शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

‘वसंत’मध्ये पुन्हा काम बंद

By admin | Updated: March 8, 2015 02:07 IST

गत आठ महिन्यांपासून थकीत असलेल्या वेतनासाठी पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कारखान्याचे गाळप ठप्प झाले आहे.

उमरखेड : गत आठ महिन्यांपासून थकीत असलेल्या वेतनासाठी पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कारखान्याचे गाळप ठप्प झाले आहे. वसंत सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे गत आठ महिन्यांपासून वेतन थकीत आहे. अनेकदा निवेदने देण्यात आली. आंदोलनेही करण्यात आली. परंतु उपयोग झाला नाही. त्यानंतर कामगार संघटनेच्यावतीने मोर्चा काढला. त्यावेळी कामगार आणि प्रशासनात बोलणी होवून वाटाघाटी झाली होती. त्यानंतरही वेतन मिळाले नाही. शेवटी ५ मार्च रोजी कामगारांनी काखान्यावर मोर्चा नेला.परंतु संचालक मंडळाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे कामगारांनी गाळप थांबवून गेटसमोर ठिय्या दिला आहे. विशेष म्हणजे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ३६ हजार टन ऊस उभा असून यामुळे शेतकरी धास्तावले आहे. दुसरीकडे कामगारांना पगार नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. किराणा, दवाखाना व मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी कामगारांजवळ पैसेच नाही. परंतु कारखाना प्रशासन दखल घ्यायला तयार नाही. कारखान्याचे माजी अध्यक्ष तातू देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश चव्हाण यांनी कामगारांना समजावून सांगत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहे. कामगारांचे आठ महिन्यांचे वेतन, सेवानिवृत्त कामगारांचे पैसे त्याचबरोबर कायम व हंगामी कर्मचाऱ्यांचा फरक यासह विविध योजनेतील थकबाकी असे सुमारे दहा कोटी रुपये कारखान्याकडे थकीत आहे. परंतु कारखाना प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. दोन दिवसांपासून गाळप बंद असल्याने कारखान्यासमोर उसाने भरलेले ट्रक व ट्रॅक्टर उभे असून साखर प्रक्रिया थांबल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. (शहर प्रतिनिधी)