शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

शेततळ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 13:29 IST

मागेल त्याला शेततळे हा शासनाचा महत्वकांक्षी उपक्रम यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे.

ठळक मुद्देनियोजनातून सहा हजार हेक्टरवर संरक्षित सिंचनाची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागेल त्याला शेततळे हा शासनाचा महत्वकांक्षी उपक्रम यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे. जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबवून संपूर्ण जिल्ह्यात ४ जून २०१८ अखेरपर्यंत ६ हजार ३१२ शेततळ्यांची निर्मिती केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सहा हजार हेक्टरवर संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे.गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिकांवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे ही महत्वाकांक्षी योजना १७ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयान्वये सुरू केली. यवतमाळ जिल्ह्यात २०१७ च्या खरीप हंगामात सरासरीच्या तुलनेत केवळ ६६ टक्केच पाऊस झाला. परिणामी रब्बी व उन्हाळी पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली. भविष्यात पडणारा पाऊस शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरविला तर शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीस मदत होईल, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने शेततळ्यासंदर्भात विशेष मोहीम हाती घेतली. विशेष म्हणजे यात कृषी विभागासोबत जिल्ह्यातील संपूर्ण महसूल यंत्रणा सहभागी झाल्यामुळे निश्चित उद्दिष्ट वेळेपूर्वीच गाठता आले.शेततळे निर्माण करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागामध्ये समन्वय साधण्यात आला. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बैठका तालुका स्तरावर घेण्यात आल्या. शेतकऱ्यांना या योजनेचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच प्रशासनाने शेतकऱ्यांचा मशीनधारकाशी समन्वय घडवून आणला. समूह पध्दतीने शेततळे निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केल्यामुळे शेतकरी व मशीनधारकाचा फायदा झाला. शेततळ्याचे अनुदान प्राप्त होताच मशीनधारकाला त्वरीत रक्कम अदा करण्यात येऊ लागली.यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण १६ तालुके मिळून ४ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. योजना सुरू झाल्यापासून दीड वर्षात म्हणजे २४ नोव्हेंबर २०१७ पर्यंत केवळ १ हजार ६४९ शेततळे पूर्ण झाले होते. जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेऊन सर्व तालुक्यात प्रती दिवस ३३ ते ४० शेततळे याप्रमाणे कामे केली.सर्वांच्या समन्वयातून शेततळ्यामध्ये जिल्हा प्रथम : जिल्हाधिकारी डॉ. देशमुखमागेल त्याला शेततळे' या योजनेच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यात संरक्षित सिंचन निर्माण होण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे ही योजना प्रभावीपणे राबविण्याचे निश्चित केले. शासन स्तरावर पाठपुरावा करून या योजनेसाठी इतर जिल्ह्याचा अखर्चित निधी यवतमाळ जिल्ह्यासाठी वळविण्यात यश मिळाले. सर्वांच्या समन्वयातूनच यवतमाळ जिल्हा हा मागेल त्याला शेततळे' या योजनेत राज्यात अव्वल ठरला. उद्दिष्ट पूर्ण झाले असले तरी शेततळ्यांची कामे सुरूच राहणार आहे.

टॅग्स :agricultureशेती