शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

तांडे, पोड शाळामुक्त करणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:28 IST

शासन कमी पटाच्या शाळा बंद करत आहे. परंतु, यात गोरगरिबांच्या मुलांचेच नुकसान होणार आहे. जिल्ह्यातील पारधी बेडे, तांडे, वाडी, पोड यांना शाळामुक्त करण्याचा शासनाचा डाव आहे का,

ठळक मुद्देसंतप्त सवाल : शाळा वाचविण्यासाठी २१ गावांतील पालकांचे धरणे

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शासन कमी पटाच्या शाळा बंद करत आहे. परंतु, यात गोरगरिबांच्या मुलांचेच नुकसान होणार आहे. जिल्ह्यातील पारधी बेडे, तांडे, वाडी, पोड यांना शाळामुक्त करण्याचा शासनाचा डाव आहे का, असा संतप्त सवाल जिल्ह्यातील २१ गावांतील पालकांनी उपस्थित केला. शाळाबंदीच्या विरोधात शुक्रवारी येथील तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशनच्या पुढाकाराने बाधीत आणि भविष्यात बाधीत होऊ शकणाºया गावकऱ्यांनी आंदोलन केले. शासनाने १० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद केल्या आहेत. आता ३० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती शासनाने मागितली आहे. त्यामुळे यापुढे जिल्हा परिषदेच्या आणखी शाळा बंद होण्याचा धोका आहे. कोलाम पोड, बंजारा तांडे, पारधी बेडे असलेल्या वस्त्यांमधील शाळांवरच कुऱ्हाड कोसळण्याची भीती आहे. असे झाल्यास प्रामुख्याने मुलींचे शिक्षण खुंटून बालविवाहाचे प्रमाण वाढण्याचा धोका आंदोलकांनी व्यक्त केला. शिक्षण हा मुलांचा अधिकार असून ते पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही नवीन शाळांची मागणी करीत नाही. मात्र, आमच्या गावात जी शाळा सुरू आहे, ती सुरू ठेवावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. एकट्या यवतमाळ तालुक्यात ४५ शाळांवर बंदीची कुºहाड कोसळणार आहे. जिल्ह्यात हा आकडा ५०० च्या पलीकडे जाण्याचा धोका आहे. असे झाल्यास गरिबांच्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणात वाताहत होण्याची शक्यता आंदोलनात व्यक्त करण्यात आली.यवतमाळ तालुक्यातील वडगाव, येळाबारा, अकोलाबाजार, घटाना केंद्रातील गणेशपूर, चौकी आकपुरी, चौकी झुली, येळाबारा पोड, मुरझडी, येवती, वरुड, हातगाव, वरझडी, कारेगाव, यावली, रामपूर, वडगाव, धानोरा, सुकळी, आकपुरी, वागदरा, रामवाकडी, दुधना पोड या गावातील पालकांनी आंदोलनात शासन निर्णयाचा विरोध केला. विशेष म्हणजे, ३० पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या गावातील लोकांनीही आंदोलनात सहभाग घेतला होता.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशनचे अध्यक्ष मनोहर विरुडकर, समन्वयक सुनिल भेले, राहुल कचरे, बंडू उईके, पुंडलीक कनाके, अशोक मेश्राम, विनायक रामगडे, अनिल नैताम, रमेश जाधव, विनोद राठोड, विठ्ठल दडांजे, विजय विरुटकर, किशोर जाधव, गणेश जाधव, संजय गज्जलवार, नयना पाटील, नीलेश जैस्वाल, भारत गाडेकर आदी उपस्थित होते.ग्रामसभांचे ठराव देणार शासनालायेत्या जागतिक महिला दिनी ८ मार्चला सर्वत्र ग्रामसभा होणार आहे. त्यात या २१ गावातील नागरिक कमी पटाच्या शाळा बंद करू नये, असा ठराव घेणार आहे. जिल्ह्यातील इतरही गावांनी असे ठराव करून फेडरेशनकडे पाठवावे. हे सर्व ठराव शासनाकडे पाठविण्यात येईल व त्या आधारेच न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात येईल, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष मनोहर विरुडकर, समन्वयक सुनिल भेले यांनी दिली.आमच्या पोडावर स्वातंत्र्य नाही का?कोलाम पोडांवर शाळा आहे, म्हणून सध्या स्वातंत्र्यदिन-गणराज्यदिनाला झेंडावंदनाचा कार्यक्रम साजरा होतो. आता शासन पोडांवरील शाळाच बंद करीत आहे. मग कोलाम पोडांवर राष्ट्रीय सण साजरे करायचे नाही का? आमच्या पोडांवर स्वातंत्र्य नाही का? असे गंभीर प्रश्न यावेळी आंदोलक गावकºयांनी उपस्थित केले.