शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

यवतमाळ जिल्ह्यात १८ एकरातील कपाशीवर शेतकऱ्याने फिरविले रोटावेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 20:39 IST

सोयाबीन पाठोपाठ कपाशीचे पीकही शेतातून उपटून फेकण्याचा सपाटा यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी लावला आहे.

ठळक मुद्देबोंडअळीचा परिणामलागवड खर्चही निघाला नाही, तीन लाख गेले पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : सोयाबीन पाठोपाठ कपाशीचे पीकही शेतातून उपटून फेकण्याचा सपाटा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी लावला आहे. लागवडीचा खर्चही निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शेतात जनावरे सोडणे, ट्रॅक्टर चालविणे, राेटावेटर फिरविणे सुरू केले आहे. नेर, आर्णी, यवतमाळ, मारेगाव, झरीजामणी तालुक्यात या घटना घडल्या आहेत. राळेगावातही बुधवारी हा प्रकार पहायला मिळाला.

राळेगाव तालुक्याच्या आष्टा येथील अमृत खंडारे यांनी १८ एकरात सोयाबीन व कपाशीची लागवड केली होती. अतिवृष्टीमुळे पाच एकरातील सोयाबीन हातचे निघून गेले. त्यामुळे त्यांची आशा १३ एकरातील कपाशीवर होती. परंतु परतीचा पाऊस व बोंडअळीने कपाशीचे पीकही नेस्तनाबूत केले. मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने कीटकनाशक फवारणीनेही ते नियंत्रण येणार नाही याची जाणीव झाल्याने शेतकरी अमृत खंडारे हतबल झाले. ते एकत्र कुटुंब पद्धतीने शेती करतात. शासनाच्या नियमानुसार दोन हेक्टरपेक्षा अधिक शेती असल्याने ती मदतीस पात्र ठरत नाही. यावर्षी त्यांनी सोयाबीन, कपाशी लागवडीवर तीन लाख रुपयांचा खर्च केला. मात्र प्रत्यक्षात नफा तर दूर लागवड खर्चही निघणे कठीण झाले आहे. लावलेल्या पैशावर आणि अनेक महिने घेतलेल्या परिश्रमावर पाणी फेरले गेल्याने संतप्त शेतकऱ्याने बुधवारी शेतात थेट रोटावेटर लावून संपूर्ण १८ एकरातील सोयाबीन व कपाशी उपटून फेकली. या कुटुंबासमोर आता पुढे जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :agricultureशेती