शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राणी शिकाऱ्यांच्या निशाण्यावर

By admin | Updated: March 8, 2015 02:09 IST

वनसंपत्तीने नटलेल्या पैनगंगा अभयारण्यात असलेले वन्यप्राणी आता शिकाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. मोर, हरीण, रोही आदी प्राण्यांची शिकार करून ...

उमरखेड : वनसंपत्तीने नटलेल्या पैनगंगा अभयारण्यात असलेले वन्यप्राणी आता शिकाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. मोर, हरीण, रोही आदी प्राण्यांची शिकार करून मांसाची विक्री खुलेआम केली जात आहे. होळीपूर्वी मोराची शिकार करण्याचा प्रयत्न झाला होता. वाघ, बिबट्यांसारखे हिंस्त्र प्राणी कमी झाल्याने शिकारी बिनधास्त अभयारण्यात शिरत असल्याची माहिती आहे. मात्र वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर पैनगंगा अभयारण्या आहे. मौल्यवाण सागवानासह या जंगलात विविध पशूपक्षी आहेत. वाघ-बिबट, हरीण, रोही, मोर, ससे, रानडुक्कर, तितर, बटेर, पाणकोंबड्या यासह विविध प्रजातीचे पशूपक्षी आहेत. सागवान तस्कर मोठ्या प्रमाणात जंगलात शिरतात. जंगल तोडतानाच वन्यप्राण्यांची शिकार करतात. पैनगंगा अभयारण्यात गेल्या काही वर्षात हिंस्त्र प्राण्यांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे शिकाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. वाघ, बिबट्यासारखे प्राणी जंगलात असले की शिकारी जंगलात शिरायला मागेपुढे पाहतात. मात्र आता या प्राण्यांची संख्या अल्प झाल्याने बिनधास्तपणे जंगलात शिरून हरीण, राही, मोर, तितर, बटेर आदींची शिकार करीत आहे. नदीच्या तिरावर प्राणी पाणी पिण्यास येतात म्हणून शिकारी त्याठिकाणी आपले जाळे टाकूण असतात. पाणी पिण्यासाठी आलेले प्राणी अलगद जाळ््यात अडकतात. विशेष म्हणजे राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोराच्या शिकारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. होळीपूर्वी दराटी जंगलात जखमी असवस्थेतील एक मोर आढळून आला होता. या मोराची शिकार करण्यासाठी त्यावर हल्ला करण्यात आला होता. सुदैवाने त्या मोराच्या पायाला दुखापत झाली. वनविभागाने किनवटच्या पशूचिकित्सालयात मोरावर उपचार केले. मात्र याबाबत परिसरात उलटसूलट चर्चा सुरू आहे. तीन मोरांची शिकार झाली असून, एक मोर शिकाऱ्यांच्या तावडीतून सुटल्याने तो नागरिकांच्या ताब्यात आला. नागरिकांनी त्याला वनविभागाच्या सुपूर्द केले. दररोज या भागात मोराची शिकार केली जात आहे. यासोबतच हरीण आणि इतर प्राण्यांचीही शिकार केली जाते. स्थानिकांच्या मदतीने होणाऱ्या शिकारीचे मांस शहरातील हॉटेल आणि धाब्यावर विकले जाते, तर अनेकदा जंगलामध्ये पार्टी केली जाते. तेलंगाणातील तस्कर याभागात शिरून तस्करी करीत आहेत. मात्र वनविभागाचे कर्मचारी जंगलात जायला घाबरतात. ही मानसिकता ओळखूनच वन्यजीवांची शिकार केली जात आहे. शिकाऱ्यांवर अटकाव आणला नाही तर किलबिलाट नष्ट होण्याची भीती आहे. (शहर प्रतिनिधी)