शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

स्त्री अर्धांगिणी नव्हे ‘कम्प्लीट’ सहकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 21:57 IST

आजही अनेक घरांमध्ये महिलांना बरोबरीचे स्थान दिले जात नाही. जिथे थोडाबहुत मान दिला जातो, तिथेही तिला पुरुषाची अर्धांगिणी म्हटले जाते. पण स्त्रिया पुरुषांच्या अर्धांगिणी नाहीत, आयुष्यात बरोबरीने वाटचाल करणाऱ्या सहकारी आहेत.

ठळक मुद्देवैशाली डोळस : माळी महासंघातर्फे राज्यातील पहिले महिला अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आजही अनेक घरांमध्ये महिलांना बरोबरीचे स्थान दिले जात नाही. जिथे थोडाबहुत मान दिला जातो, तिथेही तिला पुरुषाची अर्धांगिणी म्हटले जाते. पण स्त्रिया पुरुषांच्या अर्धांगिणी नाहीत, आयुष्यात बरोबरीने वाटचाल करणाऱ्या सहकारी आहेत. किती दिवस आम्ही अर्धे अंग होऊन फरफट राहायचे? आम्हीही कम्प्लीट माणूस आहोत, हे ठासून सांगण्याची आता गरज आहे, असे रोखठोक प्रतिपादन औरंगाबादच्या सुप्रसिद्ध विचारवंत वैशाली डोळस यांनी केले.अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने शुक्रवारी येथील संदीप मगलम्मध्ये राज्यातील पहिले महिला अधिवेशन संपन्न झाले. यावेळी त्या बोलत होत्या. माळी समाजातील पहिल्या महिला आयएएस गृहविभागाच्या उपसचिव भाग्यश्री बानाईत-धिवरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी केंद्रीय सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य प्रगती मानकर होत्या. विशेष अतिथी म्हणून माळी महासंघाचे प्रांताध्यक्ष शंकरराव लिंगे, प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष निशिगंधा माळी, औद्योगिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद डाके आदी मान्यवर उपस्थित होते.महिलांची भरगच्च उपस्थिती ठरली लक्षवेधीअखिल भारतीय माळी महासंघाने आयोजित केलेल्या पहिल्या महिला अधवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते. पिवळे फेटे घातलेल्या सावित्रीच्या लेकींनी जय ज्योती जय क्रांतीचा घोष केला. विशेष म्हणजे, महिला अधिवेशन असूनही पुरुषांची हजेरी लक्षणीय होती. संपूर्ण सभागृह महिलांनीच भरून गेल्यामुळे पुरुषांची बैठक व्यवस्था बाहेर करण्यात आली. प्रोजेक्टर लावून त्यांना अधिवेशन ‘लाईव्ह’ पाहता आले. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासह विविध समाजसुधारकांच्या पुस्तकांच्या स्टॉलवरही यावेळी गर्दी झाली होती.