शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

यवतमाळ जिल्ह्यात १८ एकरातील कपाशीवर शेतकऱ्याने फिरविले रोटावेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 20:39 IST

सोयाबीन पाठोपाठ कपाशीचे पीकही शेतातून उपटून फेकण्याचा सपाटा यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी लावला आहे.

ठळक मुद्देबोंडअळीचा परिणामलागवड खर्चही निघाला नाही, तीन लाख गेले पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : सोयाबीन पाठोपाठ कपाशीचे पीकही शेतातून उपटून फेकण्याचा सपाटा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी लावला आहे. लागवडीचा खर्चही निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शेतात जनावरे सोडणे, ट्रॅक्टर चालविणे, राेटावेटर फिरविणे सुरू केले आहे. नेर, आर्णी, यवतमाळ, मारेगाव, झरीजामणी तालुक्यात या घटना घडल्या आहेत. राळेगावातही बुधवारी हा प्रकार पहायला मिळाला.

राळेगाव तालुक्याच्या आष्टा येथील अमृत खंडारे यांनी १८ एकरात सोयाबीन व कपाशीची लागवड केली होती. अतिवृष्टीमुळे पाच एकरातील सोयाबीन हातचे निघून गेले. त्यामुळे त्यांची आशा १३ एकरातील कपाशीवर होती. परंतु परतीचा पाऊस व बोंडअळीने कपाशीचे पीकही नेस्तनाबूत केले. मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने कीटकनाशक फवारणीनेही ते नियंत्रण येणार नाही याची जाणीव झाल्याने शेतकरी अमृत खंडारे हतबल झाले. ते एकत्र कुटुंब पद्धतीने शेती करतात. शासनाच्या नियमानुसार दोन हेक्टरपेक्षा अधिक शेती असल्याने ती मदतीस पात्र ठरत नाही. यावर्षी त्यांनी सोयाबीन, कपाशी लागवडीवर तीन लाख रुपयांचा खर्च केला. मात्र प्रत्यक्षात नफा तर दूर लागवड खर्चही निघणे कठीण झाले आहे. लावलेल्या पैशावर आणि अनेक महिने घेतलेल्या परिश्रमावर पाणी फेरले गेल्याने संतप्त शेतकऱ्याने बुधवारी शेतात थेट रोटावेटर लावून संपूर्ण १८ एकरातील सोयाबीन व कपाशी उपटून फेकली. या कुटुंबासमोर आता पुढे जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :agricultureशेती