शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पिंपळगावात कामगारांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:27 IST

नोंदणी केल्यावर कामाच्या साहित्याची किट न मिळाल्याने मंगळवारी कामगारांचा जमाव भडकला. त्यामुळे पिंपळगाव रस्त्यावर शेकडो कामगारांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे बायपासवरील जडवाहतूक बराच काळ खोळंबली होती. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचाºयांनी मध्यस्थी करून आंदोलन थांबविले.

ठळक मुद्देकिट न मिळाल्याने संताप : साहित्य वितरण करणाऱ्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा पोबारा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नोंदणी केल्यावर कामाच्या साहित्याची किट न मिळाल्याने मंगळवारी कामगारांचा जमाव भडकला. त्यामुळे पिंपळगाव रस्त्यावर शेकडो कामगारांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे बायपासवरील जडवाहतूक बराच काळ खोळंबली होती. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचाºयांनी मध्यस्थी करून आंदोलन थांबविले. मात्र किट कामगारांपर्यंत कधी पोहोचणार हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. साहित्य वितरण करण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेचे पदाधिकारीच उपस्थित नसल्याने गोंधळ वाढला. सायंकाळपर्यंत ही गोंधळाची स्थिती कायम होती.ज्या कामगारांनी आपली नोंद कामगार कार्यालयात केली आहे, त्यांना किट वितरित करण्यात येत आहे. याकरिता कामगार कार्यालयाकडे १६ कोटी रूपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. कामगारांचे हे साहित्य वितरित करण्याची जबाबदारी त्रयस्थ संस्थेला सोपविण्यात आली आहे. या संस्थेला मजुरांची संपूर्ण माहिती आॅनलाईन भरण्याचे काम सोपविण्यात आले आहे. यानंतर पाच हजार रूपयांची किट मजुरांना दिली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. तरी या ठिकाणी एजंटांनी डेरा टाकला आहे. हे एजंट मजुरांना पैसे मागतात. तुम्हाला किट मिळवून देतो, असे आश्वासन देतात. त्याचा ५०० ते २००० रूपये रेट आहे. या माध्यमातून मजुरांची लूट होत आहे.एजंटांच्या सूचनेनुसार मजूर सर्व कामे सोडून यवतमाळात येत आहे. किट वाटप करण्याची क्षमता १०० ते २०० इतकी असताना या ठिकाणी दररोज दोन ते अडीच हजार मजूर उभे राहत आहे. जिप्सी, ट्रॅक्स, मिनीडोअर, मालवाहू गाड्या भरून मजूर मध्यरात्रीच मुक्कामी येत आहे. पिंंपळगाव रोडवरील बालाजी मंगल कार्यालयालगत त्यांच्या रांगा लागत आहे.मात्र मंगळवारी या ठिकाणी किट वाटप करणारे कर्मचारीच आले नाही. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी रास्तारोको केला. यामुळे जडवाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. स्थिती स्फोटक झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचारी पोहोचल्यावर आंदोलक शांत झाले. मात्र चर्चेनंतरही योग्य तोडगा न निघाल्याने सायंकाळपर्यंत गोंधळाची स्थिती कायम राहिली.कामगारांनी एजंटांमार्फत काम करू नये. हे सारे काम मोफत आहे. एजंट आढळल्यास त्यांना कामगार कार्यालयाकडे आणावे. त्यांना योग्य धडा शिकविला जाईल.- राजदीप धुर्वे,जिल्हा कामगार अधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Strikeसंप