शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

‘पेयजल’ची कामे रखडली

By admin | Updated: August 10, 2016 01:05 IST

जिल्हा परिषदेमार्फत ४६ गावांमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे अत्यंत संथगतीने होत असल्याने ...

४६ गावे : १० योजना पूर्ण करणे प्रशासनाला अशक्यच यवतमाळ : जिल्हा परिषदेमार्फत ४६ गावांमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे अत्यंत संथगतीने होत असल्याने पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात तरी संबंधित गावांतील ग्रामस्थांना पाणी मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्ह्यातील ४६ गावांमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे सुरू आहे. यंत्रणेच्या कासवगतीने या योजना अद्याप पूर्ण होऊ शकल्या नाहीत. यापैकी सध्या ३६ योजनांची कामे प्रथगतीपथावर असल्याचे सांगितले जाते. उर्वरित १० गावांमधील योजना कोणत्याही स्थितीत पूर्णत्वास जाण्याची शक्यता नाही, असे खुद्द जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुफाटे यांनीच स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे येत्या सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले आहे. तथापि हा अल्टिमेटमही यंत्रणा मनावर घेण्याची शक्यता कमीच दिसत आहे. शिरपूर पॅटर्नप्रमाणे जिल्ह्यात यवतमाळ पॅटर्न राबविण्यात येत आहे. यात १३१ ठिकाणी विहीर पुर्नभरण कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. मात्र त्यापैकी ८१ ठिकाणीच हा पॅटर्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. परिणामी या महत्त्वाकांक्षी पॅटर्नची नव्याने मांडणी करावी लागणार आहे. याशिवाय महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पाच हजार ११२ विहिरींची कामे पूर्ण झाल्याचेही सांगण्यात येते. सात हजार ३८७ विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. विदर्भ धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत दोन हजार २१३ विहिरी प्रस्तावित आहे. (शहर प्रतिनिधी) सोलर पंप ठरले कुचकामी मारेगाव तालुक्यातील इंदिरानगर-धरमपोड येथील सोलर पंप गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. या पंप दुरूस्तीसाठी पुणे येथील संबंधित तांत्रिक कर्मचाऱ्याशी संपर्क करावा लागतो. मात्र संपर्क करूनही ते येत नाहीत. त्यामुळे एवढ्या दूरच्या एंजसीला कंत्राट देण्याचे कारणच काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांनी सोलर पंप कुचकामी असल्यास ते घेण्याचा कोणताही लाभ नसून याबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.