शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी आज यवतमाळ बंद

By admin | Updated: June 5, 2017 01:15 IST

मुख्यमंत्र्यांची घोषणा फसवी असून शेतकऱ्यांचा संप मिटलेला नाही. उलट आत्ताच खरा संप पेटला आहे.

संप मिटला नाही पेटला : शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीची वज्रमूठलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुख्यमंत्र्यांची घोषणा फसवी असून शेतकऱ्यांचा संप मिटलेला नाही. उलट आत्ताच खरा संप पेटला आहे. शेतकऱ्यांनी सोमवारी ५ जून रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यवतमाळात हा बंद यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्षांसह विविध संघटना एकवटल्या असून शेतकरी न्याय हक्क आंदोलन समिती स्थापन करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी सोमवारी कडकडीत यवतमाळ बंद पाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन समितीने पत्रकार परिषदेत केले.समितीचे निमंत्रक देवानंद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची २०१५ ची दुष्काळी मदत अद्याप दिली नाही. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही आश्वासनावर आमचा विश्वास उरला नाही. शेतकऱ्यांचा संप हा सर्व समाज व्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन शेतकरी न्याय हक्क आंदोलन समिती स्थापन केली. उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये आम्ही सहभागी असून यवतमाळात कडकडीत बंद पाळण्यात येईल. या समितीमध्ये लोकजागृती मंच, युवा शेतकरी संघर्ष समिती, विदर्भ राज्य आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, जनता दल युनायटेड महिला आघाडी, ओबीसी संघटना, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद, विदर्भ मुस्लिम मोर्चा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बेंबळा कालवेग्रस्त संघर्ष समिती, प्रहार, मुव्हमेंट फॉर पिस अँड जस्टीस, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, गोर सेना आदी संघटना सहभागी आहेत. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधला असता त्यांनीही बंदमध्ये सहभागी होण्याला पाठिंबा दिला आहे. मात्र भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी सहभागी होण्यास नकार दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देवानंद पवार यांनी दिली. असे असेल आंदोलन सकाळी ८ वाजता बसस्थानक चौकात डॉ.आंबेडकर आणि नाट्यगृह परिसरातील शिवाजी महाराज, येरावार चौकात महात्मा फुले, जिल्हा परिषदेतील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले जाईल. या फेरीदरम्यान नागरिकांना आपापली प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन समिती करणार आहे.