शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

विहीर अधिग्रहणाच्या पैशासाठी वृद्धेची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:27 IST

तालुक्यातील उमरठा येथील एका महिला शेतकऱ्याची विहीर नेर पंचायत समितीने मागीलवर्षी अधिग्रहीत केली. बारमाही पिकांचे ओलित सोडून त्या माऊलीने ग्रामस्थांना पाणी पुरविले. मात्र आता त्याच माऊलीला विहीर अधिग्रहणाचे पैसे मिळविण्यासाठी प्रशासनाच्या दारात भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देद्वारकाबाईची व्यथा : पिकाला तिलांजली देऊन पाजले ग्रामस्थांना पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील उमरठा येथील एका महिला शेतकऱ्याची विहीर नेर पंचायत समितीने मागीलवर्षी अधिग्रहीत केली. बारमाही पिकांचे ओलित सोडून त्या माऊलीने ग्रामस्थांना पाणी पुरविले. मात्र आता त्याच माऊलीला विहीर अधिग्रहणाचे पैसे मिळविण्यासाठी प्रशासनाच्या दारात भटकंती करावी लागत आहे.तालुक्यातील परजना-उमरठा येथे पाणीटंचाई पाचविलाच पुजलेली आहे. त्यामुळे उमरठा येथील विधवा शेतकरी महिला व्दारकाबाई नथ्थूजी पाढेन यांच्या शेतातील विहिरीवरून गावाला पाणीपुरवठा केला जातो. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. ग्रामपंचायत उमरठा, पंचायत समिती नेर व तहसीलदारांच्या संयुक्त मागणीवरून एप्रिल २०१७ मध्ये त्यांच्या शेतातील विहीर अधिग्रहीत करण्यात आली. त्यापोटी मोबदला देण्याचे ठरले. मागीलवर्षी याच विहिरीवरून परजना गावाला पाणीपुरवठा केला गेला. त्यांनी पिकाचे ओलित बाजूला सारून गावकºयांना पाणी पाजले. त्यांच्या नशीबी पाण्याच्या मोदबल्यासाठी भटकंतीची वेळ आली.व्दारकाबार्इंना एप्रिल २०१७ ते ३० जून २०१७ या उन्हाळ्यातील तीन महिन्यांचा मोबदला मिळाला. मात्र परजना गावाला कायमस्वरूपी पाणी पुरवीत असतानाही त्यांना मोबदला मिळाला नाही. यामुळे त्यांनी पाणी बंद करून पिकाला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाणी पुरवठा प्रशासनाने त्यांच्या विहिरीवरील पाणीपुरवठा बंदच करू दिला नाही. परिणामी १ जुलै २०१७ पासून ३१ डिसेंबर २०१७ पर्यत याच विहिरीवरून परजनाला पाणीपुरवठा झाला. त्यामुळे शेतात कोणत्याच पिकाचे ओलित करता आले नाही. या पाणीपुुरवठा मोबदल्यासाठी आता व्दारकाबाई ही विधवा शेतकरी महिला प्रशासनाचे उंबरठे झीजवीत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या विहिरीवरून अद्यापही परजना गावाला पाणीपुरवठा सुरूच आहे.पाढेन कुटुंबावर उपासमारीची वेळगावकºयांना पाणी पाजायचे असल्याने शेतातील उभ्या पिकाला पाणी देता आले नाही. त्यामुळे गेल्यावर्षी व्दारकाबाई यांना अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला. त्यातून घरगाडा चालविणे कठीण झाले. प्रशासनाने पाण्याचाही मोबदला दिला नाही. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. ग्रामस्थाांना पाणी देऊन मी कोणता गुन्हा केला, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. आता त्यांनी मूख्यमंत्री, पालकमंत्री, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासह जिल्हाधिकाºयांकडे मोबदल्याची मागणी केली आहे.