शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

तलाठी साजे इमारतीविना

By admin | Updated: September 15, 2014 00:25 IST

स्वातंत्रपूर्ण काळापासून महसुलाचा एक महत्वाचा विभाग असलेले तलाठी साजे व मंडळ कार्यालये कार्यरत आहे़ शेती व प्लॉटचे महत्वाचे दस्तऐवज या कार्यालयात जतन करून असतात.

मारेगाव : स्वातंत्रपूर्ण काळापासून महसुलाचा एक महत्वाचा विभाग असलेले तलाठी साजे व मंडळ कार्यालये कार्यरत आहे़ शेती व प्लॉटचे महत्वाचे दस्तऐवज या कार्यालयात जतन करून असतात. मात्र तालुक्यातील बहुतांश तलाठी साजे व मंडळ कार्यालयांना स्वत:च्या मालकीची सुरक्षित वास्तूच नसल्याने महत्वाचे दस्तऐवज वाऱ्यावर आहे़ या गंभीर प्रकाराकडे शासनानेही कधी लक्ष दिले नाही़ग्रामपंचायत अस्तित्वात येण्यापूर्वीपासून देशात तलाठी साजे अस्तित्वात आहे़ तलाठी साजावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडळ कार्यालये असतात. तालुक्यातील १०९ गावांसाठी तलाठ्यांचे ३१ साजे आहेत. या ३१ साजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यात कुंभा, बोटोणी, मार्डी, मारेगाव व वनोजादेवी असे एकूण पाच मंडळ कार्यालये प्रशासनाने निर्माण केले आहे़ परंतु यातील तीन तलाठी साजे सोडून २८ साजे व पाच मंडळ कार्यालयांना अद्याप स्वत:च्या मालकीची इमारतच नाही़महसूल यंत्रणेतील तलाठी हा शेवटचा घटक आहे़ गावपातळीवर शेती संदर्भातील दप्तर सांभाळण्यासह इतरही अनेक महत्वाची कामे तलाठी साजातून होतात. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे पद अस्तित्वात आहे़ तरीही तलाठी साजांना अद्याप स्वत:ची हक्काची वास्तू मिळाली नाही़ इतरांना जागा उपलब्ध करून देणारे तलाठी साजेच स्वत: मात्र जागेअभावी उपेक्षित आहेत. तलाठी कार्यालये बांधावे, यासाठी कुणी आवाज उठविला, असेही आजपर्यंत कधी घडले नाही़ त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे शासनानेही कधी लक्षच दिले नाही़ या बाबीसंबंधात तहसील प्रशासनाकडून अधिक माहिती जाणून घेतली असता, अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. त्यात केवळ तालुक्यातील सगनापूर, मारेगाव, जळका या तीन गावातील साजांना स्वत:च्या मालकीच्या इमारती असल्याची माहिती मिळाली़ त्यातही जळका येथील इमारत जीर्ण झाल्याने ती नादुरूस्त आहे़ तालुक्याचे ठिकाण असलेल्या मारेगाव साजाची इमारत जुन्या काळातील चावडी आहे़ पाचपैकी एकही मंडळ कार्यालय स्वत:च्या मालकीच्या इमारतीत नाही़ नवरगाव, कोलगाव, करणवाडी, नरसाळा, कुंभा, चिंचाळा या सहा साजांनी भाड्याच्या वास्तू कार्यालयासाठी घेऊन भाडे काढल्याची नोंद आहे़ उर्वरित साजे व मंडळ कार्यालये यांचे महत्त्वाचे दस्तऐवज एक तर गावात कुणाच्या घरी ठेवलेले असते, किंवा बहूतांश महत्वाचे दस्तऐवज तलाठी व मंडळ अधिकारी घेऊन जातात, अशी माहिती नागरिकांकडून मिळाली़ शासनाचे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज हस्तांतरित होत असताना, या गंभीर प्रकाराकडे कुणीच लक्ष देत नाही़ बऱ्याच तलाठ्यांनी आपल्या घरीच साजा कार्यालये थाटली आहे़ या दस्तऐवजाकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने बरेचदा तलाठी फेरफार नोंद, वारस चढविणे, वारस कमी करणे, शेतीचे क्षेत्रफळ ठरविणे, गट सर्वे नंबर बनविणे आदी कामांसाठी मोठा मोबदला मागतात, अशी शेतकऱ्यांकडून नेहमी ओरड होते. जवळ-जवळ सर्व तलाठी व मंडळ अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याबाहेर राहतात, ही सुद्धा वस्तुस्थिती सर्वत्र दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)