शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या डोक्यावर हंडा

By admin | Updated: August 22, 2014 00:09 IST

निसर्गाचा असमतोल, लहरी पाऊस आणि ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहिमेचे अपयश, यामुळे पुसद तालुक्यात पावसाळ्यात ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पावसाळ्यात पाणीटंचाई : पूस धरणात १६ टक्के जलसाठापुसद : निसर्गाचा असमतोल, लहरी पाऊस आणि ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहिमेचे अपयश, यामुळे पुसद तालुक्यात पावसाळ्यात ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही महिलांच्या डोक्यावरील पाण्याच्या हंड्याचे आझे कमी झाले नाही. यंदा तर अल्प पावसाने सर्वाच्या तोंडचे पाणी पळाले असून पुस धरणातही केवळ १६ टक्के जलसाठा आहे. परिणामी टंचाईची स्थिती आणखी दाहक होण्याची चिन्हे आहे.गेल्या वीस वर्षाचा आढावा घेतला तर पर्जन्यमानात सातत्य राहिलेले नाही. सरासरी एवढाही पाऊस होत नाही. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया मंदावली आहे. जानेवारी महिन्यापासूनच नदी, नाले, विहिरी, हातपंप कोरड्या पडतात. यावर्षी तर पुसद तालुक्यावर वरुण राजाची वक्रदृष्टी असल्याने १९ आॅगस्टपर्यंत केवळ १७० मिमी एवढाच पाऊस झाला. तालुक्यातील लहान-मोठ्या तलावातील पाणी आटले आहेत. पूस धरणात सुमारे १६ टक्के जलसाठा आहे. शेतातील विहिरीच्या पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले. तरीही भयावह परिस्थिती आहे. आगामी उन्हाळ्यात पुसद शहराला टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागेल अशी वेळ येऊ शकते. उन्हाळ्यात पाणी पातळी खोल जात असते पण यावर्षी पावसाळ्यातच झळ सोसावी लागत आहे.दरवर्षी प्रशासकीयस्तरावर पाणीटंचाई निवारण करण्याच्या अनुषंगाने विंधन विहिरी, नळयोजना, अनुदानावर विहिरी यावर लाखो रुपये खर्च केला जाते. पण त्या विहिरी कुणाला मिळाल्या त्यापैकी किती विहिरींना पाणी लागले किंवा नाही किती कोरड्या आहेत व त्याची कारणे शासकीय यंत्रणेने कधी चौकसपणे तपासणी केली का ? असे अनेक प्रश्न पाणीटंचाई अनुषंगाने निर्माण होतात. राज्य सरकार जलस्वराज्य, भारत निर्माण सारख्या योजना राबविते. मात्र मुळात जमिनीच्या पोटात पाणी नसल्यामुळे या योजना निष्क्रीय ठरतात. पुसद शहरासह तालुक्यात आठ ते दहा हजार विंधन विहिरीद्वारे व सात हजार विहिरींद्वारे पाण्याचा उपसा केला जात आहे. ग्रामीण भागात शेती सिंचनासाठी तर शहरी भागात सांडपाणी आणि पिण्यासाठी पाणी उपसले जात आहे. पावसाळ्यात एक मीटर पाणी मुरण्यासाठी शंभर तास ते शंभर दिवस एवढा कालावधी लागतो. मात्र एवढ्या पाण्याचा उपसा केवळ अवघ्या काही तासात केला जात आहे. यामुळेच पाण्याची भीषणता निर्माण होऊ लागली आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंंबासाठी झगडावे लागणार असल्याची शक्यता यावरून दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)