शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

यवतमाळ: महिनाभरात १६ अल्पवयीन तरुणींचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 13:57 IST

आंधळ्या प्रेमासाठी जीवापाड प्रेम करणाऱ्या आई-वडिलांना सोडून यवतमाळातून तब्बल १६ अल्पवयीन तरुणींनी पलायन केल्याचे शहरातील विविध ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्यावरून पुढे आले आहे.

ठळक मुद्देपालकांना मन:स्तापविविध ठाण्यात गुन्हे दाखल, आंधळ्या प्रेमात सोडले घरदार

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आंधळ्या प्रेमासाठी जीवापाड प्रेम करणाऱ्या आई-वडिलांना सोडून यवतमाळातून तब्बल १६ अल्पवयीन तरुणींनी पलायन केल्याचे शहरातील विविध ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्यावरून पुढे आले आहे. या तरुणींना फूस लावून पळविल्याच्या तक्रारी पोलिसात देण्यात आल्या असून पोलीस अशा ‘बेपत्ता’ तरुणींचा शोध घेत आहे. सोशल मीडिया आणि विविध माध्यमातून प्रेमाचे होणारे उदात्तीकरण आणि आकर्षण यातून अल्पवयीन तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेम पाशात अडकत आहे. कुटुंबियांचे दुर्लक्ष झाले की, मग त्या कुटुंबावर नको तो प्रसंग उद्भवतो. शिक्षण घेण्याच्या वयात प्रेमाच्या आनाभाका घेत युगुल बेपत्ता होते. सामाजिक बंधने झुगारुन ही मंडळी पलायन करतात. यवतमाळ शहरातील १४ ते १७ वयोगटातील तरुणी आणि १८ ते २५ वयोगटातील तरुण अशाच प्रेमपाशात अडकून घरदार सोडत आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ही मंडळी आई-वडिलांचा विचारही करीत नाही. मुलगी बेपत्ता झाल्यावर मात्र घराच्यांच्या पायाखालची वाळू सरकते. पालक पोलीस ठाणे गाठून मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार देतात.यवतमाळ शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविल्या जाणाऱ्या अशा घटनांची आकडेवारी मोठी आहे. यावरूनच भीषणता लक्षात येते. मार्च अखेरपर्यंत अवधूतवाडी पोलीस ठाण्यातून पाच अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या तक्रारी नोंदविल्या आहे. शहर पोलीस ठाण्यात दोन मुली, लोहारा, ग्रामीण पोलीस ठाणे येथेही अशा तक्रारींची नोंद आहे. विशेष म्हणजे तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेलेच प्रेमीयुगुल पसार झालेत, असे नाही तर एक २२ वर्षीय विवाहिताही आपल्या प्रियकरासोबत निघून गेल्याचे पुढे आले आहे. काही प्रकरणात पोलिसांनी तपास करून प्रेमीयुगुलांना ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलींना त्यांच्या आई-वडिलांच्या सुपूर्द केले. केवळ आकर्षणातून उचललेले हे पाऊल सर्वांनाच मन:स्ताप देणारे ठरत आहे.

पालकांनो मुलांना वेळीच समजून घ्याअनेक पालक आपल्या मुलांवर नको तितका विश्वास ठेवतात. आमचे मुले तशी नाही, असे सांगतात. परंतु तारुण्य सुलभ मनात काय सुरू आहे, याचा थांगपत्ताही पालकांना लागत नाही. मुलांकडे वेळोवेळी होणारे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या मित्र-मैत्रीणीची नावे माहीत करून घेणे गरजेचे आहे. मोबाईल आणि व्हॉटस्अ‍ॅपही तपासण्याची गरज आहे. अन्यथा पालकांवर मन:स्ताप करण्याची वेळ येऊ शकते.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट