शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळ्यातच १५ हजार विद्यार्थी पहिलीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 14:59 IST

शाळा सुरू होण्याच्या दीड महिना आधीच तब्बल १५ हजार २१५ विद्यार्थ्यांची पटनोंदणी करून त्यांना पहिल्या वर्गात दाखलही करून घेतले आहे. उन्हाळी सुटीत पटनोंदणीचा उपक्रम राबविणारी यवतमाळ जिल्हा परिषद राज्यात एकमेव ठरली आहे.

ठळक मुद्देराज्यात एकमेव उदाहरणजिल्हा परिषद शाळांची भरारी

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील अनुदानित संस्थांच्या शाळांना विद्यार्थी मिळेनासे झालेले असताना जिल्हा परिषदेच्या शाळांनी मात्र यशस्वी कामगिरी बजावली आहे. शाळा सुरू होण्याच्या दीड महिना आधीच तब्बल १५ हजार २१५ विद्यार्थ्यांची पटनोंदणी करून त्यांना पहिल्या वर्गात दाखलही करून घेतले आहे. उन्हाळी सुटीत पटनोंदणीचा उपक्रम राबविणारी यवतमाळ जिल्हा परिषद राज्यात एकमेव ठरली आहे.दरवर्षी, गावातील दाखलपात्र विद्यार्थी इंग्रजी शाळा खेचून नेतात. त्यासाठी स्कूल बसचाही पर्याय खेड्यातील पालकांना दिला जातो. या महागड्या शाळांमध्ये जाण्यापेक्षा खेड्यातील मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत यावी, याकरिता यंदा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला होता. कुठेही गाजावाजा न करता जिल्हा परिषद शाळांच्या केंद्र प्रमुखांना ‘टार्गेट’ देण्यात आले. केंद्रातील प्रत्येक गावात किती दाखलपात्र विद्यार्थी आहेत, ते पडताळून त्यांच्या पालकांना भेटून मुलांना शाळेत आणण्याची सूचना देण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्यासाठी एक आॅनलाईन लिंक तयार करून प्रत्येक शिक्षकाच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आली. कोणत्या शाळेत किती विद्यार्थ्यांची पटनोंदणी करण्यात आली, त्याची माहिती दररोज या लिंकवर भरली गेली.विशेष म्हणजे, उन्हाळी सुटीतच दाखल केलेल्या या विद्यार्थ्यांसाठी अनेक शाळांनी सुटीमध्येही आनंददायी वर्ग भरविले. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील २१०१ शाळांमध्ये हा उपक्रम राबविला गेला. शिक्षकांनी मार्च महिन्यात गावात फिरून दाखलपात्र विद्यार्थ्यांना शाळेत आणले. त्यांचा स्वागत समारंभ घेतला. त्यांच्यासाठी खेळ, गाण्यांचे कार्यक्रम घेतले. २१०१ पैकी आतापर्यंत १७५४ शाळांनी १५ हजार २१५ विद्यार्थ्यांची पटनोंदणी केल्याची आकडेवारी लिंकवर भरण्यात आली आहे. तर इतर शाळांनीही पटनोंदणी केली आहे.

पुसद, उमरखेड, आर्णी, घाटंजीची झेपशाळापूर्व पटनोंदणी उपक्रमात पुसद, उमरखेड, आर्णी, घाटंजी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी बाजी मारली आहे. पुसद तालुक्यात तब्बल २०५२, उमरखेड १७९९, महागाव १६००, आर्णी १११६, तर घाटंजी तालुक्यात १०२४ विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीतच पहिल्या वर्गात दाखल करण्यात आले. त्यानंतर दारव्हा तालुक्यात १०१९, यवतमाळात ९५१, दिग्रसमध्ये ७१६, कळंब ७११, नेर ६९१, झरी ६५८, बाभूळगाव ६५६, पांढरकवडा ६२६, मारेगाव ६०२, वणी ५५८, तर राळेगावात ४३६ विद्यार्थी उन्हाळी सुटीतच जिल्हा परिषद शाळेत दाखल झाले आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र