शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

थकीत बिलापोटी पसरणार यवतमाळ शहरात अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:10 IST

पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या यवतमाळकरांना आता अंधाराचाही सामना करावा लागणार आहे. दोन कोटी ८१ लाख रुपये वीज बिल थकीत असल्याने महावितरण बुधवारी शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा शॉक : पालिकेकडे पथदिव्यांचे पावणे तीन कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या यवतमाळकरांना आता अंधाराचाही सामना करावा लागणार आहे. दोन कोटी ८१ लाख रुपये वीज बिल थकीत असल्याने महावितरण बुधवारी शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार आहे. वारंवार नोटीस बजावूनही नगरपरिषदेने थकीत बिलाची रक्कम भरली नाही.यवतमाळ शहरात २३ हजार ५०० पथदिवे आहेत. शहरातील विविध मार्गावर असलेल्या पथदिव्यांमुळे रात्री शहरात झगमगाट असतो. मात्र या पथदिव्यांचे नगरपरिषदेने बिल मात्र भरले नाही. यवतमाळ नगरपालिका व संलग्नीत लोहारा, वाघापूर, मोहा, उमरसरा, वडगाव आदी परिसरासह संपूर्ण शहरातील पथदिव्यांच्या वीज बिलापोटी दोन कोटी ८१ लाख ३८ हजार ७७९ रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी महावितरण कंपनीने नगरपरिषदेला वारंवार विनंती केली. पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा करण्यात आला. वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस २३ फेब्रुवारीला बजावण्यात आली. त्यासोबतच वीज वितरण कंपनीच्यावतीने मौखिक विनंतीही करण्यात आली. परंतु नगरपरिषदेने वीज बिल मात्र भरले नाही. महावितरणने नोटीसमध्ये दिलेला १५ दिवसाचा कालावधीही निघून गेला. परंतु नगरपरिषद कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही. परिणामी वीज वितरण कंपनी बुधवारी यवतमाळ शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार असल्याचे महावितरण कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी कळविले आहे. यवतमाळ शहरात ११५ कनेक्शनवरून वीज पुरवठा केला जातो. नगरपरिषदेने बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत वीज बिल भरले नाही तर सेक्शन आॅफीसचे कर्मचारी ११५ ठिकाणावरुन पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार आहे. यवतमाळ शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित झाला तर शहरात अंधाराचे साम्राज्य पसरणार आहे.यवतमाळ शहरात ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. पाईपलाईनसाठीही खोदकाम करण्यात आले. यामुळे शहरातील एकही रस्ता चालण्यायोग्य नाही. पथदिवे असतानाही खड्ड्यात वाहन उसळून अपघात होत आहे. पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना रात्री वाहन चालविणे कठीण होणार आहे. आता नगरपरिषद काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.थकीत रक्कम विलीन होण्यापूर्वीच्या ग्रामपंचायतीकडीलपथदिव्यांचे थकीत असलेले बहुतांश बिल हे नगरपरिषदेत समाविष्ट होण्यापूर्वीच्या ग्रामपंचायतींचे आहे. जानेवारी २०१६ मध्ये शहरालगतच्या लोहारा, वाघापूर, मोहा, उमरसरा, वडगाव, पिंपळगाव, भोसा या ग्रामपंचायती समाविष्ठ झाल्या. त्यावेळी या ग्रामपंचायतीकडे मोठ्या प्रमाणात वीज बिल थकीत होते. आता या ग्रामपंचायतीच्या थकीत वीज बिलाचा भार नगरपरिषदेवर आला आहे. विशेष म्हणजे विलिनीकरणापूर्वीच्या यवतमाळ नगरपरिषदेतील वीज बिल नियमित भरले जात असल्याची माहिती आहे. मात्र आता समाविष्ठ ग्रामपंचायतीकडील थकीत वीज बिलापोटी संपूर्ण शहराला अंधारात जावे लागणार आहे.