शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
3
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
4
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
5
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
6
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
7
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
8
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
9
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
10
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
11
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
12
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
13
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
14
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
15
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
16
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
17
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
18
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
19
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
20
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."

‘पेयजल’ची कामे रखडली

By admin | Updated: August 10, 2016 01:05 IST

जिल्हा परिषदेमार्फत ४६ गावांमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे अत्यंत संथगतीने होत असल्याने ...

४६ गावे : १० योजना पूर्ण करणे प्रशासनाला अशक्यच यवतमाळ : जिल्हा परिषदेमार्फत ४६ गावांमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे अत्यंत संथगतीने होत असल्याने पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात तरी संबंधित गावांतील ग्रामस्थांना पाणी मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्ह्यातील ४६ गावांमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे सुरू आहे. यंत्रणेच्या कासवगतीने या योजना अद्याप पूर्ण होऊ शकल्या नाहीत. यापैकी सध्या ३६ योजनांची कामे प्रथगतीपथावर असल्याचे सांगितले जाते. उर्वरित १० गावांमधील योजना कोणत्याही स्थितीत पूर्णत्वास जाण्याची शक्यता नाही, असे खुद्द जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुफाटे यांनीच स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे येत्या सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले आहे. तथापि हा अल्टिमेटमही यंत्रणा मनावर घेण्याची शक्यता कमीच दिसत आहे. शिरपूर पॅटर्नप्रमाणे जिल्ह्यात यवतमाळ पॅटर्न राबविण्यात येत आहे. यात १३१ ठिकाणी विहीर पुर्नभरण कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. मात्र त्यापैकी ८१ ठिकाणीच हा पॅटर्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. परिणामी या महत्त्वाकांक्षी पॅटर्नची नव्याने मांडणी करावी लागणार आहे. याशिवाय महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पाच हजार ११२ विहिरींची कामे पूर्ण झाल्याचेही सांगण्यात येते. सात हजार ३८७ विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. विदर्भ धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत दोन हजार २१३ विहिरी प्रस्तावित आहे. (शहर प्रतिनिधी) सोलर पंप ठरले कुचकामी मारेगाव तालुक्यातील इंदिरानगर-धरमपोड येथील सोलर पंप गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. या पंप दुरूस्तीसाठी पुणे येथील संबंधित तांत्रिक कर्मचाऱ्याशी संपर्क करावा लागतो. मात्र संपर्क करूनही ते येत नाहीत. त्यामुळे एवढ्या दूरच्या एंजसीला कंत्राट देण्याचे कारणच काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांनी सोलर पंप कुचकामी असल्यास ते घेण्याचा कोणताही लाभ नसून याबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.