शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

हिवाळ्यात वेगाने फिरणारे पंखे उन्हाळ्यातच का होतात मंद ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 18:21 IST

यंदा चित्र बदलणार : म्हणे, उन्हाळ्यात जाणवणार नाहीत झळा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उन्हाळ्याची चाहूल लागताच उकाडा वाढला आहे. त्यामुळे कुलरही बाहेर निघाले आहे. अशा स्थितीत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. दिवसभरात अनेकदा वीज गूल होते. वीज वितरण विभाग मात्र भारनियमनच नाही, कामे सुरू असली, तरच त्या-त्या भागाचा पुरवठा खंडित केला जातो, असे सांगत आहे. परंतु, ग्राहक आतापासूनच वैतागले आहे. पुढे उन्हाळ्यात जीव उकळून निघतो की काय, असे वाटत आहे.

वीज वितरण केवळ बिलाचा भरणा करण्यासाठी अॅक्शन मोडवर काम करते. ग्राहकांना मनस्ताप होऊ नये, यासाठी मात्र ठोस उपाययोजना करीत नाही, अशी ओरड ग्राहकांकडून सातत्याने केली जाते. दरमहा येणाऱ्या वीज बिलाचाही अनेक ग्राहकांना ताळमेळच लागत नाही. ग्रामीण भागातील ग्राहकांना, तर विजेसंबंधीच्या अनेक समस्या आहे. सोलर ग्राहकांवरही भुर्दंड लावण्याच्या हालचाली महावितरण विभागाने चालविला आहे. उन्हाळ्यात विजेची अधिक मागणी असते. उकाड्यापासून दिलासा मिळावा, म्हणून कुलर, पंखे लावले जाते. मात्र याच काळात वीज वितरणकडून नियमित वीजपुरवठा केला जात नाही. सध्या काही भागांत याचा अनुभवही ग्राहकांना येत आहे.

उन्हाळ्यात होल्टेजची मोठी समस्या निर्माण होते. फॅन, आणि कुलरची फूल स्पीड केल्यानंतरही हवा येत नसल्याची तक्रार नागरिकांची असते. हिवाळा आणि पावसाळ्यात वेगाने फिरणारे पंखे उन्हाळ्यातच का मंद होतात, असा प्रश्न ग्राहकांना पडतो. 

वीज गळती जास्त तेथे जास्त भारनियमनवीज गळती जास्त तेथे जास्त भारनियमन ही पद्धत पूर्वी महावितरणकडून राबवली जात होती. आता मात्र वीज गळती आणि भारनियमन याचा एकमेकांशी संबंध राहिलेला नाही. वीज गळती रोखण्यासाठी महावितरणकडून मोहीम राबवली जात आहे. पावसाळा व हिवाळा या ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात वीजबिल अधिक येत असल्याने ग्राहकांमध्ये रोष आहे.

आताच ही स्थिती तर पुढे काय? ग्राहकांसमोर प्रश्नउन्हाळ्याची चाहूल लागताच काही भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. गत काही दिवसांपासून तापमानही वाढले आहे. अशास्थितीत वीज गूल होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. आताच ही स्थिती तर पुढे काय असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. उन्हामुळे घामाघूम झालेले नागरिक थंड हवेसाठी कुलर, एसी घरी बसवितात. परंतु, विजेच्या लपंडावासोबतच वीज दरही घाम फोडते. वीज बिलही दुप्पट येते.

जाणून घ्या शहरात का केले जाते भारनियमन ?गत काही वर्षापासून महावितरण भारनियम नाही, असा दावा करीत असले तरी उन्हाळ्यात वीज गूल होण्याचे प्रमाण अधिक असते. ग्रामीण भागासोबतच शहरातही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहे.

४ महिने उन्हाळ्यात अघोषित भारनियमनाचा सामनादरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण व शहरी भागातील जनतेला अघोषित भारनियमनाचा सामना करावा लागतो. चिमुकल्या मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना उकाड्याचा असह्य असा त्रास होतो.

"महावितरणकडून कुठलेही भारनियमन केले जात नाही. सोलरची कामे सुरू असल्याने त्या-त्या भागाचा तात्पुरता वीजपुरवठा बंद केला जातो. यावर्षी उन्हाळ्यात लोड वाढून वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविले आहे. पिंपळगावसाठी स्वतंत्र ३३ केव्हीची वाहिनी टाकली जाणार आहे."- प्रवीण दरोली, अधीक्षक अभियंता

टॅग्स :YavatmalयवतमाळSummer Specialसमर स्पेशल