शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

थकीत बिलापोटी पसरणार यवतमाळ शहरात अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:10 IST

पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या यवतमाळकरांना आता अंधाराचाही सामना करावा लागणार आहे. दोन कोटी ८१ लाख रुपये वीज बिल थकीत असल्याने महावितरण बुधवारी शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा शॉक : पालिकेकडे पथदिव्यांचे पावणे तीन कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या यवतमाळकरांना आता अंधाराचाही सामना करावा लागणार आहे. दोन कोटी ८१ लाख रुपये वीज बिल थकीत असल्याने महावितरण बुधवारी शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार आहे. वारंवार नोटीस बजावूनही नगरपरिषदेने थकीत बिलाची रक्कम भरली नाही.यवतमाळ शहरात २३ हजार ५०० पथदिवे आहेत. शहरातील विविध मार्गावर असलेल्या पथदिव्यांमुळे रात्री शहरात झगमगाट असतो. मात्र या पथदिव्यांचे नगरपरिषदेने बिल मात्र भरले नाही. यवतमाळ नगरपालिका व संलग्नीत लोहारा, वाघापूर, मोहा, उमरसरा, वडगाव आदी परिसरासह संपूर्ण शहरातील पथदिव्यांच्या वीज बिलापोटी दोन कोटी ८१ लाख ३८ हजार ७७९ रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी महावितरण कंपनीने नगरपरिषदेला वारंवार विनंती केली. पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा करण्यात आला. वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस २३ फेब्रुवारीला बजावण्यात आली. त्यासोबतच वीज वितरण कंपनीच्यावतीने मौखिक विनंतीही करण्यात आली. परंतु नगरपरिषदेने वीज बिल मात्र भरले नाही. महावितरणने नोटीसमध्ये दिलेला १५ दिवसाचा कालावधीही निघून गेला. परंतु नगरपरिषद कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही. परिणामी वीज वितरण कंपनी बुधवारी यवतमाळ शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार असल्याचे महावितरण कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी कळविले आहे. यवतमाळ शहरात ११५ कनेक्शनवरून वीज पुरवठा केला जातो. नगरपरिषदेने बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत वीज बिल भरले नाही तर सेक्शन आॅफीसचे कर्मचारी ११५ ठिकाणावरुन पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार आहे. यवतमाळ शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित झाला तर शहरात अंधाराचे साम्राज्य पसरणार आहे.यवतमाळ शहरात ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. पाईपलाईनसाठीही खोदकाम करण्यात आले. यामुळे शहरातील एकही रस्ता चालण्यायोग्य नाही. पथदिवे असतानाही खड्ड्यात वाहन उसळून अपघात होत आहे. पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना रात्री वाहन चालविणे कठीण होणार आहे. आता नगरपरिषद काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.थकीत रक्कम विलीन होण्यापूर्वीच्या ग्रामपंचायतीकडीलपथदिव्यांचे थकीत असलेले बहुतांश बिल हे नगरपरिषदेत समाविष्ट होण्यापूर्वीच्या ग्रामपंचायतींचे आहे. जानेवारी २०१६ मध्ये शहरालगतच्या लोहारा, वाघापूर, मोहा, उमरसरा, वडगाव, पिंपळगाव, भोसा या ग्रामपंचायती समाविष्ठ झाल्या. त्यावेळी या ग्रामपंचायतीकडे मोठ्या प्रमाणात वीज बिल थकीत होते. आता या ग्रामपंचायतीच्या थकीत वीज बिलाचा भार नगरपरिषदेवर आला आहे. विशेष म्हणजे विलिनीकरणापूर्वीच्या यवतमाळ नगरपरिषदेतील वीज बिल नियमित भरले जात असल्याची माहिती आहे. मात्र आता समाविष्ठ ग्रामपंचायतीकडील थकीत वीज बिलापोटी संपूर्ण शहराला अंधारात जावे लागणार आहे.