शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या काळजात धडकी

By admin | Updated: March 18, 2017 00:56 IST

सुलतानी संकटासोबतच नैैसर्गीक आपत्तीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजात वादळी पावसामुळे पुन्हा एकदा धडकी भरली आहे.

अनेक घरांची झाली पडझड : गहू, हरभरा झाला आडवा, महसूल विभागाने सर्व्हे करण्याची मागणी वणी : सुलतानी संकटासोबतच नैैसर्गीक आपत्तीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजात वादळी पावसामुळे पुन्हा एकदा धडकी भरली आहे. गुरूवारी सायंकाळी वणी उपविभागात झालेल्या अवकाळी वादळी पावसाने बळीराजा पुुन्हा एकदा कोलमडून पडला आहे. या वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली, तर काही घरांची छपरे उडून गेली. वादळाने ज्यांची घरे उध्वस्त केली. त्या आपतग्रस्तांना शासकीय योजनेतून घरकुल द्यावे, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. गुरूवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक वादळी पावसाला सुरूवात झाली. उपविभागातील वणीसह मारेगाव, झरी या तालुक्यांमध्ये वादळाने अक्षरश: तांडव घातले. झरी, मारेगाव तालुक्यातील काही भागात गारपीटही झाली. यामुळे गहू आणि हरभरा या पिकाला चांगलाच फटका बसला. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात तुरीची कापणी करून त्याचे शेतातच ढिगारे उभे केले होते. काहींच्या शेतात चना ठेवून होता. मात्र वादळी पावसाने हे पीक नेस्तनाबूत झाले. वणी तालुक्यात ६५०० हजार हेक्टरवर चना पिकांची लावगड करण्यात आली असून तीन हजार १०० हेक्टरवर गव्हाचा पेरा करण्यात आला आहे. गुरूवारी सायंकाळी जवळपास एक तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. वणी तालुक्यातील शिंदोला, कुर्ली यासह अनेक गावातील घरांचे नुकसान झाले. कुर्ली येथील सहदेव ढेंगळे यांच्या घरावर झाड कोसळल्याने स्लॅबला तडे गेले. तर गावातील अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेल्यामुळे गावकऱ्यांना रात्रभर जागरण करावे लागले. तालुक्यातील कळमना येथील अनेक घरांच्या भिंती कोसळल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांबदेखिल वाकेले. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. परिणामी नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्यात यावे व ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, त्यांना पंतप्रधान योजनेतून घरकुल देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य संजय निखाडे यांनी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी) मारेगाव तालुक्यात मिरची, संत्र्याचे नुकसान तालुक्यातील कुंभा परिसरात यावर्षी शेतकऱ्यांनी मिरची व संत्र्याचे उत्पादन घेतले आहे. मात्र गुरूवारी झालेल्या अकाली पावसामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात गारपीट झाल्यामुळे मिरच्या खाली गळाल्या आहे. परिणामी मिरच्याची पत खालावली असून काही मिरच्या सडलेल्या अवस्थेतसुद्धा असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान तालुक्यात वादळी पावसासह झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टर जमिनीतील रब्बी पिकाचे नुकसान झाले. गहु, हरबरा या पिकाला अक्षरश: झोडपून काढले. सर्वाधिक नुकसान बोथ, बहात्तर, भाडउमरी, कोपामांडवी, वाऱ्हा, कवठा, पाटणबोरी, पिंपरीबोरी या गावांना बसला. हाती आलेली पिके निसर्गाने हिरावून नेल्यामुळे त्याच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. उसनवारी करुन, कर्ज काढून रब्बी पिकाची पेरणी केल्यानंतर त्याची जोपासना पोटच्या पोरासारखी केली. परंतु हाती आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. झरी तालुक्यात दमदार गारपीट तालुक्यातील मुळगव्हाण शिवारात गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच मांगली येथील श्रीनिवास चामाटे यांच्या शेतातील केळी व शेवगा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील टाकळी, पाटण, माथार्जुन, हिरापूर, मांगली, लहान पांढरकवडा, राजूर या भागातील कापूस खाली पडून मातीत मिसळला आहे. त्याचबरोबर सायंकाळी तालुक्यातील विद्युत पुरवठासुद्धा खंडित झाला होता. गावात नळ न आल्यामुळे पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला होता.