शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

विहीर अधिग्रहणाच्या पैशासाठी वृद्धेची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:27 IST

तालुक्यातील उमरठा येथील एका महिला शेतकऱ्याची विहीर नेर पंचायत समितीने मागीलवर्षी अधिग्रहीत केली. बारमाही पिकांचे ओलित सोडून त्या माऊलीने ग्रामस्थांना पाणी पुरविले. मात्र आता त्याच माऊलीला विहीर अधिग्रहणाचे पैसे मिळविण्यासाठी प्रशासनाच्या दारात भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देद्वारकाबाईची व्यथा : पिकाला तिलांजली देऊन पाजले ग्रामस्थांना पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील उमरठा येथील एका महिला शेतकऱ्याची विहीर नेर पंचायत समितीने मागीलवर्षी अधिग्रहीत केली. बारमाही पिकांचे ओलित सोडून त्या माऊलीने ग्रामस्थांना पाणी पुरविले. मात्र आता त्याच माऊलीला विहीर अधिग्रहणाचे पैसे मिळविण्यासाठी प्रशासनाच्या दारात भटकंती करावी लागत आहे.तालुक्यातील परजना-उमरठा येथे पाणीटंचाई पाचविलाच पुजलेली आहे. त्यामुळे उमरठा येथील विधवा शेतकरी महिला व्दारकाबाई नथ्थूजी पाढेन यांच्या शेतातील विहिरीवरून गावाला पाणीपुरवठा केला जातो. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. ग्रामपंचायत उमरठा, पंचायत समिती नेर व तहसीलदारांच्या संयुक्त मागणीवरून एप्रिल २०१७ मध्ये त्यांच्या शेतातील विहीर अधिग्रहीत करण्यात आली. त्यापोटी मोबदला देण्याचे ठरले. मागीलवर्षी याच विहिरीवरून परजना गावाला पाणीपुरवठा केला गेला. त्यांनी पिकाचे ओलित बाजूला सारून गावकºयांना पाणी पाजले. त्यांच्या नशीबी पाण्याच्या मोदबल्यासाठी भटकंतीची वेळ आली.व्दारकाबार्इंना एप्रिल २०१७ ते ३० जून २०१७ या उन्हाळ्यातील तीन महिन्यांचा मोबदला मिळाला. मात्र परजना गावाला कायमस्वरूपी पाणी पुरवीत असतानाही त्यांना मोबदला मिळाला नाही. यामुळे त्यांनी पाणी बंद करून पिकाला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाणी पुरवठा प्रशासनाने त्यांच्या विहिरीवरील पाणीपुरवठा बंदच करू दिला नाही. परिणामी १ जुलै २०१७ पासून ३१ डिसेंबर २०१७ पर्यत याच विहिरीवरून परजनाला पाणीपुरवठा झाला. त्यामुळे शेतात कोणत्याच पिकाचे ओलित करता आले नाही. या पाणीपुुरवठा मोबदल्यासाठी आता व्दारकाबाई ही विधवा शेतकरी महिला प्रशासनाचे उंबरठे झीजवीत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या विहिरीवरून अद्यापही परजना गावाला पाणीपुरवठा सुरूच आहे.पाढेन कुटुंबावर उपासमारीची वेळगावकºयांना पाणी पाजायचे असल्याने शेतातील उभ्या पिकाला पाणी देता आले नाही. त्यामुळे गेल्यावर्षी व्दारकाबाई यांना अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला. त्यातून घरगाडा चालविणे कठीण झाले. प्रशासनाने पाण्याचाही मोबदला दिला नाही. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. ग्रामस्थाांना पाणी देऊन मी कोणता गुन्हा केला, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. आता त्यांनी मूख्यमंत्री, पालकमंत्री, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासह जिल्हाधिकाºयांकडे मोबदल्याची मागणी केली आहे.