शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
3
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
4
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
5
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
6
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
7
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
8
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
9
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
10
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
11
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
12
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
13
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
14
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
15
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
16
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
17
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
18
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
19
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
20
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

वन्यप्राणी शिकाऱ्यांच्या निशाण्यावर

By admin | Updated: March 8, 2015 02:09 IST

वनसंपत्तीने नटलेल्या पैनगंगा अभयारण्यात असलेले वन्यप्राणी आता शिकाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. मोर, हरीण, रोही आदी प्राण्यांची शिकार करून ...

उमरखेड : वनसंपत्तीने नटलेल्या पैनगंगा अभयारण्यात असलेले वन्यप्राणी आता शिकाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. मोर, हरीण, रोही आदी प्राण्यांची शिकार करून मांसाची विक्री खुलेआम केली जात आहे. होळीपूर्वी मोराची शिकार करण्याचा प्रयत्न झाला होता. वाघ, बिबट्यांसारखे हिंस्त्र प्राणी कमी झाल्याने शिकारी बिनधास्त अभयारण्यात शिरत असल्याची माहिती आहे. मात्र वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर पैनगंगा अभयारण्या आहे. मौल्यवाण सागवानासह या जंगलात विविध पशूपक्षी आहेत. वाघ-बिबट, हरीण, रोही, मोर, ससे, रानडुक्कर, तितर, बटेर, पाणकोंबड्या यासह विविध प्रजातीचे पशूपक्षी आहेत. सागवान तस्कर मोठ्या प्रमाणात जंगलात शिरतात. जंगल तोडतानाच वन्यप्राण्यांची शिकार करतात. पैनगंगा अभयारण्यात गेल्या काही वर्षात हिंस्त्र प्राण्यांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे शिकाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. वाघ, बिबट्यासारखे प्राणी जंगलात असले की शिकारी जंगलात शिरायला मागेपुढे पाहतात. मात्र आता या प्राण्यांची संख्या अल्प झाल्याने बिनधास्तपणे जंगलात शिरून हरीण, राही, मोर, तितर, बटेर आदींची शिकार करीत आहे. नदीच्या तिरावर प्राणी पाणी पिण्यास येतात म्हणून शिकारी त्याठिकाणी आपले जाळे टाकूण असतात. पाणी पिण्यासाठी आलेले प्राणी अलगद जाळ््यात अडकतात. विशेष म्हणजे राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोराच्या शिकारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. होळीपूर्वी दराटी जंगलात जखमी असवस्थेतील एक मोर आढळून आला होता. या मोराची शिकार करण्यासाठी त्यावर हल्ला करण्यात आला होता. सुदैवाने त्या मोराच्या पायाला दुखापत झाली. वनविभागाने किनवटच्या पशूचिकित्सालयात मोरावर उपचार केले. मात्र याबाबत परिसरात उलटसूलट चर्चा सुरू आहे. तीन मोरांची शिकार झाली असून, एक मोर शिकाऱ्यांच्या तावडीतून सुटल्याने तो नागरिकांच्या ताब्यात आला. नागरिकांनी त्याला वनविभागाच्या सुपूर्द केले. दररोज या भागात मोराची शिकार केली जात आहे. यासोबतच हरीण आणि इतर प्राण्यांचीही शिकार केली जाते. स्थानिकांच्या मदतीने होणाऱ्या शिकारीचे मांस शहरातील हॉटेल आणि धाब्यावर विकले जाते, तर अनेकदा जंगलामध्ये पार्टी केली जाते. तेलंगाणातील तस्कर याभागात शिरून तस्करी करीत आहेत. मात्र वनविभागाचे कर्मचारी जंगलात जायला घाबरतात. ही मानसिकता ओळखूनच वन्यजीवांची शिकार केली जात आहे. शिकाऱ्यांवर अटकाव आणला नाही तर किलबिलाट नष्ट होण्याची भीती आहे. (शहर प्रतिनिधी)