शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

हिवाळ्यात वेगाने फिरणारे पंखे उन्हाळ्यातच का होतात मंद ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 18:21 IST

यंदा चित्र बदलणार : म्हणे, उन्हाळ्यात जाणवणार नाहीत झळा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उन्हाळ्याची चाहूल लागताच उकाडा वाढला आहे. त्यामुळे कुलरही बाहेर निघाले आहे. अशा स्थितीत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. दिवसभरात अनेकदा वीज गूल होते. वीज वितरण विभाग मात्र भारनियमनच नाही, कामे सुरू असली, तरच त्या-त्या भागाचा पुरवठा खंडित केला जातो, असे सांगत आहे. परंतु, ग्राहक आतापासूनच वैतागले आहे. पुढे उन्हाळ्यात जीव उकळून निघतो की काय, असे वाटत आहे.

वीज वितरण केवळ बिलाचा भरणा करण्यासाठी अॅक्शन मोडवर काम करते. ग्राहकांना मनस्ताप होऊ नये, यासाठी मात्र ठोस उपाययोजना करीत नाही, अशी ओरड ग्राहकांकडून सातत्याने केली जाते. दरमहा येणाऱ्या वीज बिलाचाही अनेक ग्राहकांना ताळमेळच लागत नाही. ग्रामीण भागातील ग्राहकांना, तर विजेसंबंधीच्या अनेक समस्या आहे. सोलर ग्राहकांवरही भुर्दंड लावण्याच्या हालचाली महावितरण विभागाने चालविला आहे. उन्हाळ्यात विजेची अधिक मागणी असते. उकाड्यापासून दिलासा मिळावा, म्हणून कुलर, पंखे लावले जाते. मात्र याच काळात वीज वितरणकडून नियमित वीजपुरवठा केला जात नाही. सध्या काही भागांत याचा अनुभवही ग्राहकांना येत आहे.

उन्हाळ्यात होल्टेजची मोठी समस्या निर्माण होते. फॅन, आणि कुलरची फूल स्पीड केल्यानंतरही हवा येत नसल्याची तक्रार नागरिकांची असते. हिवाळा आणि पावसाळ्यात वेगाने फिरणारे पंखे उन्हाळ्यातच का मंद होतात, असा प्रश्न ग्राहकांना पडतो. 

वीज गळती जास्त तेथे जास्त भारनियमनवीज गळती जास्त तेथे जास्त भारनियमन ही पद्धत पूर्वी महावितरणकडून राबवली जात होती. आता मात्र वीज गळती आणि भारनियमन याचा एकमेकांशी संबंध राहिलेला नाही. वीज गळती रोखण्यासाठी महावितरणकडून मोहीम राबवली जात आहे. पावसाळा व हिवाळा या ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात वीजबिल अधिक येत असल्याने ग्राहकांमध्ये रोष आहे.

आताच ही स्थिती तर पुढे काय? ग्राहकांसमोर प्रश्नउन्हाळ्याची चाहूल लागताच काही भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. गत काही दिवसांपासून तापमानही वाढले आहे. अशास्थितीत वीज गूल होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. आताच ही स्थिती तर पुढे काय असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. उन्हामुळे घामाघूम झालेले नागरिक थंड हवेसाठी कुलर, एसी घरी बसवितात. परंतु, विजेच्या लपंडावासोबतच वीज दरही घाम फोडते. वीज बिलही दुप्पट येते.

जाणून घ्या शहरात का केले जाते भारनियमन ?गत काही वर्षापासून महावितरण भारनियम नाही, असा दावा करीत असले तरी उन्हाळ्यात वीज गूल होण्याचे प्रमाण अधिक असते. ग्रामीण भागासोबतच शहरातही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहे.

४ महिने उन्हाळ्यात अघोषित भारनियमनाचा सामनादरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण व शहरी भागातील जनतेला अघोषित भारनियमनाचा सामना करावा लागतो. चिमुकल्या मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना उकाड्याचा असह्य असा त्रास होतो.

"महावितरणकडून कुठलेही भारनियमन केले जात नाही. सोलरची कामे सुरू असल्याने त्या-त्या भागाचा तात्पुरता वीजपुरवठा बंद केला जातो. यावर्षी उन्हाळ्यात लोड वाढून वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविले आहे. पिंपळगावसाठी स्वतंत्र ३३ केव्हीची वाहिनी टाकली जाणार आहे."- प्रवीण दरोली, अधीक्षक अभियंता

टॅग्स :YavatmalयवतमाळSummer Specialसमर स्पेशल