शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

शेतांमध्ये वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: August 3, 2015 02:18 IST

तालुक्यातील शेतकरी वर्ग वन्यप्राण्यांच्या हैदोसापायी अक्षरश: रडकुंडीस आला आहे.

पांढरकवडा : तालुक्यातील शेतकरी वर्ग वन्यप्राण्यांच्या हैदोसापायी अक्षरश: रडकुंडीस आला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.परिसरातील बहुतेक भाग हा जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे जंगलाच्या आजुबाजूला असणाऱ्या शेतात जंगलातील हरिण, रोही, रानगायी या जंगली जनावरांचे कळप शेतात घुसून शेतातील मौल्यवान अशा हिरव्यागार पिकांचे नुकसान करीत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांनी कशीबशी जगविलेली पिके आता वन्यप्राणी नष्ट करीत आहे. आधीच शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचा सामना करावा लागत आहे. कशीबशी कपाशी व इतर बियाण्यांची उगवण होऊन हिरवगीर पिके डोलायला लागली. परंतु अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी या नव्या संकटामुळे पळाले आहे. संपूर्ण वर्षभराची मेहनत या वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे वाया जात आहे. त्यामुळे पुढील जीवन कसे जगावे, असा यक्षप्रश्न शेतकरी बांधवांसमोर निर्माण झाला आहे. या वन्यप्राण्यांच्या धुमाकुळामुळे वाढत्या तक्रार सतत येऊ लागल्या असून वन अधिकाऱ्यांकडे तक्रारी देऊन वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताबाबत विनंती केल्यास, शेतकऱ्यांनी स्वत:च आपल्या शेताची रखवाली करण्याच्या सूचना वनाधिकारी देतात. शेतकऱ्यांचे एखादे जनावर जंगलात गेले, तर वन विभागाचे कर्मचारी त्या जनावराला कोंडवाड्यात टाकतात. परंतु वन्य प्राण्यांच्या हैदोसापायी हजारो शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानाबाबत वन विभाग कोणतीच दखल का घेत नाही, असा शेतकरी बांधवांचा सवाल आहे. वन्यप्राणी सरंक्षण कायद्यानुसार वन्यप्राण्यांचे संरक्षण होत असल्याने दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे. परंतु वन विभाग शेतकऱ्यांना या वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीस पायबंद घालण्यासाठी असमर्थ ठरले आहे. त्यामुळे जंगलाजवळील शेती करणे आता कठीण झाले आहे. शासनाने या गंभीर बाबीची दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)