शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

यवतमाळ वनवृत्तातील हजारो हेक्टर जंगल वार्‍यावर

By admin | Updated: May 25, 2014 23:55 IST

यवतमाळ वनवृत्त तीन जिल्ह्यांमध्ये व्यापले आहे. येथील जंगलांमध्ये मौल्यवान सागवान, वन्यप्राणी आणि विपूल वन औषधी आहे. मात्र वन रक्षकांअभावी त्यांची सुरक्षा पूर्णपणे कोलमडली आहे. एकेका वनवतरुळात चार

यवतमाळ : यवतमाळ वनवृत्त तीन जिल्ह्यांमध्ये व्यापले आहे. येथील जंगलांमध्ये मौल्यवान सागवान, वन्यप्राणी आणि विपूल वन औषधी आहे. मात्र वन रक्षकांअभावी त्यांची सुरक्षा पूर्णपणे कोलमडली आहे. एकेका वनवतरुळात चार ते पाच वनरक्षकांची पदे रिक्त असल्याने उर्वरित कर्मचारी हजार हेक्टरवरील जंगलांची सुरक्षा करू शकत नाही. त्यामुळे वनसंपदेच्या तस्करीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

पूर्वी यवतमाळ वनवृत्तात चार वन विभाग होते. त्यामध्ये यवतमाळ, पुसद, पांढरकवडा, अकोला आदींचा समावेश होता. एकेका वनवतरुळात हजारो हेक्टर वनक्षेत्र येत होते. त्यामुळे वनसंरक्षणाचा ताण कर्मचार्‍यांवर येत होता. ही बाब गांभीर्याने घेत वन खात्याने येथील वनक्षेत्राचे फेर सीमांकन केले. त्यामध्ये यवतमाळ वनवतरुळात नव्याने वनपरिक्षेत्र कार्यालयाची निर्मिती झाली. अनेक वनपरिक्षेत्रांची हद्द कमी करून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या वनपरिक्षेत्रात जोडण्यात आली. वन वतरुळाचे फेर सीमांकन झाल्यानंतर तेथे अतिरिक्त कर्मचार्‍यांचा भरणा करणे गरजेचे होते. मात्र या संदर्भात वन विभागाने कुठलीही पाऊले उचलली नाही. त्यामुळे वन अधिकारी आणि कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण कमी होण्यापेक्षा तो उत्तरोत्तर वाढताच आहे. एकेका वनवतरुळात पाच ते सहा वनरक्षकांची पदे रिक्त असल्याने हजारो हेक्टर वनक्षेत्र वार्‍यावर असल्याचे दिसून येत आहे.

नेमक्या याच बाबीचा फायदा घेत अनेक वन तस्कर सक्रिय झाले आहे. नव्याने झालेल्या वडगाव (जंगल), पूर्वाश्रमीच्या घाटंजी, आर्णी, हिवरी या वन परिक्षेत्रांमध्ये मोठय़ा प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल केली जात आहे. ही कत्तल रोखण्यासाठी जंगलात रात्र गस्त होणे गरजेचे आहे. मात्र नियमित गस्त होत नसल्याने आणि पुरेसे मनुष्यबळ नसल्याने सागवान तस्करीत वाढ होत आहे. या तस्करीची अनेक उदाहरणे संबंधित वन परिक्षेत्रात उघडकीस आली आहे. या संदर्भात काही वनरक्षकांना खासगीत विचारणा केली असता त्यांनी दोन-दोन बीटमध्ये काम करायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला.

हजारो हेक्टर वनक्षेत्राचे संरक्षण एकटा वनरक्षक करू शकत नाही. त्यामुळेच वनसंपदेच्या तस्करीत वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. वन विभागाला याची जाणिव असल्याने वन अधिकारी आणि कर्मचार्‍यांना या बाबतीत जबाबदार धरल्या जात नाही. या उलट कारवाई कशी शिथील करता येईल, याचा वरिष्ठांकडून प्रयत्न केला जातो. त्यामुळे अडचणींचा सामना करून वन संरक्षणाचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.

(स्थानिक प्रतिनिधी)