शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

शेतकऱ्यांसाठी आज यवतमाळ बंद

By admin | Updated: June 5, 2017 01:15 IST

मुख्यमंत्र्यांची घोषणा फसवी असून शेतकऱ्यांचा संप मिटलेला नाही. उलट आत्ताच खरा संप पेटला आहे.

संप मिटला नाही पेटला : शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीची वज्रमूठलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुख्यमंत्र्यांची घोषणा फसवी असून शेतकऱ्यांचा संप मिटलेला नाही. उलट आत्ताच खरा संप पेटला आहे. शेतकऱ्यांनी सोमवारी ५ जून रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यवतमाळात हा बंद यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्षांसह विविध संघटना एकवटल्या असून शेतकरी न्याय हक्क आंदोलन समिती स्थापन करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी सोमवारी कडकडीत यवतमाळ बंद पाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन समितीने पत्रकार परिषदेत केले.समितीचे निमंत्रक देवानंद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची २०१५ ची दुष्काळी मदत अद्याप दिली नाही. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही आश्वासनावर आमचा विश्वास उरला नाही. शेतकऱ्यांचा संप हा सर्व समाज व्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन शेतकरी न्याय हक्क आंदोलन समिती स्थापन केली. उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये आम्ही सहभागी असून यवतमाळात कडकडीत बंद पाळण्यात येईल. या समितीमध्ये लोकजागृती मंच, युवा शेतकरी संघर्ष समिती, विदर्भ राज्य आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, जनता दल युनायटेड महिला आघाडी, ओबीसी संघटना, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद, विदर्भ मुस्लिम मोर्चा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बेंबळा कालवेग्रस्त संघर्ष समिती, प्रहार, मुव्हमेंट फॉर पिस अँड जस्टीस, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, गोर सेना आदी संघटना सहभागी आहेत. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधला असता त्यांनीही बंदमध्ये सहभागी होण्याला पाठिंबा दिला आहे. मात्र भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी सहभागी होण्यास नकार दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देवानंद पवार यांनी दिली. असे असेल आंदोलन सकाळी ८ वाजता बसस्थानक चौकात डॉ.आंबेडकर आणि नाट्यगृह परिसरातील शिवाजी महाराज, येरावार चौकात महात्मा फुले, जिल्हा परिषदेतील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले जाईल. या फेरीदरम्यान नागरिकांना आपापली प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन समिती करणार आहे.