शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
3
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
4
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
5
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
6
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
7
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
8
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
9
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
10
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
11
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
12
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
13
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
14
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
15
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
16
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
17
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
18
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'

शेतकऱ्यांसाठी आज यवतमाळ बंद

By admin | Updated: June 5, 2017 01:15 IST

मुख्यमंत्र्यांची घोषणा फसवी असून शेतकऱ्यांचा संप मिटलेला नाही. उलट आत्ताच खरा संप पेटला आहे.

संप मिटला नाही पेटला : शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीची वज्रमूठलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुख्यमंत्र्यांची घोषणा फसवी असून शेतकऱ्यांचा संप मिटलेला नाही. उलट आत्ताच खरा संप पेटला आहे. शेतकऱ्यांनी सोमवारी ५ जून रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यवतमाळात हा बंद यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्षांसह विविध संघटना एकवटल्या असून शेतकरी न्याय हक्क आंदोलन समिती स्थापन करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी सोमवारी कडकडीत यवतमाळ बंद पाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन समितीने पत्रकार परिषदेत केले.समितीचे निमंत्रक देवानंद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची २०१५ ची दुष्काळी मदत अद्याप दिली नाही. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही आश्वासनावर आमचा विश्वास उरला नाही. शेतकऱ्यांचा संप हा सर्व समाज व्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन शेतकरी न्याय हक्क आंदोलन समिती स्थापन केली. उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये आम्ही सहभागी असून यवतमाळात कडकडीत बंद पाळण्यात येईल. या समितीमध्ये लोकजागृती मंच, युवा शेतकरी संघर्ष समिती, विदर्भ राज्य आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, जनता दल युनायटेड महिला आघाडी, ओबीसी संघटना, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद, विदर्भ मुस्लिम मोर्चा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बेंबळा कालवेग्रस्त संघर्ष समिती, प्रहार, मुव्हमेंट फॉर पिस अँड जस्टीस, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, गोर सेना आदी संघटना सहभागी आहेत. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधला असता त्यांनीही बंदमध्ये सहभागी होण्याला पाठिंबा दिला आहे. मात्र भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी सहभागी होण्यास नकार दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देवानंद पवार यांनी दिली. असे असेल आंदोलन सकाळी ८ वाजता बसस्थानक चौकात डॉ.आंबेडकर आणि नाट्यगृह परिसरातील शिवाजी महाराज, येरावार चौकात महात्मा फुले, जिल्हा परिषदेतील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले जाईल. या फेरीदरम्यान नागरिकांना आपापली प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन समिती करणार आहे.