शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

‘जन-धन’मध्ये निव्वळ खाते उघडण्याचेच काम

By admin | Updated: January 24, 2015 23:03 IST

केंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी ‘पंतप्रधान जन-धन’ योजनेचे निव्वळ खाते उघडण्याचे काम सुरू आहे. मात्र बहुतांश खात्यावरून कुठलेही व्यवहार होताना दिसत नाही.

अखिलेश अग्रवाल - पुसदकेंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी ‘पंतप्रधान जन-धन’ योजनेचे निव्वळ खाते उघडण्याचे काम सुरू आहे. मात्र बहुतांश खात्यावरून कुठलेही व्यवहार होताना दिसत नाही. खाते उघडल्यानंतर ४५ दिवसापर्यंत व्यवहार न केल्यास विमा योजनेचा व इतर लाभ मिळणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केलेले आहे. याबाबत नागरिकांना पुरेशी माहिती नसल्याचे समोर आले आहे. जन-धन योजनेतील खातेदाराचा अकस्मिक मृत्यू झाल्यास त्याच्या परिवारातील एक लाख रुपयांची विमा रक्कम देण्यात येणार असल्याचे बँकांना शासनाने कळविले आहे. इतर सुविधाही देण्यात येणार आहेत. केंद्राने ज्या उद्देशाने ही योजना सुरू केली. तो उद्देश अजूनही सफल होत नसल्याचे चित्र आहे. त्यापुढे केंद्राच्या उद्देशाप्रमाणे पैसा चालनात आलेला नाही. झिरो बॅलन्सची खाती अधिक असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान याचा गैरफायदा घेत काहींनी खाते उघडण्यासाठी प्रती व्यक्ती ५० रुपये आकारणीही सुरू केल्याचे समोर आले आहे. केंद्र शासनाने जन-धन योजनेचा प्रचार, प्रचार केल्याने प्रत्येक नागरिकाला आपले खाते बँकेत असावे असे वाटत आहे. मात्र कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत सहजपणे जन-धन योजनेचे खाते उघडता येत नाही. याचा पुसद शहरात अनेकांना प्रत्यय आला आहे. जन-धन योजने अंतर्गत खाते उघडणाऱ्या ग्राहकाला एक लाखाचा अपघात विम्याचे कवच देण्यात आले आहे. मात्र हा निधी कसा दिला जाईल याविषयी बँकादेखील अनभिज्ञ आहेत. याव्यतिरिक्त नागरिकांमध्ये या योजनेविषयी वेगवेगळे गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे योजनेचा उद्देश नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जिल्ह्यात विविध बँकामध्ये लाखो ग्राहकांनी जन-धन योजनेत खाते उघडले. त्यापैकी निम्म्याहून अधिक ग्राहकांनी खात्यावर व्यवहार केला नसल्याचे पुढे आले.