर्वी एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता तीन दिवसाआड होणार आहे. म्हणजे आठवड्यातून दोनच दिवस नळ येतील. निळोणा प्रकल्प पूर्णत: गाळाने भरला असून ११ इंच पाणी शिल्लक असल्याने जीवन प्राधिकरणाने नियोजन केले आहे. त्यातही मृत साठ्यातील पाण्याचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त दोन पंप बसविण्यात आले आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सहा ते सात दिवसांचा कालावधी लागणार आहे.त्यामुळे २१ जूनपासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाऊस आणखी लांबल्यास पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)