शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

तांडे, पोड शाळामुक्त करणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:28 IST

शासन कमी पटाच्या शाळा बंद करत आहे. परंतु, यात गोरगरिबांच्या मुलांचेच नुकसान होणार आहे. जिल्ह्यातील पारधी बेडे, तांडे, वाडी, पोड यांना शाळामुक्त करण्याचा शासनाचा डाव आहे का,

ठळक मुद्देसंतप्त सवाल : शाळा वाचविण्यासाठी २१ गावांतील पालकांचे धरणे

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शासन कमी पटाच्या शाळा बंद करत आहे. परंतु, यात गोरगरिबांच्या मुलांचेच नुकसान होणार आहे. जिल्ह्यातील पारधी बेडे, तांडे, वाडी, पोड यांना शाळामुक्त करण्याचा शासनाचा डाव आहे का, असा संतप्त सवाल जिल्ह्यातील २१ गावांतील पालकांनी उपस्थित केला. शाळाबंदीच्या विरोधात शुक्रवारी येथील तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशनच्या पुढाकाराने बाधीत आणि भविष्यात बाधीत होऊ शकणाºया गावकऱ्यांनी आंदोलन केले. शासनाने १० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद केल्या आहेत. आता ३० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती शासनाने मागितली आहे. त्यामुळे यापुढे जिल्हा परिषदेच्या आणखी शाळा बंद होण्याचा धोका आहे. कोलाम पोड, बंजारा तांडे, पारधी बेडे असलेल्या वस्त्यांमधील शाळांवरच कुऱ्हाड कोसळण्याची भीती आहे. असे झाल्यास प्रामुख्याने मुलींचे शिक्षण खुंटून बालविवाहाचे प्रमाण वाढण्याचा धोका आंदोलकांनी व्यक्त केला. शिक्षण हा मुलांचा अधिकार असून ते पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही नवीन शाळांची मागणी करीत नाही. मात्र, आमच्या गावात जी शाळा सुरू आहे, ती सुरू ठेवावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. एकट्या यवतमाळ तालुक्यात ४५ शाळांवर बंदीची कुºहाड कोसळणार आहे. जिल्ह्यात हा आकडा ५०० च्या पलीकडे जाण्याचा धोका आहे. असे झाल्यास गरिबांच्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणात वाताहत होण्याची शक्यता आंदोलनात व्यक्त करण्यात आली.यवतमाळ तालुक्यातील वडगाव, येळाबारा, अकोलाबाजार, घटाना केंद्रातील गणेशपूर, चौकी आकपुरी, चौकी झुली, येळाबारा पोड, मुरझडी, येवती, वरुड, हातगाव, वरझडी, कारेगाव, यावली, रामपूर, वडगाव, धानोरा, सुकळी, आकपुरी, वागदरा, रामवाकडी, दुधना पोड या गावातील पालकांनी आंदोलनात शासन निर्णयाचा विरोध केला. विशेष म्हणजे, ३० पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या गावातील लोकांनीही आंदोलनात सहभाग घेतला होता.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशनचे अध्यक्ष मनोहर विरुडकर, समन्वयक सुनिल भेले, राहुल कचरे, बंडू उईके, पुंडलीक कनाके, अशोक मेश्राम, विनायक रामगडे, अनिल नैताम, रमेश जाधव, विनोद राठोड, विठ्ठल दडांजे, विजय विरुटकर, किशोर जाधव, गणेश जाधव, संजय गज्जलवार, नयना पाटील, नीलेश जैस्वाल, भारत गाडेकर आदी उपस्थित होते.ग्रामसभांचे ठराव देणार शासनालायेत्या जागतिक महिला दिनी ८ मार्चला सर्वत्र ग्रामसभा होणार आहे. त्यात या २१ गावातील नागरिक कमी पटाच्या शाळा बंद करू नये, असा ठराव घेणार आहे. जिल्ह्यातील इतरही गावांनी असे ठराव करून फेडरेशनकडे पाठवावे. हे सर्व ठराव शासनाकडे पाठविण्यात येईल व त्या आधारेच न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात येईल, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष मनोहर विरुडकर, समन्वयक सुनिल भेले यांनी दिली.आमच्या पोडावर स्वातंत्र्य नाही का?कोलाम पोडांवर शाळा आहे, म्हणून सध्या स्वातंत्र्यदिन-गणराज्यदिनाला झेंडावंदनाचा कार्यक्रम साजरा होतो. आता शासन पोडांवरील शाळाच बंद करीत आहे. मग कोलाम पोडांवर राष्ट्रीय सण साजरे करायचे नाही का? आमच्या पोडांवर स्वातंत्र्य नाही का? असे गंभीर प्रश्न यावेळी आंदोलक गावकºयांनी उपस्थित केले.