शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

यवतमाळ जिल्ह्यात तीन एकरात १५ लाखांच्या हळदीचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 13:36 IST

नैसर्गिक असमतोल आणि इतर संकटामुळे पारंपरिक शेती अडचणीत आले आहे. यावर मात करत दारव्हा तालुक्यातील चिखली येथील युवा शेतकऱ्याने तीन एकरात १५ लाखांच्या हळदीचे उत्पादन घेतले. त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हळदीच्या विक्रमी उत्पन्नातून प्रगतीचा मार्ग शोधला.

ठळक मुद्देनीलेश डहाकेची यशोगाथा, पारंपरिक पिकांना पर्यायचिखली येथील युवा शेतकरी

मुकेश इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नैसर्गिक असमतोल आणि इतर संकटामुळे पारंपरिक शेती अडचणीत आले आहे. यावर मात करत दारव्हा तालुक्यातील चिखली येथील युवा शेतकऱ्याने तीन एकरात १५ लाखांच्या हळदीचे उत्पादन घेतले. त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हळदीच्या विक्रमी उत्पन्नातून प्रगतीचा मार्ग शोधला.नीलेश जयविजय डहाके रा.चिखली (रामनाथ) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. लहानपणापासून त्याला शेतीची आवड आहे. त्यामुळे नोकरी किंवा इतर व्यवसायाच्या मागे न लागता शेतीत करीअर करण्याचे त्याने ठरविले. योग्य पिकांची निवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि मेहनतीच्या बळावर त्याने घाट्याचा व्यवसाय समजल्या जाणाऱ्या शेतीत प्रगती केली आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न चांगले होईल अशा पिकाची त्याने निवड केली. गेल्या दोन वर्षापासून तो हळदीचे पीक घेत आहे. पहिल्या वर्षी दोन एकर क्षेत्रात लागवड केली. गावातील शेतकरी रघुनाथ डहाके यांचे कडून ३६ हजार रुपयांचे बेणे विकत घेतले. पहिल्या वर्षी दोन एकरामध्ये ३०० क्विंटल उत्पन्न झाले. पहिल्याच वर्षी उत्पन्न चांगले झाल्याने उत्साह वाढला. त्यामुळे तीन एकरात हळदीची लागवड केली. घरचे बेणे असल्याने खर्च वाचला. वाही, बेड तयार करणे सिंचन, रासायनिक खते, मायक्रोन्युट्रनचे डोज, निंदन, आंतरमशागत याचे योग्य नियोजन केले. तीन एकरात ६०० क्विंटल उत्पन्न झाले. त्यामधील साडेतीन लाखाची १६० क्विंटल हळद बेणेकरीता विकली. इतर बॉयलरच्या सहाय्याने उकडण्यात आली. सुकलेली हळद १५० क्विंटल आहे. यावर्षी सध्या हळदीचे आठ हजार रुपये क्विंटलचे भाव आहे. त्यामुळे आजच्या बाजार भावाप्रमाणे १२ लाखाची हळद त्याच्याकडे आहे. योग्य भाव मिळताच विक्री करण्याचे ठरविले असल्याचे त्याने सांगितले. आजचा जरी हीशोब लावला तरी तीन एकरात १५ लाखाच्या वर उत्पन्न झाले आहे. शेतीव्यवसायात चांगले उत्पन्न घेऊन नीलेश डहाकेने आजच्या पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.

वडिलांचा अनुभव भावाचे मार्गदर्शनआपल्या या यशस्वी प्रयोगासाठी वडील जयविजय डहाके यांच्या शेतीतील अनुभवातून बरेच काही शिकता आले. तर थोरला भाऊ शैलेश डहाके यांचे पिकाची निवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबतचे मार्गदर्शन कामी आल्याचे नीलेशने सांगितले.

टॅग्स :agricultureशेती