शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

यवतमाळ जिल्ह्यात १८ एकरातील कपाशीवर शेतकऱ्याने फिरविले रोटावेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 20:39 IST

सोयाबीन पाठोपाठ कपाशीचे पीकही शेतातून उपटून फेकण्याचा सपाटा यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी लावला आहे.

ठळक मुद्देबोंडअळीचा परिणामलागवड खर्चही निघाला नाही, तीन लाख गेले पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : सोयाबीन पाठोपाठ कपाशीचे पीकही शेतातून उपटून फेकण्याचा सपाटा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी लावला आहे. लागवडीचा खर्चही निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शेतात जनावरे सोडणे, ट्रॅक्टर चालविणे, राेटावेटर फिरविणे सुरू केले आहे. नेर, आर्णी, यवतमाळ, मारेगाव, झरीजामणी तालुक्यात या घटना घडल्या आहेत. राळेगावातही बुधवारी हा प्रकार पहायला मिळाला.

राळेगाव तालुक्याच्या आष्टा येथील अमृत खंडारे यांनी १८ एकरात सोयाबीन व कपाशीची लागवड केली होती. अतिवृष्टीमुळे पाच एकरातील सोयाबीन हातचे निघून गेले. त्यामुळे त्यांची आशा १३ एकरातील कपाशीवर होती. परंतु परतीचा पाऊस व बोंडअळीने कपाशीचे पीकही नेस्तनाबूत केले. मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने कीटकनाशक फवारणीनेही ते नियंत्रण येणार नाही याची जाणीव झाल्याने शेतकरी अमृत खंडारे हतबल झाले. ते एकत्र कुटुंब पद्धतीने शेती करतात. शासनाच्या नियमानुसार दोन हेक्टरपेक्षा अधिक शेती असल्याने ती मदतीस पात्र ठरत नाही. यावर्षी त्यांनी सोयाबीन, कपाशी लागवडीवर तीन लाख रुपयांचा खर्च केला. मात्र प्रत्यक्षात नफा तर दूर लागवड खर्चही निघणे कठीण झाले आहे. लावलेल्या पैशावर आणि अनेक महिने घेतलेल्या परिश्रमावर पाणी फेरले गेल्याने संतप्त शेतकऱ्याने बुधवारी शेतात थेट रोटावेटर लावून संपूर्ण १८ एकरातील सोयाबीन व कपाशी उपटून फेकली. या कुटुंबासमोर आता पुढे जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :agricultureशेती