शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

वीज अभियंत्यांच्या निलंबनाचा एवढा जळफळाट का ?

By admin | Updated: May 9, 2015 00:10 IST

एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या मृत्यूनंतर का होईना न्याय मिळतो. त्याच्या मृत्यूस जबाबदार धरुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित ....

ज्ञानेश्वर मुंदे यवतमाळ एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या मृत्यूनंतर का होईना न्याय मिळतो. त्याच्या मृत्यूस जबाबदार धरुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले जाते. मात्र संघटन शक्तीच्या बळावर हा न्यायच नाकारण्याचा प्रयत्न होतोय. आंदोलनाचे अस्त्र उभारुन पुन्हा सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा मनसुबा रचला जातो. वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा अनुभव घेतला नसेल असा एकही ग्राहक जिल्ह्यात सापडणार नाही. मात्र या अनागोंदीला जबाबदार धरुन एखाद्यावर कारवाई झाली तर त्याचा मात्र एवढा जळफळाट का व्हावा असा प्रश्न जिल्ह्यातील तमाम नागरिकांना पडला आहे. चिमणाबागापूर येथील शेतकऱ्याच्या मृत्यूस जबाबदार धरुन वीज वितरणचे अधीक्षक अभियंता आणि दोन उपअभियंत्यांना निलंबित करण्यात आले. नियमित वीज बिल भरणाऱ्या अमरलाल मनिहार यांच्यावर वीज चोरीचा आळ घेतला. याचा जबर मानसिक धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा ठपका ठेवत तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. शेतकऱ्याचा गेलेला जीव परत येणार नाही, हे मान्य आहे. मात्र या कारवाईचा धडा इतर अधिकारी घेतील, याच उद्देशाने तिघांचे निलंबन करण्यात आले. मात्र आपल्या संघटन शक्तीच्या बळावर आता निलंबन मागे घ्यावे यासाठी अभियंत्यांंपासून कर्मचारी रस्त्यावर उतरण्याची भाषा बोलत आहेत. वरिष्ठ अधिकारीच निलंबित झाल्याने त्यांच्या संरक्षणासाठी सर्वच रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. वीज वितरण कंपनीच्या विविध संघटना एकत्र आल्यात, कृती समिती स्थापन करून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला. आता कामबंद आंदोलनाची तयारी सुरू आहे. याच प्रकरणात एखादा कनिष्ठ कर्मचारी निलंबित झाला असता तर वीज वितरणच्या या कृती समितीने असा दबाव आणला असता काय?, त्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी सर्व जण उभे राहिले असते काय?, येथे वरिष्ठच निलंबित झाल्याने सर्व एकत्र झाले आणि संघटन शक्तीतून आपल्या ‘कर्तव्यावर’ पांघरुन घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. सरकारने वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकावेयवतमाळातील वीज अभियंत्यांच्या निलंबनाच्या विरोधात अभियंता संघटनेने संपाचे (काम बंद) हत्यार उपसले आहे. यवतमाळातून सुरू झालेला हा संप राज्यभर पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र सरकारने निलंबन मागे न घेता हा संप चिरडून टाकावा अशी रास्त अपेक्षा शेतकरी व नागरिकांची आहे. संपावर असलेल्या या वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन सरकार तारखेवर त्यांच्या खात्यात जमा करणार याची जाणीव असल्याने ही यंत्रणा अगदी बिनधास्त सरकारच्याच विरोधात रस्त्यावर उतरली आहे. वीज अभियंत्यांच्या निलंबनाच्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या निर्णयाचे जिल्हाभरात जोरदार स्वागत होत आहे. सरकारने ऊर्जाच नव्हे तर कोणत्याही खात्याच्या अशा (हलगर्जीपणानंतर होणाऱ्या कारवाईच्या विरोधात) कोणत्याही संप-आंदोलनाला भीक घालू नये, एवढीच अपेक्षा सामान्य जनता ठेऊन आहे.