शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

वणीत पाण्यासाठी हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:09 IST

येथील जिवनदायीनी निर्गुडा नदी आटल्याने वणीत पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला आहे. याबाबत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाण्यासाठी साकडे घातले आहे.

ठळक मुद्देनिर्गुडा आटली : नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील जिवनदायीनी निर्गुडा नदी आटल्याने वणीत पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला आहे. याबाबत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाण्यासाठी साकडे घातले आहे.निर्गुडा नदीतील पाणीसाठा संपल्याने नवरगाव धरणातून पाणी सोडावे लागते. यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने नवरगाव धरणात पुरेसा जलसाठा झाला नाही. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या सुरूवातीलाच ३८ टक्के जलसाठा या धरणात शिल्लक राहिला आहे. आता मार्च महिन्यापर्यंत पाणी कसे पुरणार, याची चिंता वाढली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवस पुरेल एवढे १७ दलघमी पाणी नदीत सोडण्याचे आदेश दिले. या १७ दलघमी पाणी वितरणासाठी योजना आखण्याचे सूचविले. त्यामुळे शहरात तीन दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येत आहे.गेल्या ७ जानेवारीला या नदीत पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर आता १७ जानेवारीला १७ दशलक्षघमी पाणी मिळणार होते. परंतु त्याआधीच नदीतील जलसाठा संपल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. शहरात सध्या तीन टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला. परंतु पाण्यासाठी हाहाकार झाल्याने सोमवारपासून १० टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.याबाबत नवरगाव प्रकल्पाच्या एका कर्मचाºयांना विचारणा केली असता, धरणात केवळ ३६.५० दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून रविवारी सायंकाळी हे पाणी सोडल्याचे त्यांनी सांगितले. सोडलेले पाणी सोमवारी रात्री १० वाजतापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मंगळवारी पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर शहरात पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. म्हणजे नागरिकांना आणखी एक दिवस पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे.तीन दिवसांपासून शहरात पाणी पुरवठा नसल्याने नागरिकांना वापरासाठी पाणी मिळत नाही. पिण्यालाही पाणी शिल्लक नसल्याने शहरातील पाणी विक्रीचा धंदा जोमाने वाढला आहे. जर जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईची ही परीस्थिती आहे, तर एप्रिल व मे महिन्यात नागरिकांना कोठून पाणी मिळणार, याची चिंता वणीकरांना लागली आहे.धरणात पाणी कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या उपाययोजनेनुसार शहरात पाणी पुरवठा सुरू आहे. परंतु नदी कोरडी पडल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.तारेंद्र बोर्डे,नगराध्यक्ष, न.प.वणी