शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

तालुक्यात वन्यजीव झाले सैरभैर

By admin | Updated: June 4, 2015 02:15 IST

उन्हाळ्याला प्रारंभ होताच जंगलातील जलस्रोत आटले आहे. वन्य जीव पाण्याच्या शोधात सैरभैर झाले ...

भटकंती : हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्याची नागरिकांमध्ये भीतीउमरखेड : उन्हाळ्याला प्रारंभ होताच जंगलातील जलस्रोत आटले आहे. वन्य जीव पाण्याच्या शोधात सैरभैर झाले असून पाण्याच्या शोधात गावकुसात शिरताहेत. यातून हिंस्त्र प्राण्यांचे मानवावर हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाच्या योजना अद्यापही केवळ कागदावरच दिसत आहे. आर्णी तालुक्यात चौफेर जंगल आहे. कोणत्याही गावात जा शेतशिवारालगत जंगल आहे. पूर्वी घनदाट असणारे जंगल आता विरळ झाले आहे. या जंगलांमध्ये असलेल्या जलस्रोतांवर तृणभक्षी व हिंस्त्र प्राणी आपली तहान भागवितात. परंतु अलीकडच्या काळात पाणीटंचाईची झळ या प्राण्यांनाही बसत आहे. यासाठी वनविभाग जंगलात पाणवठे निर्माण करते. परंतु यावर्षी पाणवठे केवळ कागदावर दिसत आहे. पाण्याच्या शोधात प्राणी शेतात व गावात शिरतात. त्यातून शेतकऱ्यांवर हल्ले होत आहे. रात्री शेताच्या रक्षणासाठी जाण्याचीही शेतकऱ्यांना भीती वाटत आहे. तसेच तृणभक्षी प्राणी उभ्या पिकांची नासाडीही करीत आहे. यावर्षी उमरखेड तालुक्यातील बंदीभागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात नागरिकांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटले आहे. त्यामुळे वन्यजीव व पशुपक्षीसुद्धा गावाकडे पाण्यासाठी भटकत आहेत. या प्राण्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. विशेषत: जंगलाशेजारी असलेल्या शेतांमध्ये हे प्राणी मजूरवर्गाला अनेकदा आढळले आहे. (शहर प्रतिनिधी)