शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

उपविभागात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: August 11, 2016 01:08 IST

वणी, मारेगाव व झरी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

हिरव्याकंच पिकांची नासाडी : उत्पन्नात घट होण्याची शक्यता वणी : वणी, मारेगाव व झरी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. हे वन्यप्राणी हिरव्याकंच पिकांची नासाडी करीत आहे. परिणामी यावर्षी उत्पन्नात घट होण्याची असून शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी वणी तालुक्यात तब्बल ४४ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची वन्यप्राण्यांनी नासाडी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला. याबाबत शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर वनविभागाने संबंधित शेतात जाऊन पंचनामा केला व सर्व शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले होते. या ४४ शेतकऱ्यांना तीन महिन्यानंतर मदत देण्यात आली. यावर्षी जवळपास सहा शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी केली असून तीन शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तर उर्वरित तीन शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. वणी, झरी व मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. त्यामुळे या जंगलात रोहि, रानडुकर, निलगायी व इतर वन्यप्राण्यांचा वावर असतो. हे वन्यप्राणी जंगलालगत असलेल्या शेतात जावून पिकांची नासाडी करीत आहे. शेतात सध्या कापूस, तूर, ज्वारी, सोयाबीन व इतर पिके घेण्यात आली आहेत. अगोदरच एक महिना पाऊस उशिरा आल्याने पिकांची उगवण संथगतीने झाली. शेतकऱ्यांनी कशीबशी पिके जगविली. मात्र आता वन्यप्राण्यांच्या नव्या संकटाशी शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी त्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. तालुक्यातील शेतात सध्या हिरवीकंच पिके डोलायला लागली आहेत. परंतु रोहि, रानडुकरांचे कळप शेतात घुसून कोवळ्या पिकांची नासाडी करीत आहे. रात्रीच्यावेळी शेतात सहसा कुणी जात नसल्याने हे वन्यप्राणी रात्रभरातून पिके उद्ध्वस्त करीत आहेत. याबाबत त्रस्त शेतकऱ्यांनी अनेकदा वनविभागाकडे तक्रारसुद्धा केली होती. मात्र या तक्रारीची दखलच घेण्यात येत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. वनाधिकारी या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करू, असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची बोळवण करतात. मात्र प्रत्यक्षात या वन्यप्राण्यांचा बंदोबस्तच होत नाही. त्याचबरोबर यावर्षी अनेक शेतकऱ्यांवर रानडुकराने हल्ला चढवून गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रानडुकरांची धास्ती पसरली आहे. उपविभागातील जंगलात चराईसाठी असलेल्या ई-वर्ग जमिनीवर अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. त्यामुळे दिवसेंदिवस वनसंपदा नष्ट होऊन जंगल विरळ होत चालले आहे. त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी आता गावाजवळ असलेल्या शेताकडे धाव घेऊन पिकांची नासधूस करीत आहे. वन्यप्राणी शेतात किंवा गावात घुसले आणि त्यांनी हैदोस घातला व एखाद्या शेतकऱ्याने त्याचा बंदोबस्त केला, तर उलट शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. परंतु वन्यप्राणी शेतात घुसून हिरव्याकंच पिकांची नासाडी करतात, ही एक शोकांतिका आहे. काही वन्यप्राणी तर शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिकांची नासाडी करतात. या वन्यप्राण्यांना शेतकऱ्यांनी हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास, वन्यप्राणी त्यांच्यावर हल्ला करण्याची भितीसुद्धा असते. त्यामुळे शेतातून वन्यप्राण्यांना कसे बाहेर काढावे, असाही प्रश्न त्यांना पडतो. एकंदरीत वन्यप्राण्यांच्या धुमाकूळाने शेतकरी त्रस्त झाला असून वन विभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)