शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ: महिनाभरात १६ अल्पवयीन तरुणींचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 13:57 IST

आंधळ्या प्रेमासाठी जीवापाड प्रेम करणाऱ्या आई-वडिलांना सोडून यवतमाळातून तब्बल १६ अल्पवयीन तरुणींनी पलायन केल्याचे शहरातील विविध ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्यावरून पुढे आले आहे.

ठळक मुद्देपालकांना मन:स्तापविविध ठाण्यात गुन्हे दाखल, आंधळ्या प्रेमात सोडले घरदार

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आंधळ्या प्रेमासाठी जीवापाड प्रेम करणाऱ्या आई-वडिलांना सोडून यवतमाळातून तब्बल १६ अल्पवयीन तरुणींनी पलायन केल्याचे शहरातील विविध ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्यावरून पुढे आले आहे. या तरुणींना फूस लावून पळविल्याच्या तक्रारी पोलिसात देण्यात आल्या असून पोलीस अशा ‘बेपत्ता’ तरुणींचा शोध घेत आहे. सोशल मीडिया आणि विविध माध्यमातून प्रेमाचे होणारे उदात्तीकरण आणि आकर्षण यातून अल्पवयीन तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेम पाशात अडकत आहे. कुटुंबियांचे दुर्लक्ष झाले की, मग त्या कुटुंबावर नको तो प्रसंग उद्भवतो. शिक्षण घेण्याच्या वयात प्रेमाच्या आनाभाका घेत युगुल बेपत्ता होते. सामाजिक बंधने झुगारुन ही मंडळी पलायन करतात. यवतमाळ शहरातील १४ ते १७ वयोगटातील तरुणी आणि १८ ते २५ वयोगटातील तरुण अशाच प्रेमपाशात अडकून घरदार सोडत आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ही मंडळी आई-वडिलांचा विचारही करीत नाही. मुलगी बेपत्ता झाल्यावर मात्र घराच्यांच्या पायाखालची वाळू सरकते. पालक पोलीस ठाणे गाठून मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार देतात.यवतमाळ शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविल्या जाणाऱ्या अशा घटनांची आकडेवारी मोठी आहे. यावरूनच भीषणता लक्षात येते. मार्च अखेरपर्यंत अवधूतवाडी पोलीस ठाण्यातून पाच अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या तक्रारी नोंदविल्या आहे. शहर पोलीस ठाण्यात दोन मुली, लोहारा, ग्रामीण पोलीस ठाणे येथेही अशा तक्रारींची नोंद आहे. विशेष म्हणजे तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेलेच प्रेमीयुगुल पसार झालेत, असे नाही तर एक २२ वर्षीय विवाहिताही आपल्या प्रियकरासोबत निघून गेल्याचे पुढे आले आहे. काही प्रकरणात पोलिसांनी तपास करून प्रेमीयुगुलांना ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलींना त्यांच्या आई-वडिलांच्या सुपूर्द केले. केवळ आकर्षणातून उचललेले हे पाऊल सर्वांनाच मन:स्ताप देणारे ठरत आहे.

पालकांनो मुलांना वेळीच समजून घ्याअनेक पालक आपल्या मुलांवर नको तितका विश्वास ठेवतात. आमचे मुले तशी नाही, असे सांगतात. परंतु तारुण्य सुलभ मनात काय सुरू आहे, याचा थांगपत्ताही पालकांना लागत नाही. मुलांकडे वेळोवेळी होणारे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या मित्र-मैत्रीणीची नावे माहीत करून घेणे गरजेचे आहे. मोबाईल आणि व्हॉटस्अ‍ॅपही तपासण्याची गरज आहे. अन्यथा पालकांवर मन:स्ताप करण्याची वेळ येऊ शकते.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट