शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मोबदला मिळेपर्यंत काम होऊ देणार नाही

By admin | Updated: April 3, 2017 00:23 IST

टॉवर उभारण्याच्या कामामुळे पिकांचे आणि जमिनीचे असे दोन्ही स्तरावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

शेतकरी आक्रमक : पॉवर ग्रीड कंपनीची महागाव तालुक्यात मनमानी टॉवर उभारणी महागाव : टॉवर उभारण्याच्या कामामुळे पिकांचे आणि जमिनीचे असे दोन्ही स्तरावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला रोख स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत टॉवरच्या कामाला हात लावू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे टॉवर उभारणीच्या या मनमानी कारभाराचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. पावर ग्रीड कॉरपोरेशन आॅफ इंडिया नांदेड कंपनीच्यावतीने ७६५ केव्ही वरोरा (चंद्रपूर) ते परळी पारेषण लाईनचे काम सुरू आहे. या कामासाठी ठिकठिकाणी टावर उभारले जात आहे. परंतु टॉवरच्या उभारणीत महसूल बुडविला जात असून शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान होत आहे. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले. त्यावरून महागाव येथील तहसीलदार नामदेव इसाळकर यांनी कंपनीला २५ लाख २८ हजार रुपयांचा दंड ठोठावला. अशा प्रकारची जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे. परंतु यानंतरही कंपनीचे अधिकारी भारत सरकारचे काम असल्याचे सांगत शेतकऱ्यांना धमकावित आहे. त्यामुळे वरोरा ते परळी मार्गावरील शेतकरी संतप्त झाले आहे. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे नेतृत्व महागावचे प्रशांत गावंडे करीत आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळणार नाही तोपर्यंत कामाला हात लावू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. नेर तालुक्यातील सिंदखेड येथील माजी सरपंच परशराम राठोड, देवराव राठोड, उमेश राठोड, मीनल राठोड यांनी नेर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दोन वर्षांपासून कंपनीने मोबदला दिला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला मिळणे कठीण झाले आहे. परभणी जिल्ह्यातील आनंदवाडी येथील सुभाष नामदेव लवटे, परमेश्वर भगवान लवटे, ज्ञानदेव सदाशिव भाळे, गोविंद मसनाजी लवटे, अर्जून भाऊराव लवटे, रामेश्वर सुदाम लवटे यांनी कंपनीच्या मनमानीला विरोध करत काम थांबविले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या लढ्याला त्यांनी पाठिंबा दिला आहे. महागावमधून शेतकऱ्यांनी लढा उभारल्यानंतर येथील टॉवर उभारणीचे काम थांबविण्यात आले आहे. जेथे अर्धवट काम आहे त्या ठिकाणी टॉवरवरील फिरक्या हवेमुळे कोसळण्याची भीती आहे. यामुळे कंपनीचे अधिकारीही हैरान झाले आहे. (शहर प्रतिनिधी)