शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

पिंपळगावात कामगारांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:27 IST

नोंदणी केल्यावर कामाच्या साहित्याची किट न मिळाल्याने मंगळवारी कामगारांचा जमाव भडकला. त्यामुळे पिंपळगाव रस्त्यावर शेकडो कामगारांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे बायपासवरील जडवाहतूक बराच काळ खोळंबली होती. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचाºयांनी मध्यस्थी करून आंदोलन थांबविले.

ठळक मुद्देकिट न मिळाल्याने संताप : साहित्य वितरण करणाऱ्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा पोबारा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नोंदणी केल्यावर कामाच्या साहित्याची किट न मिळाल्याने मंगळवारी कामगारांचा जमाव भडकला. त्यामुळे पिंपळगाव रस्त्यावर शेकडो कामगारांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे बायपासवरील जडवाहतूक बराच काळ खोळंबली होती. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचाºयांनी मध्यस्थी करून आंदोलन थांबविले. मात्र किट कामगारांपर्यंत कधी पोहोचणार हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. साहित्य वितरण करण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेचे पदाधिकारीच उपस्थित नसल्याने गोंधळ वाढला. सायंकाळपर्यंत ही गोंधळाची स्थिती कायम होती.ज्या कामगारांनी आपली नोंद कामगार कार्यालयात केली आहे, त्यांना किट वितरित करण्यात येत आहे. याकरिता कामगार कार्यालयाकडे १६ कोटी रूपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. कामगारांचे हे साहित्य वितरित करण्याची जबाबदारी त्रयस्थ संस्थेला सोपविण्यात आली आहे. या संस्थेला मजुरांची संपूर्ण माहिती आॅनलाईन भरण्याचे काम सोपविण्यात आले आहे. यानंतर पाच हजार रूपयांची किट मजुरांना दिली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. तरी या ठिकाणी एजंटांनी डेरा टाकला आहे. हे एजंट मजुरांना पैसे मागतात. तुम्हाला किट मिळवून देतो, असे आश्वासन देतात. त्याचा ५०० ते २००० रूपये रेट आहे. या माध्यमातून मजुरांची लूट होत आहे.एजंटांच्या सूचनेनुसार मजूर सर्व कामे सोडून यवतमाळात येत आहे. किट वाटप करण्याची क्षमता १०० ते २०० इतकी असताना या ठिकाणी दररोज दोन ते अडीच हजार मजूर उभे राहत आहे. जिप्सी, ट्रॅक्स, मिनीडोअर, मालवाहू गाड्या भरून मजूर मध्यरात्रीच मुक्कामी येत आहे. पिंंपळगाव रोडवरील बालाजी मंगल कार्यालयालगत त्यांच्या रांगा लागत आहे.मात्र मंगळवारी या ठिकाणी किट वाटप करणारे कर्मचारीच आले नाही. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी रास्तारोको केला. यामुळे जडवाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. स्थिती स्फोटक झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचारी पोहोचल्यावर आंदोलक शांत झाले. मात्र चर्चेनंतरही योग्य तोडगा न निघाल्याने सायंकाळपर्यंत गोंधळाची स्थिती कायम राहिली.कामगारांनी एजंटांमार्फत काम करू नये. हे सारे काम मोफत आहे. एजंट आढळल्यास त्यांना कामगार कार्यालयाकडे आणावे. त्यांना योग्य धडा शिकविला जाईल.- राजदीप धुर्वे,जिल्हा कामगार अधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Strikeसंप