शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

प्रत्येक तक्रारकर्त्याला मिळणार लेखी उत्तर

By admin | Updated: May 17, 2015 00:15 IST

पालकमंत्री संजय राठोड वणीत येत्या ७ आॅगस्टला दुसरा जनता दरबार घेणार आहे. त्यामध्ये यावेळी दाखल झालेली एकही...

संजय राठोड : अधिकाऱ्यांचेही मूल्यमापन करणारवणी : पालकमंत्री संजय राठोड वणीत येत्या ७ आॅगस्टला दुसरा जनता दरबार घेणार आहे. त्यामध्ये यावेळी दाखल झालेली एकही तक्रार येणार नाही. जुन्या जनता दरबारातील सर्वच तक्रारींचा निपटारा झालेला असेल. प्रत्येक तक्रारकर्त्याला त्याच्या तक्रारीचे काय झाले, याचे लेखी उत्तर काही दिवसातच मिळेल, अशी ग्वाही पालकमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत दिली.वणीत शुक्रवारी दुपारी २ वाजता सुरू झालेला जनता दरबार पालकमंत्र्यांनी तब्बल सात तास चालविला. रात्री ९ वाजता त्यांनी महसूल भवन सोडले. तरीही शिल्लक राहिलेल्या तक्रारींचा निपटारा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार रात्री उशिरापर्यंत करीत होते. वणी उपविभागातून तक्रारींचा आलेला पाऊस बघून येथील सरकारी कार्यालयात सामान्य जनतेचे काय हाल होत असेल, याची प्रचिती पालकमंत्र्यांना आली. येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या गतीमध्ये वाढ करण्यासाठी अधिकाऱ्यांचे वरचे वर मूल्यमापन करण्याचे ठरविले. त्यासाठी मंत्रालयीन सचिव दर्जाचे अधिकारी नेमण्यात आल्याचे राठोड यांनी सांगितले.शासनाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना हाती घेतल्या आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी जिल्ह्याला १०६ कोटी रूपये देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ४१३ गावे विविध योजनांच्या माध्यमातून परिपूर्ण केली जाणार आहे. पुढील वर्षभरात मागणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना विजेची जोडणी देण्यात येणार आहे. शेतीसाठी नवनवे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग राबविले जाणार आहे. प्रत्येक गाव व कुटुंबाचे सुक्ष्म नियोजन आणि सर्वेक्षण करून उपाययोजना केल्या जाणार आहे. शिव रस्ते व पांदण रस्ते मोकळे करण्याचा धडक कार्यक्रम राबविला जाणार आहे. तसेच येत्या सहा महिन्यात नवे जनताभिमुख वाळू धोरण आणणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. येथील सेतू केंद्राच्या गलथान कारभाराची माहिती पत्रकारांनी त्यांना दिली. त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना येथील महसूल अधिकाऱ्यांना दिल्या जाईल. आवश्यकता पडल्यास खासगी सेतू बंद करण्याचा निर्णय शासन घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.ओव्हरलोड वाहतुकीवरून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. ओव्हरलोड वाहतुकीचे वाहन पकडून त्यांना तीन महिन्यासाठी निलंबित करा, येत्या १५ दिवसात केलेल्या कारवाईवरून तुमचे मूल्यमापन केले जाईल. त्यात उदासीनता दिसून आल्यास अधिकाऱ्यांना कारवाईस सामोरे जावे लागेल, असा दम जनता दरबारात पालकमंत्री राठोड यांनी परिवहन अधिकाऱ्यांना दिला. (स्थानिक प्रतिनिधी)जनता दरबार नियमित भरणारउपविभागीय स्तरावरील जनता दरबार आता नियमित भरणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. यापूर्वी हाच प्रयोग आपण आपल्या दिग्रस मतदार संघात राबविल्याचे त्यांनी सांगितले. तेथे आता जनता दरबार भरविल्यास नाममात्र तक्रारी येतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्यात आपण हा प्रयोग सुरू केल्याचे ते म्हणाले. या दरबारातून नागरिकांना न्याय मिळण्याची प्रक्रिया गतीमान होणार आहे. परिणामी पुढील काही जनता दरबारात तक्रारींचा ओघ कमी दिसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जनता दरबारातून दोन दुचाकींची चोरीवणीतील कायदा व व्यवस्था कशी चोख आहे, हे चोरट्यांनी पालकमंत्र्यांनाच दाखवून दिले. तक्रार घेऊन आलेल्या दोन नागरिकांच्या दुचाकी तहसील कार्यालय परिसरातून चोरट्यांनी लांबविल्या. ही बाब दुचाकी मालकाने मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. तेव्हा पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. अखेर गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला. परंतु चोरटे अद्याप गवसले नाही.