शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

वनातील जलसंधारण, पानवठे कागदोपत्री

By admin | Updated: October 29, 2014 22:56 IST

संपूर्ण यवतमाळ वन वृत्तातच स्थानिक जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून कोट्यावधी रुपयांची जल व मृदा संधारणाची कामे राखीव वनात करण्यात आली. मात्र यातील बहुतांश कामे

यवतमाळ : संपूर्ण यवतमाळ वन वृत्तातच स्थानिक जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून कोट्यावधी रुपयांची जल व मृदा संधारणाची कामे राखीव वनात करण्यात आली. मात्र यातील बहुतांश कामे कागदोपत्रीच झाली असल्याने पाणी आणि खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वन्यप्राणी जंगल सोडून गावाकडे धाव घेत आहे. त्यातूनच वन्यप्राणी आणि मनुष्य असा संघर्ष यवतमाळ वनवृत्तात पाहायला मिळत आहे. या बाबीवर पुसद वन विभागातील सावरगाव बंगला येथे झालेल्या बिबटाच्या शिकारीने एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे. यवतमाळ, वाशिम, अकोला या तीन जिल्ह्यांमध्ये यवतमाळ वनवृत्त व्यापले आहे. तीन जिल्ह्यांमध्ये हे वनवृत्त असल्याने तीनही ठिकाणच्या जिल्हा विकास व नियोजन समितीच्या निधीतून यवतमाळ या एकाच वनवृत्तात कोट्यावधी रुपयांची जल व मृदा संधारणाची कामे वन विभागाने केली. त्यासाठी काही लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते, पदाधिकारी, कंत्राटदार यांना ही कामे देण्यात आली. वास्तविक ही कामे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कुशल आणि अकुशल मजूर वापरून व आवश्यक त्या ठिकाणी मशीनद्वारे करायची होती. असे असताना नियम धाब्यावर बसवून ३० टक्के वाटा ठेवून वन विभागाने ही कामे त्या कंत्राटदारांना दिली. ३० टक्के दिल्यानंतर या कामांचा दर्जा काय राहील, याची कल्पना येते. त्यामुळे कोट्यावधीचे पानवठे, वनतळे, माती नाला बांध आणि अन्य विकास कामे कागदोपत्रीच झाली. परिणामी जंगलातील पाण्याचे स्त्रोत निर्माण झाले नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या पाण्याचा आणि खाद्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे जंगली श्वापद आणि वन्यप्राणी खाद्य व पाण्यासाठी गावाकडे अथवा मानवी वस्त्यांकडे धाव घेवू लागली आहे. त्यातूनच यवतमाळ वन वृत्तात अनेक ठिकाणी मनुष्य आणि वन्यप्राणी असा संघर्ष पाहायला मिळाला. त्यामध्ये वन्यप्राण्यांचा नाहक बळी गेला. पुसद वनविभागातील शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्रातील सावरगाव बंगला येथे एका पितापुत्राने आपल्या शेळ्यांवर ताव मारल्याच्या कारणावरून बिबटावर विषप्रयोग केला. या घटनेने जल व मृदा संधारणाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)