शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

पिंपळगावात कामगारांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:27 IST

नोंदणी केल्यावर कामाच्या साहित्याची किट न मिळाल्याने मंगळवारी कामगारांचा जमाव भडकला. त्यामुळे पिंपळगाव रस्त्यावर शेकडो कामगारांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे बायपासवरील जडवाहतूक बराच काळ खोळंबली होती. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचाºयांनी मध्यस्थी करून आंदोलन थांबविले.

ठळक मुद्देकिट न मिळाल्याने संताप : साहित्य वितरण करणाऱ्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा पोबारा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नोंदणी केल्यावर कामाच्या साहित्याची किट न मिळाल्याने मंगळवारी कामगारांचा जमाव भडकला. त्यामुळे पिंपळगाव रस्त्यावर शेकडो कामगारांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे बायपासवरील जडवाहतूक बराच काळ खोळंबली होती. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचाºयांनी मध्यस्थी करून आंदोलन थांबविले. मात्र किट कामगारांपर्यंत कधी पोहोचणार हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. साहित्य वितरण करण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेचे पदाधिकारीच उपस्थित नसल्याने गोंधळ वाढला. सायंकाळपर्यंत ही गोंधळाची स्थिती कायम होती.ज्या कामगारांनी आपली नोंद कामगार कार्यालयात केली आहे, त्यांना किट वितरित करण्यात येत आहे. याकरिता कामगार कार्यालयाकडे १६ कोटी रूपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. कामगारांचे हे साहित्य वितरित करण्याची जबाबदारी त्रयस्थ संस्थेला सोपविण्यात आली आहे. या संस्थेला मजुरांची संपूर्ण माहिती आॅनलाईन भरण्याचे काम सोपविण्यात आले आहे. यानंतर पाच हजार रूपयांची किट मजुरांना दिली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. तरी या ठिकाणी एजंटांनी डेरा टाकला आहे. हे एजंट मजुरांना पैसे मागतात. तुम्हाला किट मिळवून देतो, असे आश्वासन देतात. त्याचा ५०० ते २००० रूपये रेट आहे. या माध्यमातून मजुरांची लूट होत आहे.एजंटांच्या सूचनेनुसार मजूर सर्व कामे सोडून यवतमाळात येत आहे. किट वाटप करण्याची क्षमता १०० ते २०० इतकी असताना या ठिकाणी दररोज दोन ते अडीच हजार मजूर उभे राहत आहे. जिप्सी, ट्रॅक्स, मिनीडोअर, मालवाहू गाड्या भरून मजूर मध्यरात्रीच मुक्कामी येत आहे. पिंंपळगाव रोडवरील बालाजी मंगल कार्यालयालगत त्यांच्या रांगा लागत आहे.मात्र मंगळवारी या ठिकाणी किट वाटप करणारे कर्मचारीच आले नाही. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी रास्तारोको केला. यामुळे जडवाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. स्थिती स्फोटक झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचारी पोहोचल्यावर आंदोलक शांत झाले. मात्र चर्चेनंतरही योग्य तोडगा न निघाल्याने सायंकाळपर्यंत गोंधळाची स्थिती कायम राहिली.कामगारांनी एजंटांमार्फत काम करू नये. हे सारे काम मोफत आहे. एजंट आढळल्यास त्यांना कामगार कार्यालयाकडे आणावे. त्यांना योग्य धडा शिकविला जाईल.- राजदीप धुर्वे,जिल्हा कामगार अधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Strikeसंप