शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

केन्द्र सरकारविरुध्द यवतमाळातून बिगुल फुंकणार;  20 फेब्रुवारीला राकेश टिकैत यांची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:31 IST

केन्द्र सरकारविरुध्द बिगुल फुंकण्यासाठी यवतमाळात शेतकरी नेते राकेश टिकैत यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता स्थानिक आझाद मैदानात ही सभा होणार आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : केन्द्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधीत पारीत केलेल्या कायद्याविरोधात देशभर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. हे कायदे व्यापारी धार्जिणे  असून त्यामुळे शेतक-यांची प्रचंड लुट होणार आहे. दरम्यान हे तुघलकी कृषी कायदे परत घेण्यासाठी तसेच केन्द्र सरकारविरुध्द बिगुल फुंकण्यासाठी यवतमाळात शेतकरी नेते राकेश टिकैत यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता स्थानिक आझाद मैदानात ही सभा होणार आहे. 

या कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किंमतीचे संरक्षण संपुष्टात येण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग संभ्रमात सापडला आहे. या नविन कायद्यांच्या माध्यमातून शेतीचे व्यापारीकरण करण्यात आले आहे. करार शेतीमुळे गरीब, हतबल शेतकरी आनखी गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. केन्द्र सरकारचे कायदे येण्यापुर्वीच मोठमोठे वेअर हाऊस बांधणे सुरु झाले आहे. शेतक-यांसोबत शेतीचा करार करायचा, चांगले उत्पन्न घ्यायचे आणि शेतक-यांची मात्र कमी भावात बोळवण करायची असा गोरखधंदा सुरु होणार आहे. व्यापारी हे व्यापार करण्यात हुशार असतात त्यामुळे त्यांचेकडून शेतक-यांबद्दल आत्मीयतेची भावना जागृत होण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. या व्यापारीकरणात शेतक-यांचा शेतीव्यवसाय संपुष्टात येईल.

हक्काचे व्यासपीठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या सुध्दा संपुष्टात येतील. त्यामुळे व्यापा-यांची एकाधिकारशाही सुरु होईल अशी भिती सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान केन्द्र सरकारने हे काळे कायदे परत घ्यावे यासाठी दिल्ली येथे गेल्या दोन महिण्यापासून शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. आता हे आंदोलन देशभरात सुरु करण्यासाठी रणनिती आखण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने यवतमाळ येथे आझाद मैदानात दिनांक 20 फेब्रुवारीला शेतकरी नेते राकेश टिकैत यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी बुधवारी जिल्हयातील शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली.  यवतमाळातून आंदोलनाला सुरुवात

केन्द्र सरकारने पारीत केलेल्या काळया कृषी कायद्याविरोधात दिल्ली सिमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. आता हेच आंदोलन देशभर पेटविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या आंदोलनाची सुरुवात यवतमाळातून होत आहे. यवतमाळात सभा व्हावी यासाठी राकेश टिकैत यांनी होकार दिला असून जिल्हाभरातील शेतकरी तसेच नागरीकांनी या सभेला उपस्थित राहणे गरजेचे आहे.  

सिकंदर शहाअध्यक्ष, शेतकरी वारकरी संघटना

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैत