शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

यवतमाळ जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१.८५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 19:00 IST

यवतमाळ येथील श्रेया संजय बाजोरिया या विद्यार्थिनीने ९५.३८ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.

ठळक मुद्देश्रेया बाजोरिया अव्वल जिल्ह्याचा निकाल अमरावती विभागात तिसऱ्या स्थानी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात यवतमाळ जिल्ह्याचा निकाल ९१.८५ टक्के लागला. यंदा ३१ हजार ६०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी २९ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.यवतमाळ येथील श्रेया संजय बाजोरिया या विद्यार्थिनीने ९५.३८ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. ती जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी असून दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील मूळ रहिवासी आहे. तर याच शाळेच्या साक्षी हरीश जाधवाणी या विद्यार्थिनीने ९४.१५ टक्के गुणांसह वाणिज्य शाखेतून पहिला क्रमांक पटकाविला आहे. अभ्यंकर कन्या शाळेची प्रगती सुखदेव भरणे ही विद्यार्थिनी ८९.३८ टक्के गुणांसह कला शाखेतून पहिली ठरली आहे.

जिल्ह्याचा निकाल सुधारलामागील वर्षीपेक्षा यंदा यवतमाळ जिल्ह्याचा निकाल सुधारला आहे. गेल्या वर्षी केवळ ८६ टक्के निकालासह यवतमाळ जिल्हा अमरावती विभागात ढांग होता. यंदा ९१.८५ पर्यंत निकालाची टक्केवारी वाढली असून विभागातील पाच जिल्ह्यात यवतमाळ तिसºया क्रमांकावर पोहोचला आहे.

जिल्ह्यात महागाव टॉप तर मारेगाव ढांगयंदा जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत २९ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे २०६५ विद्यार्थ्यांनी यंदा विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली आहे. तर १२ हजार ६९५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकाविली आहे. तालुकानिहाय टक्केवारी पाहता महागाव तालुक्याने ९६.१९ टक्के निकालासह जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले. तर मारेगाव तालुका ७९.६६ टक्के निकाल घेऊन जिल्ह्यात ढांग ठरला आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल