शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय सर्वेक्षणाने यवतमाळ शहर स्वच्छतेचा पर्दाफाश

By admin | Updated: May 6, 2017 00:11 IST

शहरातील घाणीचे साम्राज्य व नियमित न होणाऱ्या साफसफाईबाबत नगरसेवक व नागरिक नियमितच तक्रारी करतात.

देशात २३० वा क्रमांक : घाणीचे साम्राज्य, शहर झाले बकाल जिल्हा प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहरातील घाणीचे साम्राज्य व नियमित न होणाऱ्या साफसफाईबाबत नगरसेवक व नागरिक नियमितच तक्रारी करतात. परंतु आता शहरातील या साफसफाईचा खुद्द केंद्र शासनाच्या सर्वेक्षण अहवालानेच पर्दाफाश केला आहे. यवतमाळ नगरपरिषद स्वच्छतेमध्ये देशात तब्बल २३० व्या क्रमांकावर आहे. त्यावरून शहरातील साफसफाईचे कसे तीनतेरा वाजले असेल, याची कल्पना येते. कधीकाळी यवतमाळ नगरपरिषदेचे स्वच्छता अभियानामध्ये राज्यात नाव होते. या नगरपरिषदेने राज्यस्तरीय पुरस्कार मिळविले आहे. त्या काळात प्रत्यक्षात शहरातील अंतर्गत रस्ते, नाल्यांची सफाई, पथदिवे, खड्डेमुक्त रस्ते होते. परंतु त्यानंतर नगरपरिषदेमध्ये चाललेल्या ‘राजकारणाने’ संपूर्ण शहराचीच वाट लावली. आजही नगरपरिषद क्षेत्रातील साफसफाईची समस्या कायम आहे. गेल्या तीन वर्षांपासून शहराचा साफसफाईचा कंत्राट मुदतवाढीवर सुरू आहे. त्याचा वाद निकाली काढण्यात नगरपरिषदेचे पदाधिकारी व प्रशासनाला अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळेच शहराची ही अवस्था झाली आहे. या सफाई कंत्राटात अर्थकारण दडलेले आहे. नगरपरिषदेमध्ये समाविष्ट झालेल्या आठ ग्रामपंचायत क्षेत्रांची अवस्था तर आणखीनच बिकट आहे. शहरात कचरा नेणारी घंटागाडी क्वचितच दिसते. जिल्ह्यातील उमरखेड, पांढरकवडा या नगरपरिषदा कोटी-कोटी रुपयांचे विभागीय पुरस्कार पटकावत असताना जिल्हा मुख्यालयाची यवतमाळ नगरपरिषद मात्र एक-एक पाऊल मागे जाताना दिसते आहे. यातच नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक व प्रशासनाचे अपयश दडले आहे. यवतमाळ शहरातील डम्पिंग यार्डची समस्या कायम आहे. पावसाळा येऊ घातला असताना अद्यापही मान्सूनपूर्व उपाययोजना अर्थात नाले-नाल्यांची सफाई झालेली नाही. नगरपरिषदेची यंत्रणा केवळ हागणदारीवर लक्ष केंद्रित करून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचा व बहुमत भाजपाचे या विसंगत राजकारणामुळे यवतमाळ शहराचा विकास खुंटला आहे. नगरसेवकांची एनर्जी राजकारणातच खर्ची होत आहे. शहराची अवस्था पाहता देशात २३० वासुद्धा क्रमांक असेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मुख्याधिकारी धुपेंचा दावा आश्चर्यकारक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी यवतमाळ शहर स्वच्छतेमध्ये राज्यात २७ व्या, तर विदर्भात पहिल्या क्रमांकावर असल्याचा आश्चर्यकारक दावा केला आहे. शहराची प्रत्यक्ष अवस्था पाहता त्यांचा हा दावा कुणालाही हास्यास्पद वाटू शकतो.