शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
3
२७७ प्रवासांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
4
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
5
फडणवीस, शिंदे, पवार, यांची पुस्तके कधी येणार?
6
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
7
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
8
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
9
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
10
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
11
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
12
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
13
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
14
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
15
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
16
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
17
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
18
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
19
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
20
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?

अभयारण्यातील प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: April 14, 2016 02:09 IST

बंदी भागातील अभयारण्यातील पाण्याचे स्रोत सध्या आटल्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

वनविभागाचे दुर्लक्ष : जंगलातील पानवठे कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांची गावांकडे धावमहागाव : बंदी भागातील अभयारण्यातील पाण्याचे स्रोत सध्या आटल्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. वन विभागाकडूनसुद्धा या बाबत ठोस उपाययोजना झालेल्या नसल्याने प्राण्यांवर भटकंतीची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षात अभयारण्यातील लाकूड चोरीमुळे घनदाट जंगले आता विरळ झाली आहे. आरक्षित जंगल नावालाच आहे. वन विभागाकडून वन्यप्राण्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा कागदावरच आहे. त्यामुळे वन्यप्राणी जंगलाशेजारील गावांकडे कुच करीत आहे. जंगल भागातील नागरिकांनी वृक्षतोड करू नये म्हणून त्यांना जळावू लाकूड वाहून नेण्यावर बंदी घातली असतानाही लाकूड चोरी होत आहे. या परिसरातील नागरिकांना सिलिंडर व गॅस पुरविण्यात आले आहे. परंतु वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने त्यांना आजही चुलीशिवाय पर्याय नाही. जंगलात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले पानवठे कोरडे पडले आहे. त्यामुळे हे पानवठे व त्यावर झालेला खर्च या बाबतच्या चौकशीची मागणी होत आहे. पाण्यासाठी दाहीदिशा वन्यप्राण्यांना फिरावे लागत आहे. वानराचा कळप पाण्याच्या शोधात गावात शिरत आहे. काही जंगल भागात पाणी न मिळाल्यामुळे वानरांचा मृत्यू झाल्याचीही घटना घडल्या आहेत. वरिष्ठांनी वन्यप्राण्यांच्या या भटकंतीकडे लक्ष देऊन पानवठ्यामध्ये पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)