शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ऊसतोड कामगार निघाले कारखान्याकडे

By admin | Updated: November 6, 2016 00:25 IST

साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत असल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातून ऊस तोडणीसाठी हजारो कामगार रवाना होत आहेत.

गाव, वाड्या, तांडे ओस : ४० हजारांवर मजूर रवाना पुसद : साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत असल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातून ऊस तोडणीसाठी हजारो कामगार रवाना होत आहेत. दिवाळीनंतर तांडे, वाड्या, वस्त्यांत कारखान्याला जाण्यासाठी मजुरांची लगबग झाली असून मजुरांना निरोप देण्यासाठी कुटुंब रस्त्यावर थांबलेले दिसतात. आतापर्यंत हजारो मजूर ऊस तोडणीसाठी गेल्याने तालुक्यातील तांडे-वाडे ओस पडली आहे.यावर्षी काही भागात चांगला पाऊस झाला तर काही भागात कमी पाऊस झाल्याने शेती व्यवसायही संकटात आला आहे. त्यामुळे कुटुंबासह ऊसतोड मजूर महाराष्ट्रासह इतर राज्यात स्थलांतर करीत असल्याचे दिसत आहे. शेकडो मजूर स्थलांतर झाल्याने या ऊसतोड कामगारांच्या पाल्याचे शिक्षणही बुडण्याची शक्यता आहे. पुसद तालुक्यात अनेक गावाहून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा ठिकाणी कामाला जात आहेत. चार ते पाच महिने पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगारांना आपल्या कुटुंबासह जातात. ऊसतोड मजुरांचे आठ ते पंधरा दिवसात या गावाहून त्या गावाला कामगारांचा टोळ्याचे स्थलांतर होत असल्याने तसेच अनेक ठिकाणी शाळांची सोय नसल्याने ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. ट्रक, ट्रॅक्टर तालुक्यातील वाड्या व रस्त्यांवर हजर होतात. मजुरांच्या स्थलांतरामुळे बाजारपेठेवर परिणाम जाणवणार आहे. परंपरागत असलेल्या ऊसतोडीचा धंदा थांबता थांबत नाही. बारमाही बायागतीचा तालुक्यात अभाव असल्याने मजूर दरवर्षी बाहेर जात आहे. स्थलांतरित मजुरांचा आकडा समोर आला नसला तरी दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातून ४० हजाराच्यावर ऊसतोड मजुरांचे स्थलांतर होणार असल्याचे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)स्थानिक कापूस उत्पादकांची होणार कोंडीतालुक्यातील बहुतांश शेतमजूर ऊस तोडणीसाठी बाहेर जिल्ह्यात जात आहेत. चांगल्या रोजगाराच्या शोधात दरवर्षी मजुरांचे कुटुंबच्या कुटुंब स्थालांतरित होते. परंतु, या स्थलांतरामुळे तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांची मोठी कोंडी होते. तालुक्यात उसाप्रमाणेच कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या कापूस वेचणीचे काम सुरू आहे. मात्र तालुक्यातील मजूर मोठ्या प्रमाणात बाहेर जात असल्याने स्थानिक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.