शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या काळजात धडकी

By admin | Updated: March 18, 2017 00:56 IST

सुलतानी संकटासोबतच नैैसर्गीक आपत्तीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजात वादळी पावसामुळे पुन्हा एकदा धडकी भरली आहे.

अनेक घरांची झाली पडझड : गहू, हरभरा झाला आडवा, महसूल विभागाने सर्व्हे करण्याची मागणी वणी : सुलतानी संकटासोबतच नैैसर्गीक आपत्तीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजात वादळी पावसामुळे पुन्हा एकदा धडकी भरली आहे. गुरूवारी सायंकाळी वणी उपविभागात झालेल्या अवकाळी वादळी पावसाने बळीराजा पुुन्हा एकदा कोलमडून पडला आहे. या वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली, तर काही घरांची छपरे उडून गेली. वादळाने ज्यांची घरे उध्वस्त केली. त्या आपतग्रस्तांना शासकीय योजनेतून घरकुल द्यावे, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. गुरूवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक वादळी पावसाला सुरूवात झाली. उपविभागातील वणीसह मारेगाव, झरी या तालुक्यांमध्ये वादळाने अक्षरश: तांडव घातले. झरी, मारेगाव तालुक्यातील काही भागात गारपीटही झाली. यामुळे गहू आणि हरभरा या पिकाला चांगलाच फटका बसला. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात तुरीची कापणी करून त्याचे शेतातच ढिगारे उभे केले होते. काहींच्या शेतात चना ठेवून होता. मात्र वादळी पावसाने हे पीक नेस्तनाबूत झाले. वणी तालुक्यात ६५०० हजार हेक्टरवर चना पिकांची लावगड करण्यात आली असून तीन हजार १०० हेक्टरवर गव्हाचा पेरा करण्यात आला आहे. गुरूवारी सायंकाळी जवळपास एक तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. वणी तालुक्यातील शिंदोला, कुर्ली यासह अनेक गावातील घरांचे नुकसान झाले. कुर्ली येथील सहदेव ढेंगळे यांच्या घरावर झाड कोसळल्याने स्लॅबला तडे गेले. तर गावातील अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेल्यामुळे गावकऱ्यांना रात्रभर जागरण करावे लागले. तालुक्यातील कळमना येथील अनेक घरांच्या भिंती कोसळल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांबदेखिल वाकेले. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. परिणामी नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्यात यावे व ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, त्यांना पंतप्रधान योजनेतून घरकुल देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य संजय निखाडे यांनी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी) मारेगाव तालुक्यात मिरची, संत्र्याचे नुकसान तालुक्यातील कुंभा परिसरात यावर्षी शेतकऱ्यांनी मिरची व संत्र्याचे उत्पादन घेतले आहे. मात्र गुरूवारी झालेल्या अकाली पावसामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात गारपीट झाल्यामुळे मिरच्या खाली गळाल्या आहे. परिणामी मिरच्याची पत खालावली असून काही मिरच्या सडलेल्या अवस्थेतसुद्धा असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान तालुक्यात वादळी पावसासह झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टर जमिनीतील रब्बी पिकाचे नुकसान झाले. गहु, हरबरा या पिकाला अक्षरश: झोडपून काढले. सर्वाधिक नुकसान बोथ, बहात्तर, भाडउमरी, कोपामांडवी, वाऱ्हा, कवठा, पाटणबोरी, पिंपरीबोरी या गावांना बसला. हाती आलेली पिके निसर्गाने हिरावून नेल्यामुळे त्याच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. उसनवारी करुन, कर्ज काढून रब्बी पिकाची पेरणी केल्यानंतर त्याची जोपासना पोटच्या पोरासारखी केली. परंतु हाती आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. झरी तालुक्यात दमदार गारपीट तालुक्यातील मुळगव्हाण शिवारात गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच मांगली येथील श्रीनिवास चामाटे यांच्या शेतातील केळी व शेवगा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील टाकळी, पाटण, माथार्जुन, हिरापूर, मांगली, लहान पांढरकवडा, राजूर या भागातील कापूस खाली पडून मातीत मिसळला आहे. त्याचबरोबर सायंकाळी तालुक्यातील विद्युत पुरवठासुद्धा खंडित झाला होता. गावात नळ न आल्यामुळे पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला होता.