शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘पेयजल’ची कामे रखडली

By admin | Updated: August 10, 2016 01:05 IST

जिल्हा परिषदेमार्फत ४६ गावांमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे अत्यंत संथगतीने होत असल्याने ...

४६ गावे : १० योजना पूर्ण करणे प्रशासनाला अशक्यच यवतमाळ : जिल्हा परिषदेमार्फत ४६ गावांमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे अत्यंत संथगतीने होत असल्याने पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात तरी संबंधित गावांतील ग्रामस्थांना पाणी मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्ह्यातील ४६ गावांमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे सुरू आहे. यंत्रणेच्या कासवगतीने या योजना अद्याप पूर्ण होऊ शकल्या नाहीत. यापैकी सध्या ३६ योजनांची कामे प्रथगतीपथावर असल्याचे सांगितले जाते. उर्वरित १० गावांमधील योजना कोणत्याही स्थितीत पूर्णत्वास जाण्याची शक्यता नाही, असे खुद्द जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुफाटे यांनीच स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे येत्या सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले आहे. तथापि हा अल्टिमेटमही यंत्रणा मनावर घेण्याची शक्यता कमीच दिसत आहे. शिरपूर पॅटर्नप्रमाणे जिल्ह्यात यवतमाळ पॅटर्न राबविण्यात येत आहे. यात १३१ ठिकाणी विहीर पुर्नभरण कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. मात्र त्यापैकी ८१ ठिकाणीच हा पॅटर्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. परिणामी या महत्त्वाकांक्षी पॅटर्नची नव्याने मांडणी करावी लागणार आहे. याशिवाय महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पाच हजार ११२ विहिरींची कामे पूर्ण झाल्याचेही सांगण्यात येते. सात हजार ३८७ विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. विदर्भ धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत दोन हजार २१३ विहिरी प्रस्तावित आहे. (शहर प्रतिनिधी) सोलर पंप ठरले कुचकामी मारेगाव तालुक्यातील इंदिरानगर-धरमपोड येथील सोलर पंप गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. या पंप दुरूस्तीसाठी पुणे येथील संबंधित तांत्रिक कर्मचाऱ्याशी संपर्क करावा लागतो. मात्र संपर्क करूनही ते येत नाहीत. त्यामुळे एवढ्या दूरच्या एंजसीला कंत्राट देण्याचे कारणच काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांनी सोलर पंप कुचकामी असल्यास ते घेण्याचा कोणताही लाभ नसून याबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.