शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

शेतांमध्ये वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: August 3, 2015 02:18 IST

तालुक्यातील शेतकरी वर्ग वन्यप्राण्यांच्या हैदोसापायी अक्षरश: रडकुंडीस आला आहे.

पांढरकवडा : तालुक्यातील शेतकरी वर्ग वन्यप्राण्यांच्या हैदोसापायी अक्षरश: रडकुंडीस आला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.परिसरातील बहुतेक भाग हा जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे जंगलाच्या आजुबाजूला असणाऱ्या शेतात जंगलातील हरिण, रोही, रानगायी या जंगली जनावरांचे कळप शेतात घुसून शेतातील मौल्यवान अशा हिरव्यागार पिकांचे नुकसान करीत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांनी कशीबशी जगविलेली पिके आता वन्यप्राणी नष्ट करीत आहे. आधीच शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचा सामना करावा लागत आहे. कशीबशी कपाशी व इतर बियाण्यांची उगवण होऊन हिरवगीर पिके डोलायला लागली. परंतु अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी या नव्या संकटामुळे पळाले आहे. संपूर्ण वर्षभराची मेहनत या वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे वाया जात आहे. त्यामुळे पुढील जीवन कसे जगावे, असा यक्षप्रश्न शेतकरी बांधवांसमोर निर्माण झाला आहे. या वन्यप्राण्यांच्या धुमाकुळामुळे वाढत्या तक्रार सतत येऊ लागल्या असून वन अधिकाऱ्यांकडे तक्रारी देऊन वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताबाबत विनंती केल्यास, शेतकऱ्यांनी स्वत:च आपल्या शेताची रखवाली करण्याच्या सूचना वनाधिकारी देतात. शेतकऱ्यांचे एखादे जनावर जंगलात गेले, तर वन विभागाचे कर्मचारी त्या जनावराला कोंडवाड्यात टाकतात. परंतु वन्य प्राण्यांच्या हैदोसापायी हजारो शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानाबाबत वन विभाग कोणतीच दखल का घेत नाही, असा शेतकरी बांधवांचा सवाल आहे. वन्यप्राणी सरंक्षण कायद्यानुसार वन्यप्राण्यांचे संरक्षण होत असल्याने दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे. परंतु वन विभाग शेतकऱ्यांना या वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीस पायबंद घालण्यासाठी असमर्थ ठरले आहे. त्यामुळे जंगलाजवळील शेती करणे आता कठीण झाले आहे. शासनाने या गंभीर बाबीची दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)