शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

शेततळ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 13:29 IST

मागेल त्याला शेततळे हा शासनाचा महत्वकांक्षी उपक्रम यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे.

ठळक मुद्देनियोजनातून सहा हजार हेक्टरवर संरक्षित सिंचनाची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागेल त्याला शेततळे हा शासनाचा महत्वकांक्षी उपक्रम यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे. जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबवून संपूर्ण जिल्ह्यात ४ जून २०१८ अखेरपर्यंत ६ हजार ३१२ शेततळ्यांची निर्मिती केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सहा हजार हेक्टरवर संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे.गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिकांवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे ही महत्वाकांक्षी योजना १७ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयान्वये सुरू केली. यवतमाळ जिल्ह्यात २०१७ च्या खरीप हंगामात सरासरीच्या तुलनेत केवळ ६६ टक्केच पाऊस झाला. परिणामी रब्बी व उन्हाळी पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली. भविष्यात पडणारा पाऊस शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरविला तर शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीस मदत होईल, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने शेततळ्यासंदर्भात विशेष मोहीम हाती घेतली. विशेष म्हणजे यात कृषी विभागासोबत जिल्ह्यातील संपूर्ण महसूल यंत्रणा सहभागी झाल्यामुळे निश्चित उद्दिष्ट वेळेपूर्वीच गाठता आले.शेततळे निर्माण करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागामध्ये समन्वय साधण्यात आला. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बैठका तालुका स्तरावर घेण्यात आल्या. शेतकऱ्यांना या योजनेचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच प्रशासनाने शेतकऱ्यांचा मशीनधारकाशी समन्वय घडवून आणला. समूह पध्दतीने शेततळे निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केल्यामुळे शेतकरी व मशीनधारकाचा फायदा झाला. शेततळ्याचे अनुदान प्राप्त होताच मशीनधारकाला त्वरीत रक्कम अदा करण्यात येऊ लागली.यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण १६ तालुके मिळून ४ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. योजना सुरू झाल्यापासून दीड वर्षात म्हणजे २४ नोव्हेंबर २०१७ पर्यंत केवळ १ हजार ६४९ शेततळे पूर्ण झाले होते. जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेऊन सर्व तालुक्यात प्रती दिवस ३३ ते ४० शेततळे याप्रमाणे कामे केली.सर्वांच्या समन्वयातून शेततळ्यामध्ये जिल्हा प्रथम : जिल्हाधिकारी डॉ. देशमुखमागेल त्याला शेततळे' या योजनेच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यात संरक्षित सिंचन निर्माण होण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे ही योजना प्रभावीपणे राबविण्याचे निश्चित केले. शासन स्तरावर पाठपुरावा करून या योजनेसाठी इतर जिल्ह्याचा अखर्चित निधी यवतमाळ जिल्ह्यासाठी वळविण्यात यश मिळाले. सर्वांच्या समन्वयातूनच यवतमाळ जिल्हा हा मागेल त्याला शेततळे' या योजनेत राज्यात अव्वल ठरला. उद्दिष्ट पूर्ण झाले असले तरी शेततळ्यांची कामे सुरूच राहणार आहे.

टॅग्स :agricultureशेती