शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यातील निराधार वृद्धांसाठी तरुणांचे वात्सल्य भोजनालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:00 IST

मुलं सोडून गेली, कुणाला मुलंच नाहीत, कुणाला आहे पण पोसायला तयार नाहीत... मुंबई-पुण्यासारख्या शहरातच नव्हे, अशी एकाकी म्हातारी मंडळी खेड्यापाड्यातही आहे. अगदी आपल्या जिल्ह्यातल्या पार्डीनस्करी नावाच्या पाच पन्नास घरांच्या गावातही ही स्थिती आहे.

ठळक मुद्देघाटंजी तालुका : १९ आजी-आजोबांच्या आसऱ्याची सोमवारी वर्षपूर्ती

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुलं सोडून गेली, कुणाला मुलंच नाहीत, कुणाला आहे पण पोसायला तयार नाहीत... मुंबई-पुण्यासारख्या शहरातच नव्हे, अशी एकाकी म्हातारी मंडळी खेड्यापाड्यातही आहे. अगदी आपल्या जिल्ह्यातल्या पार्डीनस्करी नावाच्या पाच पन्नास घरांच्या गावातही ही स्थिती आहे. पण जसे एकाकी वृद्ध आहेत, तसे संवेदनशील तरुणही आहेत. म्हणूनच तरुणांनी एकत्र येऊन निराधार आजी-आजोबांसाठी मेस सुरू केली. म्हाताºयांना ‘वात्सल्य’ देणाऱ्या या मेसची उद्या वर्षपूर्ती होत आहे.घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी नावाच्या गावात ही मेस ‘वात्सल्य भोजनालय’ म्हणून गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला सुरू झाली. या गावात असे काही वृद्ध आहेत, ज्यांना कोणाचाच आधार नाही. स्वत: कमावण्यासाठी अंगात त्राण नाही. शासनाने कधीतरी वेळेवर दिलेल्या निराधार मानधनाच्या पैशातून बेसन-भाकर शिजवायची. चूल पेटवताना फुंकणीत अक्षरश: प्राण फुंकायचा. थरथरत्या हातांना तव्याचे चटके लावून घ्यायचे. दोन घास पोटात लोटायचे अन् पुन्हा एकटेच आढ्याकडे बघत बसून राहायचे... ही सरत्या जिंदगीची अवस्था घाटंजीतील विकासगंगा सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पाहिली. आणि या खेड्यातल्या वृद्धांचा स्वयंपाकाचा त्रास संपला.गावातीलच एका घरात वृद्धांसाठी वात्सल्य भोजनालय सुरू झाले. १९ वृद्धांना येथे रोज सकाळी १० ते १२ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गरमागरम जेवण दिले जाते. सर्व वृद्ध वेळेवर भोजनालयात येऊन एकत्र बसून जेवतात. जेवताना आयुष्यातले सुख-दु:खही एकमेकांशी वाटून घेतात. थोडा हास्यविनोदही होतो. सुखाचे दोन घास घेऊन पुन्हा आपापल्या घरी आरामाला जातात. भोजनालयाचे तीन सदस्य मात्र तब्येतीच्या कारणामुळे भोजनालयापर्यंत येऊ शकत नाही. त्यांचा डबा घरपोच दिला जातो.विकासगंगा संस्थेचे प्रमुख रणजित बोबडे यांच्या उपक्रमाची माहिती मिळताच मुंबईच्या केअरिंग फ्रेण्ड्स ग्रुपनेही आर्थिक भार उचलला.वृद्धांचा स्वाभिमान मात्र शाबूत६ पुरुष आणि १३ महिला असे १९ वृद्ध सध्या वात्सल्य भोजनालयाचे लाभार्थी आहेत. विकासगंगा आणि केअरिंग ग्रुप या मेसचा भार वाहत असले, तरी हे वृद्ध फुकट जेवत नाहीत. निराधार मानधन म्हणून ज्यांना ६०० रुपये मिळतात, त्यातले २०० रुपये ते मेसच्या कामासाठी देतात. ज्यांना असे निराधारचे मानधनही मिळत नाही, ते रेशनदुकानातील किलो-दोन किलो धान्य देतात.नातेवाईकांनी नेले, तरी मेसमध्ये परतलेवृद्धांची नेमकी व्यथा घाटंजीतील तरुणांनी ओळखली आणि रचला महाराष्ट्रातील वृद्धांच्या पहिल्या आणि एकमेव मेसचा पाया! मेसचा आसरा मिळालेल्या १९ वृद्धांपैकी दोन वृद्धांचे नातेवाईक जरा नाराज झाले होते. ते बाहेरगावी राहायचे आणि आपल्या कुटुंबातील म्हातारी व्यक्ती मेसमध्ये जेवते, हे त्यांना खटकले. ते त्या दोन वृद्धांना आपल्या सोबत बाहेरगावी घेऊनही गेले. पण त्यातील एक वृद्ध स्वत:च्याच घरात एकाकी झाला. नातेवाईकांच्या वाईट वर्तनाला कंटाळून तो परत पार्डी नस्करीत येऊन पुन्हा वात्सल्य भोजनालयाचा सदस्य झाला आहे. हाच या मेसच्या ‘घरगुती’पणाचा पुरावा.