शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

उपविभागात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: August 11, 2016 01:08 IST

वणी, मारेगाव व झरी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

हिरव्याकंच पिकांची नासाडी : उत्पन्नात घट होण्याची शक्यता वणी : वणी, मारेगाव व झरी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. हे वन्यप्राणी हिरव्याकंच पिकांची नासाडी करीत आहे. परिणामी यावर्षी उत्पन्नात घट होण्याची असून शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी वणी तालुक्यात तब्बल ४४ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची वन्यप्राण्यांनी नासाडी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला. याबाबत शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर वनविभागाने संबंधित शेतात जाऊन पंचनामा केला व सर्व शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले होते. या ४४ शेतकऱ्यांना तीन महिन्यानंतर मदत देण्यात आली. यावर्षी जवळपास सहा शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी केली असून तीन शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तर उर्वरित तीन शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. वणी, झरी व मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. त्यामुळे या जंगलात रोहि, रानडुकर, निलगायी व इतर वन्यप्राण्यांचा वावर असतो. हे वन्यप्राणी जंगलालगत असलेल्या शेतात जावून पिकांची नासाडी करीत आहे. शेतात सध्या कापूस, तूर, ज्वारी, सोयाबीन व इतर पिके घेण्यात आली आहेत. अगोदरच एक महिना पाऊस उशिरा आल्याने पिकांची उगवण संथगतीने झाली. शेतकऱ्यांनी कशीबशी पिके जगविली. मात्र आता वन्यप्राण्यांच्या नव्या संकटाशी शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी त्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. तालुक्यातील शेतात सध्या हिरवीकंच पिके डोलायला लागली आहेत. परंतु रोहि, रानडुकरांचे कळप शेतात घुसून कोवळ्या पिकांची नासाडी करीत आहे. रात्रीच्यावेळी शेतात सहसा कुणी जात नसल्याने हे वन्यप्राणी रात्रभरातून पिके उद्ध्वस्त करीत आहेत. याबाबत त्रस्त शेतकऱ्यांनी अनेकदा वनविभागाकडे तक्रारसुद्धा केली होती. मात्र या तक्रारीची दखलच घेण्यात येत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. वनाधिकारी या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करू, असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची बोळवण करतात. मात्र प्रत्यक्षात या वन्यप्राण्यांचा बंदोबस्तच होत नाही. त्याचबरोबर यावर्षी अनेक शेतकऱ्यांवर रानडुकराने हल्ला चढवून गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रानडुकरांची धास्ती पसरली आहे. उपविभागातील जंगलात चराईसाठी असलेल्या ई-वर्ग जमिनीवर अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. त्यामुळे दिवसेंदिवस वनसंपदा नष्ट होऊन जंगल विरळ होत चालले आहे. त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी आता गावाजवळ असलेल्या शेताकडे धाव घेऊन पिकांची नासधूस करीत आहे. वन्यप्राणी शेतात किंवा गावात घुसले आणि त्यांनी हैदोस घातला व एखाद्या शेतकऱ्याने त्याचा बंदोबस्त केला, तर उलट शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. परंतु वन्यप्राणी शेतात घुसून हिरव्याकंच पिकांची नासाडी करतात, ही एक शोकांतिका आहे. काही वन्यप्राणी तर शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिकांची नासाडी करतात. या वन्यप्राण्यांना शेतकऱ्यांनी हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास, वन्यप्राणी त्यांच्यावर हल्ला करण्याची भितीसुद्धा असते. त्यामुळे शेतातून वन्यप्राण्यांना कसे बाहेर काढावे, असाही प्रश्न त्यांना पडतो. एकंदरीत वन्यप्राण्यांच्या धुमाकूळाने शेतकरी त्रस्त झाला असून वन विभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)