शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या काळजात धडकी

By admin | Updated: March 18, 2017 00:56 IST

सुलतानी संकटासोबतच नैैसर्गीक आपत्तीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजात वादळी पावसामुळे पुन्हा एकदा धडकी भरली आहे.

अनेक घरांची झाली पडझड : गहू, हरभरा झाला आडवा, महसूल विभागाने सर्व्हे करण्याची मागणी वणी : सुलतानी संकटासोबतच नैैसर्गीक आपत्तीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजात वादळी पावसामुळे पुन्हा एकदा धडकी भरली आहे. गुरूवारी सायंकाळी वणी उपविभागात झालेल्या अवकाळी वादळी पावसाने बळीराजा पुुन्हा एकदा कोलमडून पडला आहे. या वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली, तर काही घरांची छपरे उडून गेली. वादळाने ज्यांची घरे उध्वस्त केली. त्या आपतग्रस्तांना शासकीय योजनेतून घरकुल द्यावे, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. गुरूवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक वादळी पावसाला सुरूवात झाली. उपविभागातील वणीसह मारेगाव, झरी या तालुक्यांमध्ये वादळाने अक्षरश: तांडव घातले. झरी, मारेगाव तालुक्यातील काही भागात गारपीटही झाली. यामुळे गहू आणि हरभरा या पिकाला चांगलाच फटका बसला. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात तुरीची कापणी करून त्याचे शेतातच ढिगारे उभे केले होते. काहींच्या शेतात चना ठेवून होता. मात्र वादळी पावसाने हे पीक नेस्तनाबूत झाले. वणी तालुक्यात ६५०० हजार हेक्टरवर चना पिकांची लावगड करण्यात आली असून तीन हजार १०० हेक्टरवर गव्हाचा पेरा करण्यात आला आहे. गुरूवारी सायंकाळी जवळपास एक तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. वणी तालुक्यातील शिंदोला, कुर्ली यासह अनेक गावातील घरांचे नुकसान झाले. कुर्ली येथील सहदेव ढेंगळे यांच्या घरावर झाड कोसळल्याने स्लॅबला तडे गेले. तर गावातील अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेल्यामुळे गावकऱ्यांना रात्रभर जागरण करावे लागले. तालुक्यातील कळमना येथील अनेक घरांच्या भिंती कोसळल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांबदेखिल वाकेले. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. परिणामी नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्यात यावे व ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, त्यांना पंतप्रधान योजनेतून घरकुल देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य संजय निखाडे यांनी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी) मारेगाव तालुक्यात मिरची, संत्र्याचे नुकसान तालुक्यातील कुंभा परिसरात यावर्षी शेतकऱ्यांनी मिरची व संत्र्याचे उत्पादन घेतले आहे. मात्र गुरूवारी झालेल्या अकाली पावसामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात गारपीट झाल्यामुळे मिरच्या खाली गळाल्या आहे. परिणामी मिरच्याची पत खालावली असून काही मिरच्या सडलेल्या अवस्थेतसुद्धा असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान तालुक्यात वादळी पावसासह झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टर जमिनीतील रब्बी पिकाचे नुकसान झाले. गहु, हरबरा या पिकाला अक्षरश: झोडपून काढले. सर्वाधिक नुकसान बोथ, बहात्तर, भाडउमरी, कोपामांडवी, वाऱ्हा, कवठा, पाटणबोरी, पिंपरीबोरी या गावांना बसला. हाती आलेली पिके निसर्गाने हिरावून नेल्यामुळे त्याच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. उसनवारी करुन, कर्ज काढून रब्बी पिकाची पेरणी केल्यानंतर त्याची जोपासना पोटच्या पोरासारखी केली. परंतु हाती आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. झरी तालुक्यात दमदार गारपीट तालुक्यातील मुळगव्हाण शिवारात गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच मांगली येथील श्रीनिवास चामाटे यांच्या शेतातील केळी व शेवगा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील टाकळी, पाटण, माथार्जुन, हिरापूर, मांगली, लहान पांढरकवडा, राजूर या भागातील कापूस खाली पडून मातीत मिसळला आहे. त्याचबरोबर सायंकाळी तालुक्यातील विद्युत पुरवठासुद्धा खंडित झाला होता. गावात नळ न आल्यामुळे पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला होता.