शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

आमच्या लग्नाची घाई कशाला...अजून शिकू द्या ना! चिमुकले लिहिणार आईबाबांना पत्र

By अविनाश साबापुरे | Updated: September 12, 2023 19:21 IST

जिल्हा परिषदेच्या दोन हजारांवर शाळांमध्ये ‘सामाजिक’ उपक्रम

यवतमाळ : जग कितीही पुढे गेले तरी अजूनही बालविवाहाची समस्या संपलेली नाही. त्यामुळेच आता जिल्हा परिषदेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. ‘आमच्या लग्नाची घाई कशाला करता.. आम्हाला अजून शिकू द्या ना’ अशी आर्त हाक देत चिमुकल्यांनीच आईबाबांना पत्र लिहावे, असा हा उपक्रम आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी याची सुरूवातही करण्यात आलीय.

कोरोनाच्या काळापासून जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकार पुढे आले होते. महिला व बालविकास विभाग, जिल्हा बालसंरक्षण कक्ष आदींनी यावर वेळोवेळी कारवायादेखील केल्या. आता थेट घरोघरी याबाबत जागृती व्हावी म्हणून जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मैनाक घोष यांच्या संकल्पनेतून या ‘पत्रलेखन’ उपक्रमाचा जन्म झाला. तर प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी मंगळवारी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत लेखी आदेश बजावले आहेत. ‘आई-बाबांना पत्र लिहिणे’ हा उपक्रम प्रत्येक शाळेने राबवावा, असे आदेशात म्हटले आहे.

पत्रात काय काय असेल?- सक्षम व सुदृढ पिढीसाठी कमी वयात लग्न करू नये.- कमी वयातील लग्नामुळे शिक्षणाची संधी हिरावली जाते.- विशेषत: मुलींच्या शिक्षणाला खिळ बसते.- आम्हाला शिकू द्या, शिकून समृद्ध होऊ द्या.- आम्हाला देशाचा मजबूत स्तंभ बनू द्या.- त्यानंतरच आमचे लग्न करा. 

साध्या पोस्टकार्डद्वारे बालविवाह रोखण्याचा संदेश विद्यार्थी पालकांना देतील. प्रत्येक तालुक्यात एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी यांचा अशाच प्रकारचा संदेश देणारी व्हीडिओ क्लीप तंत्रस्नेही शिक्षकांच्या माध्यमातून तयार केला जाईल. त्याला तारे जमीपर, आशाये, उडाणा अशा अनुरूप गाण्याची जोड देऊन त्यातून प्रभावी जनजागृतीचा प्रयत्न केला जाईल.- किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Yavatmalयवतमाळ