शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ वनवृत्तातील हजारो हेक्टर जंगल वार्‍यावर

By admin | Updated: May 25, 2014 23:55 IST

यवतमाळ वनवृत्त तीन जिल्ह्यांमध्ये व्यापले आहे. येथील जंगलांमध्ये मौल्यवान सागवान, वन्यप्राणी आणि विपूल वन औषधी आहे. मात्र वन रक्षकांअभावी त्यांची सुरक्षा पूर्णपणे कोलमडली आहे. एकेका वनवतरुळात चार

यवतमाळ : यवतमाळ वनवृत्त तीन जिल्ह्यांमध्ये व्यापले आहे. येथील जंगलांमध्ये मौल्यवान सागवान, वन्यप्राणी आणि विपूल वन औषधी आहे. मात्र वन रक्षकांअभावी त्यांची सुरक्षा पूर्णपणे कोलमडली आहे. एकेका वनवतरुळात चार ते पाच वनरक्षकांची पदे रिक्त असल्याने उर्वरित कर्मचारी हजार हेक्टरवरील जंगलांची सुरक्षा करू शकत नाही. त्यामुळे वनसंपदेच्या तस्करीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

पूर्वी यवतमाळ वनवृत्तात चार वन विभाग होते. त्यामध्ये यवतमाळ, पुसद, पांढरकवडा, अकोला आदींचा समावेश होता. एकेका वनवतरुळात हजारो हेक्टर वनक्षेत्र येत होते. त्यामुळे वनसंरक्षणाचा ताण कर्मचार्‍यांवर येत होता. ही बाब गांभीर्याने घेत वन खात्याने येथील वनक्षेत्राचे फेर सीमांकन केले. त्यामध्ये यवतमाळ वनवतरुळात नव्याने वनपरिक्षेत्र कार्यालयाची निर्मिती झाली. अनेक वनपरिक्षेत्रांची हद्द कमी करून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या वनपरिक्षेत्रात जोडण्यात आली. वन वतरुळाचे फेर सीमांकन झाल्यानंतर तेथे अतिरिक्त कर्मचार्‍यांचा भरणा करणे गरजेचे होते. मात्र या संदर्भात वन विभागाने कुठलीही पाऊले उचलली नाही. त्यामुळे वन अधिकारी आणि कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण कमी होण्यापेक्षा तो उत्तरोत्तर वाढताच आहे. एकेका वनवतरुळात पाच ते सहा वनरक्षकांची पदे रिक्त असल्याने हजारो हेक्टर वनक्षेत्र वार्‍यावर असल्याचे दिसून येत आहे.

नेमक्या याच बाबीचा फायदा घेत अनेक वन तस्कर सक्रिय झाले आहे. नव्याने झालेल्या वडगाव (जंगल), पूर्वाश्रमीच्या घाटंजी, आर्णी, हिवरी या वन परिक्षेत्रांमध्ये मोठय़ा प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल केली जात आहे. ही कत्तल रोखण्यासाठी जंगलात रात्र गस्त होणे गरजेचे आहे. मात्र नियमित गस्त होत नसल्याने आणि पुरेसे मनुष्यबळ नसल्याने सागवान तस्करीत वाढ होत आहे. या तस्करीची अनेक उदाहरणे संबंधित वन परिक्षेत्रात उघडकीस आली आहे. या संदर्भात काही वनरक्षकांना खासगीत विचारणा केली असता त्यांनी दोन-दोन बीटमध्ये काम करायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला.

हजारो हेक्टर वनक्षेत्राचे संरक्षण एकटा वनरक्षक करू शकत नाही. त्यामुळेच वनसंपदेच्या तस्करीत वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. वन विभागाला याची जाणिव असल्याने वन अधिकारी आणि कर्मचार्‍यांना या बाबतीत जबाबदार धरल्या जात नाही. या उलट कारवाई कशी शिथील करता येईल, याचा वरिष्ठांकडून प्रयत्न केला जातो. त्यामुळे अडचणींचा सामना करून वन संरक्षणाचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.

(स्थानिक प्रतिनिधी)