शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

वणी शहरात पाण्यासाठी हाहाकार

By admin | Updated: June 25, 2017 00:18 IST

शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीचे पाणी आटल्यामुळे शुक्रवारी काही भागात पाणी पुरवठा झाला नाही,

पुरवठा ठप्प : नागरिकांची तारांबळ, नवरगाव धरणातून पाणी सोडण्यास विलंब लोकमत न्यूज नेटवर्क वणी : शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीचे पाणी आटल्यामुळे शुक्रवारी काही भागात पाणी पुरवठा झाला नाही, तर शनिवारी संपूर्ण शहरातीलच पाणी पुरवठा ठप्प होता. परिणामी शहरात पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. जून महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू असतानाही अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गंभीर बाब ही की, वणी नगरपालिकेने २१ जून रोजी नवरगाव धरणातील पाणी निर्गुडा नदीत सोडण्याबाबतस पाटबंधारे विभागाला पत्र दिले होते. मात्र २२ जूनला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने वणी शहरातील पाणी समस्येने उग्ररुप धारण केले. २२ जून रोजी सोडण्यात आलेले पाणी शनिवारी सायंकाळी ४ वाजता वणीतील नदीपात्रात पोहचले. रविवारी सकाळपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मागील वर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची बिकट स्थिती निर्माण झाली होती. यंदाही हवामान खात्याचे सारे अंदाज चुकवत पावसाने दडी मारली. अद्याप वणी परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी निर्गुडा नदीचे पात्र आटले आहे. गरजेनुसार, नवरगाव धरणातून पाणी मागितले जात आहे. नवरगाव धरणातही केवळ २.५६ दलघमी मिटर जलसाठा शिल्लक असल्याने नजिकच्या काळात पाऊस न आल्यास या धरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वणी शहरात शुक्रवारी सकाळी व सायंकाळी काही भागात पाणी पुरवठा झाला. काही भागात हा पुरवठा अल्प होता. मात्र शनिवारी सकाळी नळाद्वारे पाणीच आले नाही आणि घरातील पाणीसाठाही संपुष्टात आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक नागरिकांनी आपल्या परिसरातील नगरसेवकांना पकडून याबाबत जाब विचारला. लोकांचे समाधान करता करता नगरसेवकांच्या तोंडाला चांगलाच फेस आला. २४ जून रोजी रोहीणी नक्षत्राला प्रारंभ झाला. त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने अल्पसा दिलासा दिला. आजवर केवळ १०८ मि.मी.पाऊस कोसळला. या पावसाने मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणात केवळ एक से.मी. पाण्याची पातळी वाढली. मृग नक्षत्रात मात्र फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे स्थिती अधिक बिकट झाली आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पिभवन वेगाने होत असून त्यामुळे जलस्तरात घट होत आहे. वणी नगरपरिषदेने आतापर्यंत नवरगाव धरणातून चार हजार दलघमी पाणी घेतले आहे. आता मोजकेच आरक्षित पाणी शिल्लक आहे. संकटांची मालिका मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात वणी परिसरात अवकाळी वादळी पावसाने थैैमान घातले. तेव्हापासून वणीच्या जलशुद्धीकरण केंद्रात संकटांची मालिकाच सुरू झाली आहे. कधी वीज पुरवठा खंडित तर कधी नदीपात्रात पाणीच नाही, अशी स्थिती अनेकदा उद्भवत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.