शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

जनधनच्या विड्रॉल मर्यादेने घरकूल अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

जनधन खात्यातून महिन्याकाठी केवळ दहा हजार रुपये काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अनेक नागरिकांचे खाते जनधनशी जोडले गेले आहे. घरकुलाचा लाभ मिळालेल्या नागरिकांची रक्कमही याच खात्यात टाकली जात आहे. बांधकामाचा काही भाग उभा झाल्यानंतर पहिला आणि दुसरा हप्ता बँकेत जमा होतो. घरकुलाचे आठवडाभरही काम झाल्यास दहा हजारांपेक्षा अधिक खर्च येतो.

ठळक मुद्देदहा हजारांवर ब्रेक, साहित्य खरेदीचा प्रश्न, मजुरी तोडण्याची समस्या, आठवड्याचा खर्चच अधिक

निश्चल गौर ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरखर्डा : बँकांतील बचत खाते जनधनला जोडले असल्याने रक्कम काढण्याला मर्यादा आली आहे. प्रामुख्याने घरकुलाच्या लाभार्थ्यांपुढे मोठा कठीण प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम पूर्ण करायचे कसे, याची चिंता त्यांना सतावत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पुरेशा पैशांअभावी घरकूल अपूर्ण राहिल्यास अनेक लोकांना इतर ठिकाणी आसरा घेण्याची वेळ आली आहे.जनधन खात्यातून महिन्याकाठी केवळ दहा हजार रुपये काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अनेक नागरिकांचे खाते जनधनशी जोडले गेले आहे. घरकुलाचा लाभ मिळालेल्या नागरिकांची रक्कमही याच खात्यात टाकली जात आहे. बांधकामाचा काही भाग उभा झाल्यानंतर पहिला आणि दुसरा हप्ता बँकेत जमा होतो. घरकुलाचे आठवडाभरही काम झाल्यास दहा हजारांपेक्षा अधिक खर्च येतो. विविध प्रकारची साहित्य खरेदी, मजुरी द्यावी लागते. पण खात्यातून एवढी रक्कम एकाचवेळी काढता येत नाही.घराचे बांधकाम करण्यासाठी अनेकांनी जुनी घरे उकलून ठेवलेली आहे. पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण न झाल्यास निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. घरकूल लाभार्थ्यांची किरायाने राहण्याची ऐपत नाही. अशावेळी जनधन खात्यातून आवश्यक तेवढी रक्कम काढण्याची मुभा मिळणे हाच एक चांगला उपाय असल्याचे सांगितले जाते.दारिद्र्यरेषेखालील आणि बेघर कुटुंबांना लाभग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील, बेघर आणि कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुलाचा लाभ दिला जातो. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यासाठी लाभार्थी निवडले जातात. यासाठी अनेक प्रकारच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच घरकुलाचा लाभ मिळतो. यासाठी बराच कालावधी लोटला जातो. काही कुटुंब कर्ज काढून घराचे बांधकाम पूर्ण करून घेतात. मात्र त्यांना लाभ विलंबाने मिळतो. काही ठिकाणी तर कित्येक वर्ष लोटली जातात. यात त्यांच्यावर घराच्या बांधकामासाठी काढलेल्या कर्जाच्या बोझ्यावरील व्याजाचा भुर्दंड बसतो. चांगले घर उभे होत असल्याने त्यांचीही सर्व सहन करण्याची तयारी असते. परंतु प्रशासनाकडून काही बाबतीत होणारी अडवणूक त्रासदायक ठरते.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना