शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वणीत पाण्यासाठी हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:09 IST

येथील जिवनदायीनी निर्गुडा नदी आटल्याने वणीत पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला आहे. याबाबत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाण्यासाठी साकडे घातले आहे.

ठळक मुद्देनिर्गुडा आटली : नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील जिवनदायीनी निर्गुडा नदी आटल्याने वणीत पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला आहे. याबाबत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाण्यासाठी साकडे घातले आहे.निर्गुडा नदीतील पाणीसाठा संपल्याने नवरगाव धरणातून पाणी सोडावे लागते. यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने नवरगाव धरणात पुरेसा जलसाठा झाला नाही. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या सुरूवातीलाच ३८ टक्के जलसाठा या धरणात शिल्लक राहिला आहे. आता मार्च महिन्यापर्यंत पाणी कसे पुरणार, याची चिंता वाढली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवस पुरेल एवढे १७ दलघमी पाणी नदीत सोडण्याचे आदेश दिले. या १७ दलघमी पाणी वितरणासाठी योजना आखण्याचे सूचविले. त्यामुळे शहरात तीन दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येत आहे.गेल्या ७ जानेवारीला या नदीत पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर आता १७ जानेवारीला १७ दशलक्षघमी पाणी मिळणार होते. परंतु त्याआधीच नदीतील जलसाठा संपल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. शहरात सध्या तीन टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला. परंतु पाण्यासाठी हाहाकार झाल्याने सोमवारपासून १० टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.याबाबत नवरगाव प्रकल्पाच्या एका कर्मचाºयांना विचारणा केली असता, धरणात केवळ ३६.५० दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून रविवारी सायंकाळी हे पाणी सोडल्याचे त्यांनी सांगितले. सोडलेले पाणी सोमवारी रात्री १० वाजतापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मंगळवारी पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर शहरात पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. म्हणजे नागरिकांना आणखी एक दिवस पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे.तीन दिवसांपासून शहरात पाणी पुरवठा नसल्याने नागरिकांना वापरासाठी पाणी मिळत नाही. पिण्यालाही पाणी शिल्लक नसल्याने शहरातील पाणी विक्रीचा धंदा जोमाने वाढला आहे. जर जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईची ही परीस्थिती आहे, तर एप्रिल व मे महिन्यात नागरिकांना कोठून पाणी मिळणार, याची चिंता वणीकरांना लागली आहे.धरणात पाणी कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या उपाययोजनेनुसार शहरात पाणी पुरवठा सुरू आहे. परंतु नदी कोरडी पडल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.तारेंद्र बोर्डे,नगराध्यक्ष, न.प.वणी