शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळ्यातच १५ हजार विद्यार्थी पहिलीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 14:59 IST

शाळा सुरू होण्याच्या दीड महिना आधीच तब्बल १५ हजार २१५ विद्यार्थ्यांची पटनोंदणी करून त्यांना पहिल्या वर्गात दाखलही करून घेतले आहे. उन्हाळी सुटीत पटनोंदणीचा उपक्रम राबविणारी यवतमाळ जिल्हा परिषद राज्यात एकमेव ठरली आहे.

ठळक मुद्देराज्यात एकमेव उदाहरणजिल्हा परिषद शाळांची भरारी

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील अनुदानित संस्थांच्या शाळांना विद्यार्थी मिळेनासे झालेले असताना जिल्हा परिषदेच्या शाळांनी मात्र यशस्वी कामगिरी बजावली आहे. शाळा सुरू होण्याच्या दीड महिना आधीच तब्बल १५ हजार २१५ विद्यार्थ्यांची पटनोंदणी करून त्यांना पहिल्या वर्गात दाखलही करून घेतले आहे. उन्हाळी सुटीत पटनोंदणीचा उपक्रम राबविणारी यवतमाळ जिल्हा परिषद राज्यात एकमेव ठरली आहे.दरवर्षी, गावातील दाखलपात्र विद्यार्थी इंग्रजी शाळा खेचून नेतात. त्यासाठी स्कूल बसचाही पर्याय खेड्यातील पालकांना दिला जातो. या महागड्या शाळांमध्ये जाण्यापेक्षा खेड्यातील मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत यावी, याकरिता यंदा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला होता. कुठेही गाजावाजा न करता जिल्हा परिषद शाळांच्या केंद्र प्रमुखांना ‘टार्गेट’ देण्यात आले. केंद्रातील प्रत्येक गावात किती दाखलपात्र विद्यार्थी आहेत, ते पडताळून त्यांच्या पालकांना भेटून मुलांना शाळेत आणण्याची सूचना देण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्यासाठी एक आॅनलाईन लिंक तयार करून प्रत्येक शिक्षकाच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आली. कोणत्या शाळेत किती विद्यार्थ्यांची पटनोंदणी करण्यात आली, त्याची माहिती दररोज या लिंकवर भरली गेली.विशेष म्हणजे, उन्हाळी सुटीतच दाखल केलेल्या या विद्यार्थ्यांसाठी अनेक शाळांनी सुटीमध्येही आनंददायी वर्ग भरविले. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील २१०१ शाळांमध्ये हा उपक्रम राबविला गेला. शिक्षकांनी मार्च महिन्यात गावात फिरून दाखलपात्र विद्यार्थ्यांना शाळेत आणले. त्यांचा स्वागत समारंभ घेतला. त्यांच्यासाठी खेळ, गाण्यांचे कार्यक्रम घेतले. २१०१ पैकी आतापर्यंत १७५४ शाळांनी १५ हजार २१५ विद्यार्थ्यांची पटनोंदणी केल्याची आकडेवारी लिंकवर भरण्यात आली आहे. तर इतर शाळांनीही पटनोंदणी केली आहे.

पुसद, उमरखेड, आर्णी, घाटंजीची झेपशाळापूर्व पटनोंदणी उपक्रमात पुसद, उमरखेड, आर्णी, घाटंजी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी बाजी मारली आहे. पुसद तालुक्यात तब्बल २०५२, उमरखेड १७९९, महागाव १६००, आर्णी १११६, तर घाटंजी तालुक्यात १०२४ विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीतच पहिल्या वर्गात दाखल करण्यात आले. त्यानंतर दारव्हा तालुक्यात १०१९, यवतमाळात ९५१, दिग्रसमध्ये ७१६, कळंब ७११, नेर ६९१, झरी ६५८, बाभूळगाव ६५६, पांढरकवडा ६२६, मारेगाव ६०२, वणी ५५८, तर राळेगावात ४३६ विद्यार्थी उन्हाळी सुटीतच जिल्हा परिषद शाळेत दाखल झाले आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र