शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पक्षपाती धोरणाला कामगार वैतागले

By admin | Updated: August 13, 2015 03:10 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारात पक्षपाती धोरण राबविले जात आहे.

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारात पक्षपाती धोरण राबविले जात आहे. मर्जीतील कामगारांना सोयीच्या आणि आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या ड्युटीवर पाठविले जात आहे. या प्रकारात अनेक कामगारांवर अन्याय होत आहे. याविषयी तक्रार केल्यानंतरही संबंधितांवर विभाग नियंत्रकांकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे पक्षपात करणाऱ्यांचे मनोबल वाढत चालले आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या यवतमाळ आगाराला विविध प्रश्नांनी ग्रासले आहे. अशातच वरिष्ठांकडून कनिष्ठ कामगारांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. मर्जीतल्या व्यक्तीची ड्युटी लावण्यासाठी इतरांवर अन्याय केला जात आहे. एवढ्यावरच हा प्रकार थांबत नाही तर काही कामगारांवर छोट्या छोट्या कारणांसाठी दंडही लावला जात आहे. बसस्थानक प्रमुख आणि वाहतूक निरीक्षक यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे. एकाच कामगारावर वारंवार दंड लावून त्यांचा मानसिक छळ होत आहे. वाहतूक निरीक्षक आणि बसस्थानक प्रमुखांच्या मनमानी धोरणामुळे बसफेऱ्या रद्दचेही प्रकार होत आहे. यामुळे हजारो रुपयांचे नुकसान एसटीला होत आहे. प्रवाशांची गैरसोय झाली ती वेगळीच. मर्जीतील चालक-वाहकांना टी-९ प्रमाणे लांबपल्ल्याची कामगिरी आल्यास परस्पर बदलून दिली जाते किंवा वेळेवर अर्जसुद्धा स्वीकारला जातो. मात्र इतरांना जाणीवपूर्वक त्रस्त करून सोडले जाते. रजेचा अर्ज न स्वीकारणे, जाणिवपूर्वक लांब पल्ल्याच्या कामगिरीवर लावणे या प्रकारातून होणारा मानसिक त्रास असह्य होत चालला आहे. ही बाब विभाग नियंत्रकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही आगारातील अधिकाऱ्यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप आहे. यवतमाळ आगारात कामगारांशी दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांपर्यत झालेल्या आहेत. काही प्रकरणात चौकशीही सुरू झाली आहे. याचा परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे. या परिस्थितीत महामंडळाच्या वरिष्ठांनी दुजाभाव होण्याचा प्रकार थांबविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.विशिष्ट लोकांकडून चूक झाली तरी त्यांच्यावर कारवाईतही चालढकल केली जात आहे. अशी अनेक प्रकरणे जिल्ह्याच्या विविध आगारामध्ये घडली आहे. शिवाय कित्येक प्रकरणांमध्ये कारवाईसाठी टाळाटाळ केली जाते. शेकडो प्रकरणे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. आगारातून सोडल्या जाणाऱ्या बहुतांश फेऱ्या विलंबाने जाण्याचे प्रकारही घडत आहे. (वार्ताहर)