शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

शेतांमध्ये वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: August 3, 2015 02:18 IST

तालुक्यातील शेतकरी वर्ग वन्यप्राण्यांच्या हैदोसापायी अक्षरश: रडकुंडीस आला आहे.

पांढरकवडा : तालुक्यातील शेतकरी वर्ग वन्यप्राण्यांच्या हैदोसापायी अक्षरश: रडकुंडीस आला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.परिसरातील बहुतेक भाग हा जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे जंगलाच्या आजुबाजूला असणाऱ्या शेतात जंगलातील हरिण, रोही, रानगायी या जंगली जनावरांचे कळप शेतात घुसून शेतातील मौल्यवान अशा हिरव्यागार पिकांचे नुकसान करीत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांनी कशीबशी जगविलेली पिके आता वन्यप्राणी नष्ट करीत आहे. आधीच शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचा सामना करावा लागत आहे. कशीबशी कपाशी व इतर बियाण्यांची उगवण होऊन हिरवगीर पिके डोलायला लागली. परंतु अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी या नव्या संकटामुळे पळाले आहे. संपूर्ण वर्षभराची मेहनत या वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे वाया जात आहे. त्यामुळे पुढील जीवन कसे जगावे, असा यक्षप्रश्न शेतकरी बांधवांसमोर निर्माण झाला आहे. या वन्यप्राण्यांच्या धुमाकुळामुळे वाढत्या तक्रार सतत येऊ लागल्या असून वन अधिकाऱ्यांकडे तक्रारी देऊन वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताबाबत विनंती केल्यास, शेतकऱ्यांनी स्वत:च आपल्या शेताची रखवाली करण्याच्या सूचना वनाधिकारी देतात. शेतकऱ्यांचे एखादे जनावर जंगलात गेले, तर वन विभागाचे कर्मचारी त्या जनावराला कोंडवाड्यात टाकतात. परंतु वन्य प्राण्यांच्या हैदोसापायी हजारो शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानाबाबत वन विभाग कोणतीच दखल का घेत नाही, असा शेतकरी बांधवांचा सवाल आहे. वन्यप्राणी सरंक्षण कायद्यानुसार वन्यप्राण्यांचे संरक्षण होत असल्याने दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे. परंतु वन विभाग शेतकऱ्यांना या वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीस पायबंद घालण्यासाठी असमर्थ ठरले आहे. त्यामुळे जंगलाजवळील शेती करणे आता कठीण झाले आहे. शासनाने या गंभीर बाबीची दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)