शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

वणीत पाण्यासाठी हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 10:08 PM

येथील जिवनदायीनी निर्गुडा नदी आटल्याने वणीत पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला आहे. याबाबत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाण्यासाठी साकडे घातले आहे.

ठळक मुद्देनिर्गुडा आटली : नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील जिवनदायीनी निर्गुडा नदी आटल्याने वणीत पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला आहे. याबाबत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाण्यासाठी साकडे घातले आहे.निर्गुडा नदीतील पाणीसाठा संपल्याने नवरगाव धरणातून पाणी सोडावे लागते. यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने नवरगाव धरणात पुरेसा जलसाठा झाला नाही. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या सुरूवातीलाच ३८ टक्के जलसाठा या धरणात शिल्लक राहिला आहे. आता मार्च महिन्यापर्यंत पाणी कसे पुरणार, याची चिंता वाढली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवस पुरेल एवढे १७ दलघमी पाणी नदीत सोडण्याचे आदेश दिले. या १७ दलघमी पाणी वितरणासाठी योजना आखण्याचे सूचविले. त्यामुळे शहरात तीन दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येत आहे.गेल्या ७ जानेवारीला या नदीत पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर आता १७ जानेवारीला १७ दशलक्षघमी पाणी मिळणार होते. परंतु त्याआधीच नदीतील जलसाठा संपल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. शहरात सध्या तीन टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला. परंतु पाण्यासाठी हाहाकार झाल्याने सोमवारपासून १० टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.याबाबत नवरगाव प्रकल्पाच्या एका कर्मचाºयांना विचारणा केली असता, धरणात केवळ ३६.५० दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून रविवारी सायंकाळी हे पाणी सोडल्याचे त्यांनी सांगितले. सोडलेले पाणी सोमवारी रात्री १० वाजतापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मंगळवारी पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर शहरात पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. म्हणजे नागरिकांना आणखी एक दिवस पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे.तीन दिवसांपासून शहरात पाणी पुरवठा नसल्याने नागरिकांना वापरासाठी पाणी मिळत नाही. पिण्यालाही पाणी शिल्लक नसल्याने शहरातील पाणी विक्रीचा धंदा जोमाने वाढला आहे. जर जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईची ही परीस्थिती आहे, तर एप्रिल व मे महिन्यात नागरिकांना कोठून पाणी मिळणार, याची चिंता वणीकरांना लागली आहे.धरणात पाणी कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या उपाययोजनेनुसार शहरात पाणी पुरवठा सुरू आहे. परंतु नदी कोरडी पडल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.तारेंद्र बोर्डे,नगराध्यक्ष, न.प.वणी