शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

अभयारण्यात वणव्यामुळे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 21:50 IST

टिपेश्वर अभयारण्यात आगी लागण्याच्या घटनेत वाढ होत असून या आगी लागतात की लावल्या जातात, याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देटिपेश्वरमध्ये आगीचे प्रमाण वाढले : उच्चस्तरीय चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : टिपेश्वर अभयारण्यात आगी लागण्याच्या घटनेत वाढ होत असून या आगी लागतात की लावल्या जातात, याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.गेल्या आठवड्यातसुद्धा टिपेश्वर अभयारण्यातील गणेरी बिटमध्ये आग लागली होती. आगीची माहिती बाहेर येऊ नये, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. २५ मार्च रोजी गणेरी बिट परिसरात आग लागून गणेरी बिट व भिमकुंडमधील मौल्यवान वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. जवळपास ९०० ते हजार हेक्टरमधील वनसंपदा जळाल्याची माहिती आहे. ही आग कशामुळे लागली, याबाबत सर्वच अनभिज्ञ आहेत. या अभयारण्याला नेहमीच लहान-मोठ्या आगी लागत असून लाखो रूपयांची मौल्यवान वनसंपदा व प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. अभयारण्यात आगीच्या घटना घडत असल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाच वर्षांपूर्वी २०१३ मध्ये पिटापुंगरी परिसरात आग लागल्याने तीन निष्पाप मजुरांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला होता. तेव्हापासून सतत आगीची लहान-मोठी घटना घडत आहे. पिटापुंगरी परिसरात लागलेल्या आगीची अद्यापही चौकशी झाली नाही. ही आग कशामुळे लागली, याचा तपास पेंच प्रकल्पाच्या अधिकाºयांकडून अद्यापही होऊ शकला नाही. त्यानंतर तीन वर्षानंतर टिपेश्वर अभयारण्याला पुन्हा मोठी आग लागली. यावेळी जवळपास १३०० ते १४०० हेक्टरमधील मौल्यवान वनसंपदा व अनेक प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. याप्रकरणात वनपरीक्षेत्राधिकारी लांबाडे यांना या निलंबित करण्यात आले होते. २५ मार्च रोजी लागलेल्या आगीतसुद्धा वनसंपदेचे नुकसान झाले आहे.