शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

यवतमाळला तीन दिवसाआड पाणी

By admin | Updated: April 18, 2016 04:43 IST

उन्हाच्या तीव्रतेने निळोणा जलाशयाची पातळी झपाट्याने घसरत असल्याने येत्या बुधवारपासून यवतमाळ शहराला

यवतमाळ : उन्हाच्या तीव्रतेने निळोणा जलाशयाची पातळी झपाट्याने घसरत असल्याने येत्या बुधवारपासून यवतमाळ शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जीवन प्राधिकरणाने घेतला आहे. यंदा पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागत असून सोमवारी यासाठी चाचणी घेतली जाणार आहे. बाराही महिने दोन दिवस आड पाणी मिळणाऱ्या यवतमाळकरांना आता आठवड्यातून दोनच दिवस पाणी मिळणार आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा जलाशयात गत आठवड्यात सहा टक्के पाणी शिल्लक होते. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत पाणी पुरेल असा जीवन प्राधिकरणाचा प्राथमिक अंदाज होता. मात्र उष्णतेच्या तीव्र लाटेने हा जलसाठा झपाट्याने घटला. परिणामी जीवन प्राधिकरणावर मृतसाठ्यातून पाणी उपसा करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी जीवन प्राधिकरणाने तयारी चालविली आहे. दोन इर्मजन्सी पंप बसविण्यासाठी परवानगी घेण्यात आली आहे. सद्यस्थितीत असलेले पंप चालविणे अवघड झाले आहे. पाणीसाठा पंपापर्यंत ओढण्यासाठी नाली खोदण्यात आली आहे. त्या ठिकाणी पंपींग करून पाण्याचा उपसा केला जाणार आहे. सध्या पंपींग करताना प्राधिकरणाला दोन तास पंप बंद ठेवावा लागतो. सोमवारनंतर ही क्षमताही संपणार आहे. तत्पूर्वीच चाचणी घेऊन इर्मजन्सी पंप लावले जाणार आहे. दोनही पंपाच्या मदतीने दर तासाला सहा लाख ८० हजार लिटर पाणी खेचले जाणार आहे. निळोणा प्रकल्पातील पाणी संपत आल्याने यवतमाळ शहराला तीन दिवसआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जीवन प्राधिकरणाने घेतला आहे. त्यासाठीची अंमलबजावणी बुधवार २० एप्रिलपासून केली जाणार आहे. सद्यस्थितीत चापडोह प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यवतमाळ शहरात पाण्यासाठी हाहाकार उडणार नाही, परंतु पावसाळ्यापर्यंतची तजवीज म्हणून जीवन प्राधिकरणाने तीन दिवसआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभर तसेही यवतमाळकरांना दोन दिवसआड पाणी पुरवठा केला जातो. आता त्यात एका दिवसाची भर पडली. मात्र या एका दिवसाने आठवड्याला यवतमाळकरांना केवळ दोनच दिवस पाणी मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन जीवन प्राधिकरणाच्यावतीने करण्यात आले आहे. (शहर वार्ताहर) पावणेदोन कोटींचा वाढीव प्रस्ताव४जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईसाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार केला होता. मात्र या कृती आराखड्यावर आमदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे आता मूळ आराखड्याव्यतिरिक्त एक कोटी ७५ लाख रुपये वाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला सध्या तरी मंजुरी मिळाली नाही. जिल्ह्यात १६ गावांना टँकरयवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून आता १६ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था प्रशासनाला करावी लागत आहे. प्रारंभी दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. परंतु आता त्यात जांब, खरडगाव, घोडखिंडी, पांढरी, खरोला, उल्हासवाडी, म्हैसमाळ, पारवा, जामडोह, शिरोली, भांबराजा, उपवनवाडी, बोथा, फुलसावंगी, पेटूर, पाळोदी, सुधाकरनगर या गावांची भर पडली आहे.२५ लघु प्रकल्पात ठणठणाट उष्णतेच्या लाटेने जिल्ह्यातील २५ लघु प्रकल्प कोरडे पडले आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये सहा टक्के पाणी शिल्लक असून मध्यम प्रकल्पात २० टक्के पाणीसाठा आहे. यासोबतच जिल्ह्यातील पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, साठवण तलाव असे २५० सिंचन प्रकल्प कोरडे झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एप्रिलमध्येच ही अवस्था आहे तर मे महिन्यात काय होईल याचा विचार न केलेला बरा.