शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

महागावच्या जंगलात रानटी कुत्र्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 22:28 IST

महागाव तालुक्यातील जंगलांमध्ये रानकुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून जनावरांवर हल्ला करून त्यांची शिकार करीत आहे. यात वासरांचा सर्वाधिक समावेश आहे.

ठळक मुद्देजनावरांची शिकार : बंदोबस्तासाठी वन विभागाकडे मागणी

नरेंद्र नप्ते ।लोकमत न्यूज नेटवर्कमुडाणा : महागाव तालुक्यातील जंगलांमध्ये रानकुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून जनावरांवर हल्ला करून त्यांची शिकार करीत आहे. यात वासरांचा सर्वाधिक समावेश आहे. या प्रकाराने शेतकरी धास्तावले असून या रानकुत्र्यांचा बंदोबस्त वन विभागाने करावा, अशी मागणी होत आहे.महागाव तालुक्यात घनदाट जंगल आहे. तसेच लगतच्या उमरखेड तालुक्यात पैनगंगा अभयारण्य आहे. हिंस्र प्राण्यासोबत आता रानकुत्र्यांचीही संख्या वाढली आहे. या रानकुत्र्यांनी आता जनावरांवर हल्ला करणे सुरू केले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे शेतात ठेवली आहे. त्या ठिकाणी गोठे बांधले आहेत. आता याच गोठ्यातील जनावरांना रानकुत्र्यांनी टार्गेट केले आहे. पाच ते सहाच्या झुंडीने राहणारे रानकुत्रे वासरांवर अचानक हल्ला करतात. त्यांना शेतकऱ्यांनी हुसकावून लावले की, शेतकºयांवरही चवताळून धावून येतात. यामुळे शेतकºयात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुडाणा परिसरात आतापर्यंत या कुत्र्यांनी २० जनावरांची शिकार केली आहे. या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.संतोष जाधव, सदानंद मुधोळ, गजानन उंचेगावकर, दिलीप खराटे, संतोष खराटे, रमेश येनकर, गणेश शिंदे, मार्लेगावकर, बंडू येनकर, सुभाष जाधव, बबन किवले, वसंतराव गावंडे आदी शेतकºयांच्या जनावरांचा या कुत्र्यांनी बळी घेतला आहे.-तर मनुष्यावरही हल्ले होतीलझुंडीने राहणारे रानकुत्रे एकदम आक्रमक असतात. या कुत्र्यांंना शिकार मिळाली नाही तर आणखी आक्रमक होऊ शकतात. वन विभागाने या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त केला नाही तर मनुष्यावरही हल्ले करण्यास रानकुत्रे मागे पुढे पाहणार नाही.