शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वणी शहरात पाण्यासाठी हाहाकार

By admin | Updated: June 25, 2017 00:18 IST

शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीचे पाणी आटल्यामुळे शुक्रवारी काही भागात पाणी पुरवठा झाला नाही,

पुरवठा ठप्प : नागरिकांची तारांबळ, नवरगाव धरणातून पाणी सोडण्यास विलंब लोकमत न्यूज नेटवर्क वणी : शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीचे पाणी आटल्यामुळे शुक्रवारी काही भागात पाणी पुरवठा झाला नाही, तर शनिवारी संपूर्ण शहरातीलच पाणी पुरवठा ठप्प होता. परिणामी शहरात पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. जून महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू असतानाही अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गंभीर बाब ही की, वणी नगरपालिकेने २१ जून रोजी नवरगाव धरणातील पाणी निर्गुडा नदीत सोडण्याबाबतस पाटबंधारे विभागाला पत्र दिले होते. मात्र २२ जूनला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने वणी शहरातील पाणी समस्येने उग्ररुप धारण केले. २२ जून रोजी सोडण्यात आलेले पाणी शनिवारी सायंकाळी ४ वाजता वणीतील नदीपात्रात पोहचले. रविवारी सकाळपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मागील वर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची बिकट स्थिती निर्माण झाली होती. यंदाही हवामान खात्याचे सारे अंदाज चुकवत पावसाने दडी मारली. अद्याप वणी परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी निर्गुडा नदीचे पात्र आटले आहे. गरजेनुसार, नवरगाव धरणातून पाणी मागितले जात आहे. नवरगाव धरणातही केवळ २.५६ दलघमी मिटर जलसाठा शिल्लक असल्याने नजिकच्या काळात पाऊस न आल्यास या धरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वणी शहरात शुक्रवारी सकाळी व सायंकाळी काही भागात पाणी पुरवठा झाला. काही भागात हा पुरवठा अल्प होता. मात्र शनिवारी सकाळी नळाद्वारे पाणीच आले नाही आणि घरातील पाणीसाठाही संपुष्टात आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक नागरिकांनी आपल्या परिसरातील नगरसेवकांना पकडून याबाबत जाब विचारला. लोकांचे समाधान करता करता नगरसेवकांच्या तोंडाला चांगलाच फेस आला. २४ जून रोजी रोहीणी नक्षत्राला प्रारंभ झाला. त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने अल्पसा दिलासा दिला. आजवर केवळ १०८ मि.मी.पाऊस कोसळला. या पावसाने मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणात केवळ एक से.मी. पाण्याची पातळी वाढली. मृग नक्षत्रात मात्र फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे स्थिती अधिक बिकट झाली आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पिभवन वेगाने होत असून त्यामुळे जलस्तरात घट होत आहे. वणी नगरपरिषदेने आतापर्यंत नवरगाव धरणातून चार हजार दलघमी पाणी घेतले आहे. आता मोजकेच आरक्षित पाणी शिल्लक आहे. संकटांची मालिका मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात वणी परिसरात अवकाळी वादळी पावसाने थैैमान घातले. तेव्हापासून वणीच्या जलशुद्धीकरण केंद्रात संकटांची मालिकाच सुरू झाली आहे. कधी वीज पुरवठा खंडित तर कधी नदीपात्रात पाणीच नाही, अशी स्थिती अनेकदा उद्भवत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.