शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ विकास पॅकेजमधून यवतमाळचे कृषी महाविद्यालय गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 11:56 IST

यवतमाळात नवे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव चार महिन्यांपासून शासनाकडे धुळखात आहे. पावसाळी अधिवेशनात या प्रस्तावाला टाळून मूल (ता. चंद्रपूर) येथे नवे महाविद्यालय मंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देअधिवेशनात पळवापळवी ४५ प्राध्यापकांसह ९७ पदांचा प्रस्ताव शासनाकडे धूळ खात

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळात नवे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव चार महिन्यांपासून शासनाकडे धुळखात आहे. पावसाळी अधिवेशनात या प्रस्तावाला मंजुरी मिळणे अपेक्षित असताना, यवतमाळला टाळून मूल (ता. चंद्रपूर) येथे नवे महाविद्यालय मंजूर करण्यात आले. शिवाय, कृषी विद्यापीठासाठी घोषित केलेल्या ५० कोटींच्या पॅकेजमध्ये यवतमाळच्या कृषी महाविद्यालयाचा साधा नामोल्लेखही टाळण्यात आला. त्यामुळे विदर्भ विकासाच्या नावाने शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये केवळ पळवापळवीच झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.२० डिसेंबर २०१७ रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यवतमाळात शासकीय कृषी महाविद्यालय तातडीने सुरू करण्याची घोषणा केली होती.त्यासाठी राज्यशासनाला निर्देशही दिले होते. ही घोषणा होताच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यवतमाळात महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे (एमसीएईआर) पाठविला. बीएससी कृषी अभ्यासक्रमाच्या ६० विद्यार्थी क्षमतेच्या या महाविद्यालयात ९७ पदे असतील. त्यात ४५ पदे शिक्षकवर्गीय असतील, असा हा प्रस्ताव परिषदेने तातडीने शासनाला मान्यतेसाठी सादर केला.पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव मंजूर होऊन प्रवेश सुरू होतील, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात अधिवेशनात यवतमाळऐवजी मूल (जि. चंद्रपूर) येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा करण्यात आल्याने विद्यापीठ प्रशासनही आश्चर्य व्यक्त करीत आहे. मूल येथे अद्याप महाविद्यालयाची जागा, इमारत हे प्रश्न सुटलेले नाहीत. तर यवतमाळात कृषी विद्यापीठांतर्गत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या निमित्ताने सुसज्ज आणि नवीन इमारत तयार आहे. केवळ शासन मान्यता आणि पदभरती होताच हे महाविद्यालय याच सत्रात सुरू होणे शक्य होते. तरीही यवतमाळला डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राज्यपालांची घोषणा वाऱ्यावरराज्य शासनाने अधिवेशनात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी २२ हजार कोटींचे विशेष पॅकेज घोषित केले. त्यात अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली. या ५० कोटींच्या पॅकेजमधूनच यवतमाळऐवजी चंद्रपूर जिल्ह्यात नवे कृषी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. मात्र, या पॅकेजमध्ये खुद्द राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी घोषित केलेल्या यवतमाळच्या कृषी महाविद्यालयाला स्थान देणे सरकारला का अशक्य झाले, असा प्रश्न यवतमाळात उपस्थित केला जात आहे.

पुढच्या अधिवेशनात बघूकृषी विद्यापीठाने आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने यवतमाळच्या शासकीय कृषी महाविद्यालयाबाबत सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण केली आहे. महाविद्यालयासाठी इमारतही तयार आहे. केवळ पदभरती करून प्रवेश प्रक्रिया सुरू करणे बाकी आहे. तेवढ्यासाठी पावसाळी अधिवेशनातून सरकारी मान्यता मिळण्याचा सोपस्कार बाकी होता. परंतु, आता यवतमाळच्या महाविद्यालयाबाबत पुढच्या अधिवेशनात बघू, असे सांगत शासनाने कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचा प्रस्ताव डावलल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती