शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळला तीन दिवसाआड पाणी

By admin | Updated: April 18, 2016 04:43 IST

उन्हाच्या तीव्रतेने निळोणा जलाशयाची पातळी झपाट्याने घसरत असल्याने येत्या बुधवारपासून यवतमाळ शहराला

यवतमाळ : उन्हाच्या तीव्रतेने निळोणा जलाशयाची पातळी झपाट्याने घसरत असल्याने येत्या बुधवारपासून यवतमाळ शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जीवन प्राधिकरणाने घेतला आहे. यंदा पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागत असून सोमवारी यासाठी चाचणी घेतली जाणार आहे. बाराही महिने दोन दिवस आड पाणी मिळणाऱ्या यवतमाळकरांना आता आठवड्यातून दोनच दिवस पाणी मिळणार आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा जलाशयात गत आठवड्यात सहा टक्के पाणी शिल्लक होते. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत पाणी पुरेल असा जीवन प्राधिकरणाचा प्राथमिक अंदाज होता. मात्र उष्णतेच्या तीव्र लाटेने हा जलसाठा झपाट्याने घटला. परिणामी जीवन प्राधिकरणावर मृतसाठ्यातून पाणी उपसा करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी जीवन प्राधिकरणाने तयारी चालविली आहे. दोन इर्मजन्सी पंप बसविण्यासाठी परवानगी घेण्यात आली आहे. सद्यस्थितीत असलेले पंप चालविणे अवघड झाले आहे. पाणीसाठा पंपापर्यंत ओढण्यासाठी नाली खोदण्यात आली आहे. त्या ठिकाणी पंपींग करून पाण्याचा उपसा केला जाणार आहे. सध्या पंपींग करताना प्राधिकरणाला दोन तास पंप बंद ठेवावा लागतो. सोमवारनंतर ही क्षमताही संपणार आहे. तत्पूर्वीच चाचणी घेऊन इर्मजन्सी पंप लावले जाणार आहे. दोनही पंपाच्या मदतीने दर तासाला सहा लाख ८० हजार लिटर पाणी खेचले जाणार आहे. निळोणा प्रकल्पातील पाणी संपत आल्याने यवतमाळ शहराला तीन दिवसआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जीवन प्राधिकरणाने घेतला आहे. त्यासाठीची अंमलबजावणी बुधवार २० एप्रिलपासून केली जाणार आहे. सद्यस्थितीत चापडोह प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यवतमाळ शहरात पाण्यासाठी हाहाकार उडणार नाही, परंतु पावसाळ्यापर्यंतची तजवीज म्हणून जीवन प्राधिकरणाने तीन दिवसआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभर तसेही यवतमाळकरांना दोन दिवसआड पाणी पुरवठा केला जातो. आता त्यात एका दिवसाची भर पडली. मात्र या एका दिवसाने आठवड्याला यवतमाळकरांना केवळ दोनच दिवस पाणी मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन जीवन प्राधिकरणाच्यावतीने करण्यात आले आहे. (शहर वार्ताहर) पावणेदोन कोटींचा वाढीव प्रस्ताव४जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईसाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार केला होता. मात्र या कृती आराखड्यावर आमदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे आता मूळ आराखड्याव्यतिरिक्त एक कोटी ७५ लाख रुपये वाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला सध्या तरी मंजुरी मिळाली नाही. जिल्ह्यात १६ गावांना टँकरयवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून आता १६ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था प्रशासनाला करावी लागत आहे. प्रारंभी दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. परंतु आता त्यात जांब, खरडगाव, घोडखिंडी, पांढरी, खरोला, उल्हासवाडी, म्हैसमाळ, पारवा, जामडोह, शिरोली, भांबराजा, उपवनवाडी, बोथा, फुलसावंगी, पेटूर, पाळोदी, सुधाकरनगर या गावांची भर पडली आहे.२५ लघु प्रकल्पात ठणठणाट उष्णतेच्या लाटेने जिल्ह्यातील २५ लघु प्रकल्प कोरडे पडले आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये सहा टक्के पाणी शिल्लक असून मध्यम प्रकल्पात २० टक्के पाणीसाठा आहे. यासोबतच जिल्ह्यातील पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, साठवण तलाव असे २५० सिंचन प्रकल्प कोरडे झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एप्रिलमध्येच ही अवस्था आहे तर मे महिन्यात काय होईल याचा विचार न केलेला बरा.