शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकाविना चालणार नगरपरिषदेचे कामकाज

By admin | Updated: July 21, 2014 00:23 IST

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर यवतमाळच्या नगरपरिषद सभागृहात विरोधी गटच शिल्लक नाही. सदस्य संख्येच्या एकदशांश म्हणजे चार सदस्याचे समर्थन असलेली व्यक्ती विरोधी पक्ष नेता होऊ शकते.

सर्वच पक्ष सत्तेत : सांसदीय लोकशाहीचा विसर सुरेंद्र राऊत - यवतमाळ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर यवतमाळच्या नगरपरिषद सभागृहात विरोधी गटच शिल्लक नाही. सदस्य संख्येच्या एकदशांश म्हणजे चार सदस्याचे समर्थन असलेली व्यक्ती विरोधी पक्ष नेता होऊ शकते. मात्र विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी स्विकारण्यास सध्यातरी कोणी दिसत नाही. त्यामुळे विरोधकांशिवाय कामकाज चालणार आहे. सांसदीय लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याला अनन्यसाधारण महत्व असते. किंबहुना सत्ताधाऱ्यापेक्षा विरोधी पक्षनेत्यावर अधिक जबाबदारी येते. मात्र यवतमाळ नगरपरिषदेत सर्र्वच पक्षांनी सत्तेत सहभाग घेतला आहे. यवतमाळ नगरपरिषदेत आजपर्यंत अनिर्बंध सत्ता राहिली आहे. त्यामुळे शहरावर दूरगामी परिणाम करणाऱ्या चुकाही घडल्या आहेत. तीच परंपरा आताही कायम राहणार असे दिसून येते. नगरपरिषदेत विरोधी बाकावर कोणीच बसायला तयार नाही. सक्षम विरोधक म्हणून काँग्रेस पक्ष पुढे येईल असे वाटत असतानाच काँग्रेसने तडजोड स्वीकारली. केवळ सभापतीपद आणि स्थायी समिती सदस्य या दोन पदावर काँग्रेसच्या नगरसेवकांनी नांग्या टाकल्या. नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा होत असेल तर विरोध करायचा नाही, असा आदेश काँग्रेस नेत्यांनी दिला. त्यामुळे तसा प्रयत्न कोणीच केला नाही. उलट सत्तेत भागीदारी मिळविण्यासाठी वाटाघाटी केली. नगरपरिषदेत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, अपक्ष आणि काँग्रेस नगरसेवकांनी मिळून सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेसचे सात सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या सोबत आहे. यातच काँग्रेस गटनेत्याचा वाद असल्याने उरलेल्या चार काँग्रेस सदस्यापैकी कोण विरोधी पक्षनेता म्हणून पुढे येणार हेही निश्चित नाही. नगरपरिषदेत आतापर्यत अनिर्बंध सत्ता असल्याने विकासात अनेक उणिवा कायम आहेत. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. शहरात होत असलेल्या अवैध बांधकामाला विरोधच झाला नाही. नगरपरिषदेतील कंत्राटाचे दर वाढविताना शिक्षणाच्या सोयी सुविधाकडे कोणीच लक्ष दिले नाही. अर्थसंकल्पात शिक्षण आणि क्रीडा या सारख्या महत्वपूर्ण बाबींसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणीच झाली नाही. आजही शहरातील मुख्या बाजारपेठसह सर्वाजनिक ठिकाणी महिला प्रसाधन गृहाची समस्या कायम आहे. शहरातील मैदानावर धार्मिक स्थळाचे अतिक्रमण झाले आहे. शहरावर लगतच्या ग्रामपंचायतीचा वाढता दाब कोणीच लक्षात घेतला नाही. रस्ते, नाल्या पथदिवे आणि कचरा सफाई हिच नगरपरिषदेची जबाबदारी मानण्यात आली. पार्कीगअभावी अपघात वाढले आहे. आताही विरोधकाविनाच नगरपरिषदेचे कामकाज चालणार आहे.