शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

यवतमाळला केंद्रात प्रथमच लाल दिवा

By admin | Updated: November 8, 2014 22:43 IST

चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार हंसराज गंगाराम अहीर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश निश्चित झाला आहे. त्यांच्या रूपाने स्वातंत्र्यानंतर यवतमाळ जिल्ह्याला

हंसराज अहीर : गुरूवारीच झाले मंत्रिपद निश्चित, भाजपाचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते दिल्लीकडे रवानारवींद्र चांदेकर - वणीचंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार हंसराज गंगाराम अहीर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश निश्चित झाला आहे. त्यांच्या रूपाने स्वातंत्र्यानंतर यवतमाळ जिल्ह्याला प्रथम तर चंद्रपूर जिल्ह्याला दुसऱ्यांदा केंद्राचा लाल दिवा मिळणार आहे. मंगळवार ११ नोव्हेंबरला आपला ६0 वा वाढदिवस साजरा कणाऱ्या अहीर यांना केंद्रीय मंत्रिपदाची ही आगळीवेगळी भेट मिळणार आहे.खासदार अहीर यांचे वडील गंगाराम अहीर मलेरिया डॉक्टर होते. शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याने ते चंद्रपूरलाच स्थायिक झाले. हंसराज अहीर तेथेच लहानाचे मोठे झाले. एल.टी.वाय.हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. विद्यार्थी दशेपासूनच ते तत्कालीन जनसंघ आणि नंतर भाजपाशी जुळून होते. लोकांच्या समस्यांसाठी झटणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. कामगारांचे नेते म्हणून त्यांनी मान्यता मिळविली. याच लढाऊ बाण्याने भाजपातील धुरंधरांचे त्यांच्याकडे लक्ष गेले अन् १९९४ मध्ये ते सर्वप्रथम महाराष्ट्राच्या विधान परिषदेत निवडून गेले. तेव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेपूर्वी त्यांनी दोनदा चंद्रपूरचे खासदार म्हणून लोकसभेत आपला ठसा उमटविला. २00९ मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर भाजपाने त्यांनाच नवीन चंद्रपूर-वणी-आर्णी मतदार संघातून उमेदवारी बहाल केली. या नवीन मतदार संघातूनही त्यांनी २00९ मध्ये काँग्रेसचे दिग्गज नरेंद्र पुगलिया यांना पराभूत करून विजयाची हॅट्ट्रिक साधली.नवीन मतदार संघामुळे गेल्या पाच वर्षांत वणी, पांढरकवडा, मारेगाव, झरीजामणी, घाटंजी, आर्णी आदी तालुक्यांसह यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी संपर्क वाढविला. याच संपर्काच्या भरवशावर ते नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले. त्यांच्या विजयात वणी आणि आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचा मोलाचा वाटा आहे. गेल्या निवडणुकीत अहीर यांना पाच लाख आठ हजार ४९ एवढी मते मिळाली. प्रतिस्पर्धी काँग्रेसचे संजय देवतळे यांनी दोन लाख ७१ हजार ७८० मतांवर समाधान मानावे लागले होते. अहीर यांनी तब्बल दोन लाख ३६ हजार २६९ मतांनी विजय प्राप्त केला होता. यात वणी आणि आर्णी विधानसभा मतदार संघाने त्यांना अनुक्रमे ९२ हजार १०८ व एक लाख १० हजार ७४५ मते बहाल केली होती. वणी मतदार संघाने त्यांना काँग्रेस उमेदवारापेक्षा तब्बल ५३ हजार ८४८ तर आर्णी मतदारसंघानेही ५९ हजार ८१४ मतांची आघाडी दिली होती. अहीर दोन लाखांच्या फरकाने जिंकले होते. त्यात वणी आणि आर्णीचा तब्बल एक लाख १३ हजार ६६२ मतांचा वाटा होता. दोन लाख ३६ हजार २६९ मतांच्या फरकात चंद्रपूर जिल्ह्यापेक्षाही अहीर यांना यवतमाळ जिल्ह्यातील दोन मतदार संघानी मोलाची मदत केली होती. देशात २६ मे रोजी भाजपप्रणीत सरकार आले. अहीर यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा त्यावेळी जोरात होती. भाजप नेते नितीन गडकरी यांनी त्यांना तसा निरोपही दिला होता. मात्र ऐनवेळी त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. तत्पूर्वी गडकरी यांनी अहीर यांना तसा निरोप देऊन पुढील विस्तारात नक्की सामावून घेतले जाईल, अशी ग्वाहीही दिली होती. आता रविवारी १० नोव्हेंबरला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. गुरुवारी ६ नोव्हेंबरला अहीर यांना पंतप्रधान कार्यालयातून दूरध्वनी आला होता. मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होत असल्याने आपण १0 नोव्हेंबरला उपस्थित राहावे, असे त्यांना सांगण्यात आले होते. संदेश मिळताच शुक्रवार ७ नोव्हेंबरला हंसराज अहीर चंद्रपूर येथून दिल्लीकडे रवाना झाले.