शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

उन्हाच्या चटक्याने लाहीलाही

By admin | Updated: April 5, 2015 00:02 IST

गत दोन दिवसांपासून पुसद शहराच्या तापमानात अचानक वाढ झाली असून पारा ३८ अंशावर पोहोचला आहे.

पारा ३८ वर : मानवासह पशुपक्षी, वन्यजीवही हैराण पुसद : गत दोन दिवसांपासून पुसद शहराच्या तापमानात अचानक वाढ झाली असून पारा ३८ अंशावर पोहोचला आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असून दुपारी तर बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. वाढत्या उन्हाचा फटका मानवासोबतच पशुपक्षी आणि वन्यजीवांनाही बसत आहे.पुसद शहर विदर्भातील सर्वाधिक तापमानाचे शहर म्हणून ओळखले जाते. मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे उन्हाची तीव्रता जाणवली नाही. परंतु गत दोन-तीन दिवसांपासून वातावरण निरभ्र झाले असून तापमान वाढत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असल्याचे दिसत आहे. उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. पहाटेच्यावेळी थंड हवा वाहत आहे. सकाळी ९ नंतर वातावरण हळूहळू बदलून तापमान वाढत जाते. यापासून संरक्षण व्हावे म्हणून नागरिक टोप्या, छत्री, रुमाल बांधत आहे. वाढत्या उन्हाचा परिणाम जलस्रोतावरही होत आहे. नदी, नाले, ओढे कोरडे पडले असून विहिरीतील पाणी पातळीही सपाट्याने कमी होत आहे. पुसद शहराची जीवनदायी असलेल्या पूस नदीचे पात्रही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. नदी प्रवाहातील पाण्याची लहान मोठी डबकी आटत चालल्याने पशुपक्षी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच जंगलातील पशुपक्षी व वन्यजीवांचीही पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. वनविभागाने अद्यापही पानवठे निर्माण केले नाही. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तापमान ३८ वर पोहोचल्याने आगामी काही दिवसात तापमान ४० ते ४२ अंश सेल्सीअस होण्याची शक्यता आहे. वाढत चाललेल्या उन्हामुळे थंडपेयाची मागणी वाढली आहे. दिवसभर उन्ह राहत असल्याने दुपारी बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. अद्याप उष्माघाताचे रुग्ण आढळून आले नसले तरी शासकीय रुग्णालयाने नागरिकांना सूचना दिल्या आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे व सावलीचा आधार घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष पवार यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)आरोग्याच्या तक्रारी वाढल्या विडूळ - गत काही दिवसात तापमानात वाढ झाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये आरोग्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालय हाऊसफुल्ल दिसत आहे. साधारणत: तापमानात वाढ होताच तापाचे रुग्ण आढळून येतात. सध्या विषाणू जन्य तापाच्या रुग्णात वाढ झाल्याचे दिसत आहे. याशिवाय पाण्याची पातळी खोल गेल्याने दूषित पाणी प्राशनाने काविळाची लक्षणेही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. विशेषत: ताप, डोके दुखी, गळ्याची आग होणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, हगवण, उल्टी आदी रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांनी घराबाहेर जाणे टाळून पाण्याचा अधिकाधिक वापर करावा, असे डॉक्टर सांगतात.