शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

मराठवाड्यातील कामगारांचे लोंढे विदर्भात

By admin | Updated: November 21, 2015 02:48 IST

अपुऱ्या पावसाने मराठवाडयातिल शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतात पीक नसल्याने मजुरांच्या हातात काम राहीले नाही.

कामाचा शोध : साखर कारखाने, वीटभट्ट्या आणि कापूस वेचणीरूपेश उत्तरवार यवतमाळअपुऱ्या पावसाने मराठवाडयातिल शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतात पीक नसल्याने मजुरांच्या हातात काम राहीले नाही. यामुळे मजुरीच्या शोधात निघालेल्या मजुरांनी आपले गाव सोडले आहे. या कामाच्या शोधात मजुरांनी विदर्भात पाऊल ठेवले आहे. मजुरांचे लोंढे विदर्भाच्या दिशेने आगेकूच करीत आहे. साखर कारखाने, वीटभट्या आणि कापसाकरिता हे मजूर गावागावात काम शोधत आहे.रोजगार हमी योजनेतून कामाची हमी मजुरांना देण्यात आली आहे. तरी सध्या गावात काम उपलब्ध नाही. यामुळे मजूर कामाच्या शोधात विदर्भाकडे निघाले आहेत. प्रामुख्याने रस्त्यांच्या कामासाठी हे मजूर विदर्भात येत आहे. यासोबतच ऊसतोडीसाठी मजूर मोठ्या प्रमाणात साखर कारखान्याच्या क्षेत्रात वळले आहे. हिंगोली जिल्ह्यातील भटसावंगी तांडा गावातील शेतमजुरांनी गाव सोडले. हे मजूर वर्धा जिल्ह्यातील साखर कारखाण्यासाठी दाखल झाले आहे. त्यासोबत यवतमाळ जिल्ह्यातील वीटभट्टीवर काम करण्यासाठी काही मजूर जिल्ह्यात आले आहे. याचप्रमाणे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील कामगार कामाच्या शोधात उपराजधानीपर्यंत पोहचले आहेत. संपूर्ण परिवारच कामावरमजुरीच्या शोधात निघालेली मंडळी आबालवृध्दासह कामावर गेली आहे. यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कामाच्या शोधावर निघालेली ही मंडळी जूनपर्यंत स्वगृही परतणार नसल्याचे देवीदास पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सरकारने पावले उचलण्याची गरज असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.