शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

उन्हाच्या चटक्याने लाहीलाही

By admin | Updated: April 5, 2015 00:02 IST

गत दोन दिवसांपासून पुसद शहराच्या तापमानात अचानक वाढ झाली असून पारा ३८ अंशावर पोहोचला आहे.

पारा ३८ वर : मानवासह पशुपक्षी, वन्यजीवही हैराण पुसद : गत दोन दिवसांपासून पुसद शहराच्या तापमानात अचानक वाढ झाली असून पारा ३८ अंशावर पोहोचला आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असून दुपारी तर बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. वाढत्या उन्हाचा फटका मानवासोबतच पशुपक्षी आणि वन्यजीवांनाही बसत आहे.पुसद शहर विदर्भातील सर्वाधिक तापमानाचे शहर म्हणून ओळखले जाते. मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे उन्हाची तीव्रता जाणवली नाही. परंतु गत दोन-तीन दिवसांपासून वातावरण निरभ्र झाले असून तापमान वाढत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असल्याचे दिसत आहे. उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. पहाटेच्यावेळी थंड हवा वाहत आहे. सकाळी ९ नंतर वातावरण हळूहळू बदलून तापमान वाढत जाते. यापासून संरक्षण व्हावे म्हणून नागरिक टोप्या, छत्री, रुमाल बांधत आहे. वाढत्या उन्हाचा परिणाम जलस्रोतावरही होत आहे. नदी, नाले, ओढे कोरडे पडले असून विहिरीतील पाणी पातळीही सपाट्याने कमी होत आहे. पुसद शहराची जीवनदायी असलेल्या पूस नदीचे पात्रही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. नदी प्रवाहातील पाण्याची लहान मोठी डबकी आटत चालल्याने पशुपक्षी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच जंगलातील पशुपक्षी व वन्यजीवांचीही पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. वनविभागाने अद्यापही पानवठे निर्माण केले नाही. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तापमान ३८ वर पोहोचल्याने आगामी काही दिवसात तापमान ४० ते ४२ अंश सेल्सीअस होण्याची शक्यता आहे. वाढत चाललेल्या उन्हामुळे थंडपेयाची मागणी वाढली आहे. दिवसभर उन्ह राहत असल्याने दुपारी बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. अद्याप उष्माघाताचे रुग्ण आढळून आले नसले तरी शासकीय रुग्णालयाने नागरिकांना सूचना दिल्या आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे व सावलीचा आधार घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष पवार यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)आरोग्याच्या तक्रारी वाढल्या विडूळ - गत काही दिवसात तापमानात वाढ झाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये आरोग्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालय हाऊसफुल्ल दिसत आहे. साधारणत: तापमानात वाढ होताच तापाचे रुग्ण आढळून येतात. सध्या विषाणू जन्य तापाच्या रुग्णात वाढ झाल्याचे दिसत आहे. याशिवाय पाण्याची पातळी खोल गेल्याने दूषित पाणी प्राशनाने काविळाची लक्षणेही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. विशेषत: ताप, डोके दुखी, गळ्याची आग होणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, हगवण, उल्टी आदी रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांनी घराबाहेर जाणे टाळून पाण्याचा अधिकाधिक वापर करावा, असे डॉक्टर सांगतात.