शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

जम्बो भरतीची लेखी परीक्षा

By admin | Updated: November 22, 2014 01:56 IST

पेपरफुटीचे ग्रहण लागल्यानंतरही जिल्हा परिषदेतील पद भरती प्रक्रिया सुरळीत होत आहे.

यवतमाळ : पेपरफुटीचे ग्रहण लागल्यानंतरही जिल्हा परिषदेतील पद भरती प्रक्रिया सुरळीत होत आहे. या भरती प्रक्रियेतील शेवटच्या टप्प्यातील चार पदाच्या ४७ जागेसाठी तब्बल १९ हजार ७८० उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत. यासाठी ४७ परीक्षा केंद्र नियोजित केले आहेत. जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी सांख्यिकी या दोन जागेसाठी एक हजार २७३ उमेदवार असून, पाच केंद्र आहेत. लघुलेखक या दोन जागेसाठी ५१ उमेदवार असून, एक परीक्षा केंद्र आहे. कनिष्ठ लेखाधिकारी या तीन जागेसाठी ३०३ उमेदवार असून, एक परीक्षा केंद्र आहे. तर परिचराच्या ४० जागांसाठी १८ हजार १५३ उमेदवार आहेत. त्यांची लेखी परीक्षा घेण्यासाठी एकुण ९२ परीक्षा केंद्र आहेत. यापैकी ४७ केंद्रापैकी बाभूळगाव, कळंब, घाटंजी, नेर, दारव्हा, राळेगाव येथे आहेत. दुपारी २ ते ३.३० यावेळेत परिचर पदाचा लेखी पेपर घेतला जाणार आहे. या जम्बो परीक्षेसाठी जिल्हा निवड समितीकडून तयारी करण्यात आली आहे. पंचायत समितीस्तरासाठी सात संपर्क अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे तर सात गट विकास अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय यवतमाळ मुख्यालयी होत असलेल्या लेखी पेपरसाठी १० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभरतीच्या सुरूवातीलाच पेपर फुटल्याचा ठपका या भरती प्रक्रियेवर लागला होता. त्यानंतरही जिल्हा निवड समितीने नेटाने ही भरती प्रक्रिया कायम ठेवली. पेपरफुटीच्या सावटात असलेल्या या भरती प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा निवड समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहे. मोठ्या प्रमाणात उमेदवार असल्याने आसनव्यवस्थेचेही नियोजन त्याच पद्धतीने केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)