शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार्‍यांचा मुक्काम गावाला दिशा देईल काय ?

By admin | Updated: June 2, 2014 01:51 IST

राज्याचे मुख्य सचिव ज.स. सहारिया यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी ..

राज्याचे मुख्य सचिव ज.स. सहारिया यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना महिन्याच्या दुसर्‍या शुक्रवारी गावात मुक्काम करण्याचे आदेश काढले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी तर सिंगलदीप या गावात जाऊन मुक्कामही ठोकला. जिल्ह्यात पहिल्यांदाच एखादा अधिकारी गावांत मुक्काम करताना गावकर्‍यांनी पाहिला तेव्हा त्यांना नवल वाटणे साहजिकच आहे. मात्र अधिकार्‍यांचा मुक्काम गावाला दिशा देईल काय असा प्रश्न गावकर्‍यांना भेडसावत आहे.

सध्या ग्रामीण भागात विविध समस्यांनी घर केले आहे. या भागातील लोकप्रतिनिधींना विकासाची दिशा अजूनही गवसलेली नाही. ग्रामपंचायतींना एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निधी येऊनही विकासाच्या नावाने मात्र बोंबाबोंब आहे. जी काही कामे गावपातळीवर होत आहेत, त्या कामांचा दर्जा अगदीच सुमार आहे. प्रत्येक गावात पाणीटंचाईने पेट घेतलेला असतो. आरोग्य सेवाही आजारी आहे. नियोजन शून्यतेमुळे खेडी बकाल झाली आहेत. महात्मा गांधी सांगत होते ‘खेड्याकडे चला’. लोकं शहरात आलीत. आता अधिकारी खेड्यात येणार आहेत. सरकारी पाहुणे म्हणून नव्हे तर आम्ही लोकाभिमुख आहोत हे सांगण्यासाठी ही धडपड आहे.

मोठा अधिकारी म्हटला की एक अनाहूत भीती ग्रामीणांच्या मनात असते. तालुका पातळीवरच्या अधिकार्‍यांना भेटायचे म्हटले की त्यांना त्या साहेबांची ‘भेटण्याची वेळ’ यासह कार्यालयातील चपराश्याच्या अरेरावीचा सामना करावा लागतो. परिणामी तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर दलालांचा एक वर्ग तयार झाला आहे. हा वर्ग या लोकांचे आर्थिक शोषण करीत आला आहे. अधिकारी हा सामान्य माणसांसाठी नसतोच हा समज यामुळे पक्का झाला आहे. या निर्णयामुळे आम्हीसुध्दा तुमच्यासारखेच सामान्य माणसे आहोत हे सिध्द करण्याचा हा प्रयत्न असावा. या निमित्ताने आमच्या मनातील ब्रिटीशकालीन साहेबी मानसिकतेला छेद देता येवू शकते. सामान्य माणूस आणि अधिकारी यांच्यामध्ये फक्त आर्थिक विषमता तेवढाच फरक असतो. सामान्य माणसाला श्रम केल्याशिवाय त्याच्या पोटात घास ढकलता येत नाही आणि अधिकार्‍यांच्या पोटात घास ढकलण्याची जबाबदारी मायबाप सरकारची असते.

गावखेड्यातील प्रश्नांना या निमित्ताने गती देता येईल. कलेक्टरसारखा अधिकारी त्या गावांत येणार म्हटले की त्याचा परिणाम आजूबाजूच्या गावांवर होणार आहे. लोकशाहीतील लेटलतीफशाहीला निश्‍चितच आळा बसेल. ग्रामीण भागातील प्रश्नांची खरी जाण ही त्या गावातील नागरिकांना असते. त्यामुळे प्रश्नांच्या मुळाशी जाणे सोपे होणार आहे. यातूनच एखाद्या नव्या प्रयोगाचा जन्म होईल जो ग्रामीण विकासाला दिशादर्शक ठरू शकेल. ग्रामीण अंतर्गत राजकारण अत्यंत घाणेरडे असते. अनेकदा व्यक्तीगत स्वार्थातून तक्रारी केल्या जातात. या निमित्ताने त्याची शहानिशा होणार आहे. ज्या समस्या कार्यालयापर्यंत पाहोचत नाही त्या समस्या मोठय़ा अधिकार्‍याच्या कानावर पडतील. गतीमान शासन आणि प्रशासन काय असते हे दाखविण्याचा हा प्रयत्न चांगला आहेच. मात्र हा प्रयत्न केवळ आदेशाचे पालन म्हणून नव्हे तर मनापासून क रता आला पाहिजे. तालुकास्तरावरील अधिकार्‍यांनी आता अप-डाऊन करण्यापेक्षा आठवड्यातून एकदा तरी खेड्यात आपला मुक्काम ठोकला पाहिजे. हे राज्य आणि या राज्यातील अधिकारी आपले आहे हे शिवकालातील आदर्श प्रशासन या निमित्ताने प्रजेला अनुभवता येईल. याची चांगली सुरूवात डॉ. कलशेट्टी यांनी केली, त्याचा शेवटही चांगला व्हावा असे लोकांना वाटत आहे.