शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

उपविभागात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: August 11, 2016 01:08 IST

वणी, मारेगाव व झरी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

हिरव्याकंच पिकांची नासाडी : उत्पन्नात घट होण्याची शक्यता वणी : वणी, मारेगाव व झरी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. हे वन्यप्राणी हिरव्याकंच पिकांची नासाडी करीत आहे. परिणामी यावर्षी उत्पन्नात घट होण्याची असून शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी वणी तालुक्यात तब्बल ४४ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची वन्यप्राण्यांनी नासाडी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला. याबाबत शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर वनविभागाने संबंधित शेतात जाऊन पंचनामा केला व सर्व शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले होते. या ४४ शेतकऱ्यांना तीन महिन्यानंतर मदत देण्यात आली. यावर्षी जवळपास सहा शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी केली असून तीन शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तर उर्वरित तीन शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. वणी, झरी व मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. त्यामुळे या जंगलात रोहि, रानडुकर, निलगायी व इतर वन्यप्राण्यांचा वावर असतो. हे वन्यप्राणी जंगलालगत असलेल्या शेतात जावून पिकांची नासाडी करीत आहे. शेतात सध्या कापूस, तूर, ज्वारी, सोयाबीन व इतर पिके घेण्यात आली आहेत. अगोदरच एक महिना पाऊस उशिरा आल्याने पिकांची उगवण संथगतीने झाली. शेतकऱ्यांनी कशीबशी पिके जगविली. मात्र आता वन्यप्राण्यांच्या नव्या संकटाशी शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी त्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. तालुक्यातील शेतात सध्या हिरवीकंच पिके डोलायला लागली आहेत. परंतु रोहि, रानडुकरांचे कळप शेतात घुसून कोवळ्या पिकांची नासाडी करीत आहे. रात्रीच्यावेळी शेतात सहसा कुणी जात नसल्याने हे वन्यप्राणी रात्रभरातून पिके उद्ध्वस्त करीत आहेत. याबाबत त्रस्त शेतकऱ्यांनी अनेकदा वनविभागाकडे तक्रारसुद्धा केली होती. मात्र या तक्रारीची दखलच घेण्यात येत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. वनाधिकारी या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करू, असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची बोळवण करतात. मात्र प्रत्यक्षात या वन्यप्राण्यांचा बंदोबस्तच होत नाही. त्याचबरोबर यावर्षी अनेक शेतकऱ्यांवर रानडुकराने हल्ला चढवून गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रानडुकरांची धास्ती पसरली आहे. उपविभागातील जंगलात चराईसाठी असलेल्या ई-वर्ग जमिनीवर अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. त्यामुळे दिवसेंदिवस वनसंपदा नष्ट होऊन जंगल विरळ होत चालले आहे. त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी आता गावाजवळ असलेल्या शेताकडे धाव घेऊन पिकांची नासधूस करीत आहे. वन्यप्राणी शेतात किंवा गावात घुसले आणि त्यांनी हैदोस घातला व एखाद्या शेतकऱ्याने त्याचा बंदोबस्त केला, तर उलट शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. परंतु वन्यप्राणी शेतात घुसून हिरव्याकंच पिकांची नासाडी करतात, ही एक शोकांतिका आहे. काही वन्यप्राणी तर शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिकांची नासाडी करतात. या वन्यप्राण्यांना शेतकऱ्यांनी हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास, वन्यप्राणी त्यांच्यावर हल्ला करण्याची भितीसुद्धा असते. त्यामुळे शेतातून वन्यप्राण्यांना कसे बाहेर काढावे, असाही प्रश्न त्यांना पडतो. एकंदरीत वन्यप्राण्यांच्या धुमाकूळाने शेतकरी त्रस्त झाला असून वन विभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)