शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

प्रत्येक तक्रारकर्त्याला मिळणार लेखी उत्तर

By admin | Updated: May 17, 2015 00:15 IST

पालकमंत्री संजय राठोड वणीत येत्या ७ आॅगस्टला दुसरा जनता दरबार घेणार आहे. त्यामध्ये यावेळी दाखल झालेली एकही...

संजय राठोड : अधिकाऱ्यांचेही मूल्यमापन करणारवणी : पालकमंत्री संजय राठोड वणीत येत्या ७ आॅगस्टला दुसरा जनता दरबार घेणार आहे. त्यामध्ये यावेळी दाखल झालेली एकही तक्रार येणार नाही. जुन्या जनता दरबारातील सर्वच तक्रारींचा निपटारा झालेला असेल. प्रत्येक तक्रारकर्त्याला त्याच्या तक्रारीचे काय झाले, याचे लेखी उत्तर काही दिवसातच मिळेल, अशी ग्वाही पालकमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत दिली.वणीत शुक्रवारी दुपारी २ वाजता सुरू झालेला जनता दरबार पालकमंत्र्यांनी तब्बल सात तास चालविला. रात्री ९ वाजता त्यांनी महसूल भवन सोडले. तरीही शिल्लक राहिलेल्या तक्रारींचा निपटारा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार रात्री उशिरापर्यंत करीत होते. वणी उपविभागातून तक्रारींचा आलेला पाऊस बघून येथील सरकारी कार्यालयात सामान्य जनतेचे काय हाल होत असेल, याची प्रचिती पालकमंत्र्यांना आली. येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या गतीमध्ये वाढ करण्यासाठी अधिकाऱ्यांचे वरचे वर मूल्यमापन करण्याचे ठरविले. त्यासाठी मंत्रालयीन सचिव दर्जाचे अधिकारी नेमण्यात आल्याचे राठोड यांनी सांगितले.शासनाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना हाती घेतल्या आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी जिल्ह्याला १०६ कोटी रूपये देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ४१३ गावे विविध योजनांच्या माध्यमातून परिपूर्ण केली जाणार आहे. पुढील वर्षभरात मागणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना विजेची जोडणी देण्यात येणार आहे. शेतीसाठी नवनवे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग राबविले जाणार आहे. प्रत्येक गाव व कुटुंबाचे सुक्ष्म नियोजन आणि सर्वेक्षण करून उपाययोजना केल्या जाणार आहे. शिव रस्ते व पांदण रस्ते मोकळे करण्याचा धडक कार्यक्रम राबविला जाणार आहे. तसेच येत्या सहा महिन्यात नवे जनताभिमुख वाळू धोरण आणणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. येथील सेतू केंद्राच्या गलथान कारभाराची माहिती पत्रकारांनी त्यांना दिली. त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना येथील महसूल अधिकाऱ्यांना दिल्या जाईल. आवश्यकता पडल्यास खासगी सेतू बंद करण्याचा निर्णय शासन घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.ओव्हरलोड वाहतुकीवरून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. ओव्हरलोड वाहतुकीचे वाहन पकडून त्यांना तीन महिन्यासाठी निलंबित करा, येत्या १५ दिवसात केलेल्या कारवाईवरून तुमचे मूल्यमापन केले जाईल. त्यात उदासीनता दिसून आल्यास अधिकाऱ्यांना कारवाईस सामोरे जावे लागेल, असा दम जनता दरबारात पालकमंत्री राठोड यांनी परिवहन अधिकाऱ्यांना दिला. (स्थानिक प्रतिनिधी)जनता दरबार नियमित भरणारउपविभागीय स्तरावरील जनता दरबार आता नियमित भरणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. यापूर्वी हाच प्रयोग आपण आपल्या दिग्रस मतदार संघात राबविल्याचे त्यांनी सांगितले. तेथे आता जनता दरबार भरविल्यास नाममात्र तक्रारी येतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्यात आपण हा प्रयोग सुरू केल्याचे ते म्हणाले. या दरबारातून नागरिकांना न्याय मिळण्याची प्रक्रिया गतीमान होणार आहे. परिणामी पुढील काही जनता दरबारात तक्रारींचा ओघ कमी दिसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जनता दरबारातून दोन दुचाकींची चोरीवणीतील कायदा व व्यवस्था कशी चोख आहे, हे चोरट्यांनी पालकमंत्र्यांनाच दाखवून दिले. तक्रार घेऊन आलेल्या दोन नागरिकांच्या दुचाकी तहसील कार्यालय परिसरातून चोरट्यांनी लांबविल्या. ही बाब दुचाकी मालकाने मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. तेव्हा पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. अखेर गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला. परंतु चोरटे अद्याप गवसले नाही.